![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
25 कोटी लोक दारिद्र्यातून बाहेर, 45 कोटी जनधन खात्यांमध्ये 2.1 लाख कोटी जमा : अनुराग ठाकूर
केंद्र सरकारनं सुरु केलेल्या जनधन योजनेतील 45 कोटी खात्यांमध्ये 2.1 लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. आज बँकिंग क्षेत्र कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडल्याचे मत मंत्री अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केलं.
![25 कोटी लोक दारिद्र्यातून बाहेर, 45 कोटी जनधन खात्यांमध्ये 2.1 लाख कोटी जमा : अनुराग ठाकूर 2.1 lakh crore deposited in 45 crore Jan Dhan accounts says Minister Anurag Thakur 25 कोटी लोक दारिद्र्यातून बाहेर, 45 कोटी जनधन खात्यांमध्ये 2.1 लाख कोटी जमा : अनुराग ठाकूर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/17/140fcfb34c04f3b90450343c732b24cd1708160536958339_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pradhan Mantri Jan Dhan Yojana : 2014 पासून सर्वच क्षेत्रात परिवर्तन झालं आहे्. ‘रिफॉर्म, परफॉर्म, ट्रान्सफॉर्म’ याकडे लक्ष्य केंद्रीत केल्याचे मत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Minister Anurag Thakur) यांनी व्यक्त केले. केंद्र सरकारनं सुरु केलेल्या जनधन योजनेतील 45 कोटी खात्यांमध्ये 2.1 लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. आज बँकिंग क्षेत्र कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडले आहे. मात्र, 2014 पूर्वीचे सरकार हे धोरण लकवा साठी ओळखले जात होते, असं म्हणत विरोधकांवर ठाकूर यांनी जोरदार टीका केली. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी फेडरल बँकेच्या 2024 च्या वार्षिक सरकारी आणि संस्थात्मक व्यवसाय संमेलनाचे उद्घाटन केले. त्यावेळ ते बोलत होते.
जन-धन खात्यांमार्फत 2.1 लाख कोटी रुपयांचा निधी जमा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'प्रधानमंत्री जन धन योजना' जाहीर केली आहे. अनेकांनी ही योजना नॉनस्टार्टर म्हणून नाकारली होती. परंतू, आज या योजनेंतर्गत 45 कोटी बँक खाती उघडली गेली आहेत. याचा अभिमान सरकारला वाटतो. या जन-धन खात्यांमार्फत 2.1 लाख कोटी रुपयांचा जो निधी जमा झाला आहे. तो बँकिंग परिसंस्थेचा भाग असल्याचे ठाकूर म्हणाले.
सरकारच्या प्रयत्नांमुळे 25 कोटी लोकांना काढलं दारिद्र्यातून बाहेर
समाजातील प्रत्येक घटकाविषयी उत्तरदायित्व आणि सरकारचा पारदर्शक कारभार, यांचे मिश्रण साधून सरकार कार्यरत आहे. सरकारच्या प्रयत्नांमुळे गेल्या 10 वर्षांत 25 कोटी लोकांना दारिद्र्यातून बाहेर काढता आले. तसेच सरकारी योजनांचा लाभ लोकांना मिळत असल्याचा हा पुरावा असल्याचेही ठाकूर यावेळी म्हणाले. ‘जेएएम’ त्रिवेणीच्या अंमलबजावणीमुळं सामाजिक क्षेत्रातील योजनांवर सरकारकडून जितका खर्च केला जातो. तो शंभर टक्के निधी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत असल्याचे सरकार अभिमानाने जाहीर करू शकते.
आगामी 5 वर्षांत भारत अव्वल 3 अर्थव्यवस्थांपैकी एक होईल
सरकार धाडसी निर्णय घेण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे अनुराग ठाकूर म्हणाले. आगामी 5 वर्षांत भारताला अव्वल 3 अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. 2047 पर्यंत विकसित देश बनवण्याचा निर्धार पूर्ण करेल, अशी ग्वाही मंत्री अनुराग ठाकूर यांनी यावेळी दिली.
सरकार देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी वेळोवेळी अनेक योजना सुरू करते. प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY) ही त्यापैकी एक योजना आहे. या योजनेअंतर्गत, कोणीही शून्य शिल्लक खाते उघडून अनेक फायदे मिळवू शकतो. देशातील प्रत्येक विभाग बँकिंग प्रणालीशी जोडला जावा यासाठी ही योजना खास सुरू करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या:
'या' योजनेच्या माध्यमातून करता येते 70 लाख रुपयांची कमाई, जाणून घ्या सविस्तर माहिती
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)