एक्स्प्लोर

Oxfam Report : दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

Oxfam International Report: कोरोना महासाथीच्या काळात जगभरात आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याचे Oxfam International च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Oxfam International Report:  कोरोना महासाथीच्या आजाराने जगभरात हाहा:कार उडला होता. कोरोना महासाथीमुळे कोट्यवधी कुटुंबावर परिणाम झाला. कोरोना महासाथीमुळे जगभरात आर्थिक विषमता वाढली. कोरोनाच्या दोन वर्षाच्या काळात अब्जाधीशांच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली. मागील 23 वर्षात त्यांची संपत्ती इतक्या प्रमाणात वाढली नव्हती, असा दावा ऑक्सफॅम इंटरनॅशनलच्या  (Oxfam International) अहवालात करण्यात आला आहे. 

ऑक्सफॅम इंटरनॅशनलने आपल्या अहवालात म्हटले की, कोरोना महासाथीच्या 24 महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर संपत्ती वाढली. मागील 23 वर्षांमध्ये संपत्तीमध्ये इतकी वाढ कधीच झाली नव्हती. 

जगात सध्या 2668 अब्जाधीश असल्याचे  ऑक्सफॅम इंटरनॅशनलच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या अब्जाधीशांकडे 12.7 ट्रिलियन डॉलर म्हणजे जवळपास 984.95 लाख कोटींची संपत्ती आहे. हा आकडा जगाच्या जीडीपीच्या 14 टक्के इतका आहे. 

>> ऑक्सफॅम इंटरनॅशनलच्या अहवालात आहे काय?

श्रीमंत आणखी श्रीमंत झाले:  कोरोना महासाथीनंतर  जगभरात अब्जाधीशांच्या संख्येत 573 जणांची भर पडली. म्हणजेच जवळपास दर 30 तासामध्ये एका अब्जाधीशाची भर पडली. या अब्जाधीशांच्या संपत्तीत महासाथीच्या काळात 42 टक्के म्हणजेच 293.16 लाख कोटींची भर पडली. जगातील 3.1 अब्ज लोकसंख्येकडे असलेली संपत्ती जगातील सर्वोच्च 10 अब्जाधीशांकडे आहे. 

गरीब आणखी गरीब झाले: कोरोना महासाथीच्या काळात 99 टक्के लोकांच्या कमाईत घट झाली आहे. वर्ष 2021 मध्ये 12.5 कोटींहून अधिकजण बेरोजगार झालेत. वर्ष 2021 मध्ये 40 टक्के लोकांच्या उत्पन्नात घट झाली. महासाथ सुरू होण्याआधी 6.7 टक्के लोकांच्या कमाईत घट होत होती. 

कंपन्यांचे उत्पन्न वाढले: महासाथीच्या काळात फार्मा उद्योगाशी संबंधित 40 जण अब्जाधीश झाले. मॉडर्ना आणि फायजरसारख्या कंपन्यांनी प्रति सेकंदाला 1 हजार डॉलरचा नफा कमावला. फार्मा कंपन्यांनी सरकारकडून जेनरिक उत्पादनासाठी 24 पट अधिक शुल्क घेतले. 

बेरोजगार महिलांच्या संख्येत वाढ: महासाथीच्या आधी स्त्री-पुरुष यांच्या वेतनातील भेदभावा संपुष्टात येण्यासाठी 100 वर्ष लागतील असा अंदाज होता. आता मात्र ही शक्यता 136 वर्ष इतकी वाढली आहे. वर्ष 2020 मध्ये पुरुषांपेक्षा महिलांचा रोजगार कमी होण्याची शक्यता 1.4 पट अधिक होती. तर, वर्ष 2019 च्या तुलनेत 2021 नोकरी करणाऱ्या महिलांची संख्या 1.3 कोटीपेक्षा कमी होते. तर, नोकरी करणाऱ्या पुरुषांची संख्या वर्ष 2019 इतकी झाली होती. 

गरिबांचे आर्युमान घटणार: श्रीमंत देशातील नागरिकांचे सरासरी दरडोई उत्पन्न गरीब देशांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या तुलनेत 16 वर्षांनी अधिक आहे. पुरेशी आरोग्य सुविधा न मिळाल्याने दरवर्षी 56 लाख लोकांना प्राण  गमवावे लागत आहे. त्यानुसार, दररोज 15 हजार जणांचा मृत्यू होत आहे. 

गरिबीत वाढ होणार 

ऑक्सफॅमच्या अहवालानुसार गेल्या वर्षी खाद्यपदार्थांच्या किमती 33.6 टक्क्यांनी वाढल्या होत्या. यंदाही भावात 23 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. अन्नधान्याच्या किमती वाढल्याने जगात आणखी गरिबी वाढेल. यावर्षी 26.3 कोटी लोक खूप गरीब असतील. त्यानुसार या वर्षी दर 33 तासांनी 1 कोटी लोक गरीब होतील.

श्रीमंत गरीब दरी कशी मिटवणार?

श्रीमंत आणि गरीब यांच्यातील ही दरी कमी करण्यासाठी ऑक्सफॅमने अधिक कर वाढवण्याची सूचना केली आहे. 5 दशलक्ष डॉलर संपत्ती असलेल्या लोकांवर 2 टक्के आणि 50 दशलक्ष डॉलर संपत्ती असलेल्या लोकांवर 3 टक्के कर आकारला जावा. त्याच वेळी, ज्यांच्याकडे 1 अब्ज डॉलरपेक्षा जास्त संपत्ती आहे, त्यांच्यावर 5 टक्के कर आकारला जावा. कर वाढवून, जगातील श्रीमंतांकडून दरवर्षी 2.52 ट्रिलियन डॉलर (रु. 195.44 लाख कोटी) कर येईल, ज्यामुळे जगातील 2.3 अब्ज लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यास मदत होईल, असा दावाही ऑक्सफॅमच्या अहवालात करण्यात आला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget