एक्स्प्लोर

दुष्काळ कुठलाही असो, शेतकऱ्याला मारतोच...!

तथाकथित कृषिप्रधान देशात वावरताना शेतकऱ्याचा मुलगा या नात्याने शेती विषयाशी संबंधित रोज किमान एक तरी प्रश्न माझ्या समोर उभा राहतोच. रोजगारासाठी शहरांमध्ये विस्थापित झालेली माझ्यासारखी अनेक कृषकांची पोरं भलेही प्रत्यक्षरित्या शेतीपासून दूर आहेत, मात्र प्रत्यक्ष शेतीशी जुळलेल्या आमच्या माय-बापांच्या निसर्गाप्रतीच्या रोजच्या केविलवाण्या मागण्या आम्हाला रोजच आमच्या शेतात घेऊन जातात. पाऊस नसला की-  'आरं बाबा, पाण्याचा टीपूस नाही, पाण्यासाठी जीव तराय-तराय झालाय, तिकडं हाय रं पाऊस', 'जनावरांचं लई हाल व्हयल्यात बघ पाण्याबिगर' अशी वाक्य कोरड्या शुष्क दुष्काळात माय-बापांच्या तोंडून ऐकून हैराण होण्याखेरीज मी काहीच करू शकत नाही. कस तरी जीव लाऊन पिकं हाता-तोंडाशी आली की पावसाची झड थांबता थांबत नाही. अन मग रानातच आख्खं पिक गळपाटून जात. कुणी पुराच्या पाण्यात वाहून गेलं, कुणी वीज पडून मेलं, कुणाची घरं पाण्यात बुडाली, गावांचा संपर्क तुटला अशा बातम्या वाचून आम्ही हैराण होतो. दुष्काळ ओला असो की कोरडा तो शेतकऱ्यांना मात्र मारतोच. पण या दोन्ही दुष्काळानंतर एक नवा दुष्काळ तयार होतो. तो असतो 'राजकीय दुष्काळ'. आणि हा दुष्काळ या दोन्ही नैसर्गिक दुष्काळांपेक्षा जास्त खतरनाक आहे. दुष्काळ. हा एकच शब्द अनेक शेतकऱ्यांचे जीव घेतो. शेतकरी शेती कसा जगवतो? या प्रश्नाचं खरं उत्तर त्या शेतकऱ्यांकडेच असते. अर्थातच शेतकऱ्यांनी देखील शेतीच्या पारंपारिक पद्धतींना फाटा देऊन आधुनिक तंत्रज्ञान उपयोगात आणायला हवेच. आणि अनेक शेतकरी याचा अवलंब करून आज हायटेक शेती करताहेत देखील. पण हा वर्ग खूप कमी आहे. शेतकऱ्याने स्वतःत बदल करणं हे पहिलं महत्वाचं पाऊल आहे. दोन प्रकारचे दुष्काळ ज्याला कारणीभूत निसर्ग आहे. तरीही या दोन्ही प्रकारच्या दुष्काळाच्या मुळाशी मात्र माणूस हाच प्राणी आहे.  या दोन्ही प्रकारच्या दुष्काळाने शेतकरी पिचून जातो. पुढच्या अनेक वर्षांचे आर्थिक गणित एका झटक्यात मोडले जाते. मग शेतकऱ्यांसमोर पर्याय उरत नाही. आपल्या इथल्या कर्जप्रणालीच्या विळख्यासमोर तो हतबल होतो अन मृत्यू हाच एकमेव पर्याय मानून तो दोर गळ्याला लावून घेतो.  आत्महत्या निश्चितच चुकीचा पर्याय आहे. दुष्काळ, शेतकऱ्यांचे मरण या गोष्टींवर पर्याय म्हणून सरकारने पॅकेज नावाचं एक लॉलीपॉप तयार केलेय. दुष्काळ येतो, शेतकरी मरतो अन मग हा तिसऱ्या प्रकारचा 'राजकीय दुष्काळ' उदयास येतो. दुष्काळ पडला, पूर आला, शेत वाहून गेलं की अनेक पॅकेजेसेची घोषणा केली होते. यावेळी मग झिरपा सिद्धांत सुरु होतो. पैसा सर्वत्र विखरून टाकण्याऐवजी तो एक-दोन जागीच पेरला तर त्याचा लाभ घेणं सोपं जातं, असं राज्यकर्त्यांचं मत आहे. शेतकऱ्यांसाठी आलेला मदत निधी झिरपत खाली येतो, या अर्थाने इथे झिरपा सिद्धांत. मदतीचा गवगवा केला जातो, चेक वितरणाचे फोटो व्हायरल केले जातात. या मदतीने शेतकऱ्यांच्या आयुष्यात विशेष काय फरक पडतो हे त्या शेतकऱ्यालाच माहिती. ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’या सिनेमातील निळू फुलेंच्या तोंडचा एक संवाद असाच डोळ्यांच्या झापड्या उघडतो. आत्महत्या केल्यावर नेत्याच्या एक लाख रुपयांच्या आश्वासनानंतर हजार-दोन हजारांसाठी मेलेल्या पोरासाठी तो बाप त्या नेत्याला म्हणतो की, ‘साहेब, मरायचे एक लाख दिले, जगण्यासाठी हजार-दोन हजार दिले असते तर बरं झालं असतं!’  हे चित्र भलेही काल्पनिक उभारलं गेलं असेल मात्र त्यातली वास्तविकता आपल्या इर्द-गिर्द फिरत असते. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, त्यांच्या समस्यांना राजकीय अजेंडा बनवून राजकारण केलं जात. जुन्या सरकारच्या काळात हीच स्थिती होती. आता नव्या सरकार स्थापनेनंतर देखील शेतकऱ्यांच्या आत्महत्येची झड कायम आहे. राजकीय पुढारी या सगळ्या गोष्टी माहित असूनही मग फुकट पब्लिसिटीचा फंडा वापरत बेताल वक्तव्ये झाडतात. शेतकऱ्यांविरोधी अत्यंत बेताल अशी वक्तव्य करून 'माझ्या वक्तव्याच्या मिडीयाने विपर्यास केला, मला असं म्हणायचं नव्हतं. जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो' अस म्हणून आपली ऐशोआरामाची जिंदगी जगत राहतात. आजवर अनेक महत्वाच्या नेत्यांनी अशी वादग्रस्त वक्तव्ये केली आणि मग सामाजिक स्तरांतून टीकेचा भडीमार झाल्यावर माफीही मागितली. काहींना वक्तव्यांमुळे खुर्ची सोडून नंतर आत्मक्लेश देखील करावा लागलाय. तरीदेखील प्रक्रियेनुसार निवडणुका येतात आणि अशा अनेक लोकांना आपण लोकशाही पद्धतीने निवडून देतो आणि ते पदावर बसतात. आता जसा मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने कहर सुरु केलाय अगदी तसाच काही महिन्यांपूर्वी बीड, परभणी, लातूर, उस्मानाबाद, सोलापुरात खूप वर्षांनंतर म्हणण्यापेक्षा जबरी गारा पडल्या आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. शेतकऱ्यांची सगळी स्वप्नं उद्ध्वस्त झाली. एका वृत्तवाहिनीचा प्रतिनिधी एका शेतकऱ्याला प्रश्न विचारात होता. त्याच्याकडे त्याची उत्तरंच नव्हती. उलट त्याचेच कितीतरी जळजळीत प्रश्न होते. शेतकरी डोळ्यांत आसवं अन् उरात दुःख घेऊन मुलाखत देत होता. पावसाने त्याच्या स्वप्नांची राख केलेली होती. हजारो दुर्दैवी शेतकऱ्यांचंच प्रतिनिधित्व करत एक साधा प्रश्न एका शेतकऱ्याने मुलाखत घेणाऱ्याला विचारला होता की, ‘सरकार काही मदत करेल का ओ?’ या प्रश्नावर तो प्रतिनिधी एकदमच गप्प बसला. हा प्रश्न कोरडा आणि ओला दुष्काळ भोगलेल्या शेतकऱ्याचा होता. त्याच्या या प्रश्नाच्या उत्तरातून तिसऱ्या प्रकारचा राजकीय दुष्काळ जन्मला आहे, हे मात्र त्याला माहित नसावे. आणि माहिती असले तरीही नैसर्गिक दुष्काळाप्रमाणे या दुष्काळापुढेही तो अद्याप तरी हतबलच आहे. या राजकीय दुष्काळावरचा तारणहार कोण? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi and Meloni: मोदी अँड मेलोनी इन रोम! पंतप्रधान मोदी आणि मेलोनींचे फोटो इंटरनेटवर व्हायरल
PM Modi and Meloni: मोदी अँड मेलोनी इन रोम! मोदींनी मेलोनींशी मारल्या गप्पा, खास फोटोसेशन, इंटरनेटवर जोरदार हवा
Beed Crime Walmik Karad: तुरुंगात वाल्मिक कराडची प्रकृती ढासळली, तीन दिवसांपासून सलाईनवर, नेमकं काय झालं?
मोठी बातमी: तुरुंगात वाल्मिक कराडची प्रकृती ढासळली, तीन दिवसांपासून सलाईनवर, नेमकं काय झालं?
Chemist Strike : औषध विक्रेत्यांचा आज देशव्यापी संप, अनेक शहरांतील मेडिकल्स आज बंद; औषध विक्रेत्यांच्या नेमक्या मागण्या काय?, A टू Z माहिती
औषध विक्रेत्यांचा आज देशव्यापी संप, अनेक शहरांतील मेडिकल्स आज बंद; औषध विक्रेत्यांच्या नेमक्या मागण्या काय?, A टू Z माहिती
Watermelon Death Case Mumbai Family News: कलिंगड खाऊन एकाच कुटुंबातील 4 जणांच्या मृत्यू प्रकरणात आतापर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट; पोलिसही चक्रावले, नेमकं काय समोर आलं?
कलिंगड खाऊन मृत्यू प्रकरणात आतापर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट; पोलिसही चक्रावले, नेमकं काय समोर आलं?

व्हिडीओ

Inflation Hike : पेट्रोल, पाव, सोनं-चांदी, रूपया... सगळचं महागलं Special Report
Manisha Mandhare Neet Paper Leak : मांढरे मॅडमची युक्ती,  पेपरफुटीसाठी स्मरणशक्ती Special Report
RCC Shivraj Motegaonkar NEET Exam : मोटेगावकचे धंदे विद्यार्थ्यांचे वांदे Special Report
Bandra Garib Nagar Encroachment Crackdown : अतिक्रमणावर अटॅक, मोकळे रेल्वे ट्रॅक Special Report
Bandra Slum Home Demolition : बांद्रा पूर्वेला स्टेशन परिसरात अनधिकृत घरांवर बुलढोझर

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi and Meloni: मोदी अँड मेलोनी इन रोम! पंतप्रधान मोदी आणि मेलोनींचे फोटो इंटरनेटवर व्हायरल
PM Modi and Meloni: मोदी अँड मेलोनी इन रोम! मोदींनी मेलोनींशी मारल्या गप्पा, खास फोटोसेशन, इंटरनेटवर जोरदार हवा
Beed Crime Walmik Karad: तुरुंगात वाल्मिक कराडची प्रकृती ढासळली, तीन दिवसांपासून सलाईनवर, नेमकं काय झालं?
मोठी बातमी: तुरुंगात वाल्मिक कराडची प्रकृती ढासळली, तीन दिवसांपासून सलाईनवर, नेमकं काय झालं?
Chemist Strike : औषध विक्रेत्यांचा आज देशव्यापी संप, अनेक शहरांतील मेडिकल्स आज बंद; औषध विक्रेत्यांच्या नेमक्या मागण्या काय?, A टू Z माहिती
औषध विक्रेत्यांचा आज देशव्यापी संप, अनेक शहरांतील मेडिकल्स आज बंद; औषध विक्रेत्यांच्या नेमक्या मागण्या काय?, A टू Z माहिती
Watermelon Death Case Mumbai Family News: कलिंगड खाऊन एकाच कुटुंबातील 4 जणांच्या मृत्यू प्रकरणात आतापर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट; पोलिसही चक्रावले, नेमकं काय समोर आलं?
कलिंगड खाऊन मृत्यू प्रकरणात आतापर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट; पोलिसही चक्रावले, नेमकं काय समोर आलं?
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंची 25 वी बदली, आता अन्न आणि औषध प्रशासनात आयुक्त, FDA तील भ्रष्ट कारभाराला आळा घालण्याचं आव्हान
तुकाराम मुंढेंची 25 वी बदली, आता अन्न आणि औषध प्रशासनात आयुक्त, FDA तील भ्रष्ट कारभाराला आळा घालण्याचं आव्हान
Punjabi Singer Inder Kaur: गन पॉईंटवर किडनॅप केलं, 6 दिवस बेपत्ता असलेल्या सुप्रसिद्ध गायिकेचा दुर्दैवी अंत, कालव्यात सापडला मृतदेह
लग्नाला नकार दिल्यामुळे संपवलं, सुप्रसिद्ध गायिकेचा दुर्दैवी अंत; 6 दिवसांनी कालव्यात सापडला मृतदेह
PM Modi and Meloni: वेलकम टू रोम, माय फ्रेंड! मोदींसोबत सेल्फी, जॉर्जिया मेलोनींची पोस्ट व्हायरल
PM Modi: वेलकम टू रोम, माय फ्रेंड! पंतप्रधान मोदी आणि जॉर्जिया मेलोनींचा सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल
कोकण विधानपरिषदेसाठी महायुतीत चुरस, अनिकेत तटकरे की विकास गोगावले? उमेदवारीवर जोरदार चर्चा
कोकण विधानपरिषदेसाठी महायुतीत चुरस, अनिकेत तटकरे की विकास गोगावले? उमेदवारीवर जोरदार चर्चा
Embed widget