एक्स्प्लोर

BLOG | आमच्या देशात रॉकस्टार का निर्माण होत नाहीत?

जिथे सिनेमा आणि त्यातील संगीत हे लोकांना वास्तवापासून दूर कल्पनेच्या जगात नेण्यासाठी असतं, तिथे लोकांना मुस्कटात मारून वास्तवात आणत वेगळी दृष्टी देणारा जॉन लेनन किंवा बॉब डिलन का जन्माला यावा?

भारतात रॉकबँड किंवा पॉपस्टार का निर्माण होत नाहीत यावर मी आज एका मैत्रिणीला माझं आकलन सांगत होतो. अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलियातही रॉकस्टार आणि पॉपस्टारचं एक जुनं कल्चर आहे. बीटल्स, पिंक फ्लॉयड, क्वीन, लिंकीन पार्क, U2, रोलिंग स्टोन्स, AC/DC सारखे बँड आणि मायकेल जॅक्सन, बॉब डीलन, एल्टन जॉन सारखे गीतकार/संगीतकार आणि गायक येथे जन्माला आले आणि जगभर गाजले. दक्षिण अमेरिकन देशांतही आणि दक्षिण कोरियातही पॉपची धूम आहे. K-पॉप मधल्या Gangnam Style या गाण्याने YouTube वर धुमाकूळ घातला, तीच धूम Despacito या लुई फॉंसीच्या लॅटिन गाण्याची! एनरीकेची स्पॅनिश गाणीही जगभर गाजली, ज्यातला एकही शब्द न कळता आम्ही ती 20 वर्षांपूर्वी ऐकत होतो. भारतातही आलिशा चिनॉय, हरिहरन-लेसली, लकी अली, सिल्क रुट, युफोरिया, इंडियन ओशन वगैरे स्टार्सनी आणि बँडनी एक छोटा काळ गाजवला, पण त्यांच्यापैकी कुणालाही पाश्चिमात्य जगातल्या रॉकस्टार, पॉपस्टार लोकांच्या जवळपासही जाता आले नाही. पेल्यातल्या वादळासारखे ह्या लोकांचे काम इथेच मोजक्या संख्येच्या तरुण पिढीपर्यंत पोचले आणि विरून गेले. याला एक महत्वाचं कारण म्हणजे पाश्चिमात्य सिनेमात गाणी हा प्रकार अभावानेच असतो, तर भारतीय सिनेमा गाण्यांशिवाय बनूच शकत नाही. काही सिनेमे तर फक्त गाण्यांवरच चालतात, भले त्याला काही स्टोरी असो किंवा नसो. जिथे गाण्यांचा एवढा मोठा रतीब सिनेमे घालत असतील तिथे बाहेर कुणी कशाला वेगळी गाणी बनवायचा प्रयत्न करेल? इंग्रजी, कोरियन किंवा लॅटिन पॉप आणि रॉक मध्ये जी गाणी जगभर गाजली आहेत त्यांच्यात तीन गोष्टी प्रकर्षाने समान आहेत...उत्कृष्ट संगीत, अर्थपूर्ण गीत आणि अप्रतिम नृत्य किंवा सादरीकरण. तिकडचा प्रत्येक बँड किंवा कलाकार स्वतःची संगीताची शैली, वेगळा आवाज आणि वाद्यकौशल्य बाळगून आहे. त्यामुळे तिकडे वेगवेगळे प्रयोग करायला वाव असतो आणि लोकांना सतत नवीन काहीतरी ऐकायला मिळते. याउलट आपल्याकडे एखाद्या संगीतकाराचे नाव झाले की मग तो आणि त्याचे नेहमीचे गायक, वादक परतपरत त्याच यशस्वी फॉर्म्युलातली गाणी लोकांच्या माथी मारत राहतात. आपल्या एकेका पिढीने अवघ्या 4-5 गायक किंवा गायिकांची गाणी ऐकत हयात घालवलेली आहे. जुन्या पिढीसाठी ही यादी रफी, किशोर, मुकेश, लता, आशा या गायकांवर थांबते. नवीन काही येणार कसं? गीतांच्या बाबतीत बोलायचं झालं तर पाश्चात्य गाण्यांचे गीतकार असंख्य विषयांना स्पर्श करून जातात. राजकीय व्यवस्था, युद्ध, जागतिक शांतता, मानवी हक्क, स्वातंत्र्य, समता, समलैंगिकता, सेक्स, विश्वबंधुत्व, गुन्हेगारी, वर्णभेद, फेमिनिझम, शिक्षणव्यवस्था, कालानुरूप बदलते राहणीमान, बदलते नातेसंबंध यासारखे असंख्य धाडसी मुद्दे गीतांमधून मांडतात. Blowing in the wind, black or white, they don't really care about us, another brick in the wall, candle in the wind, Bohemian rhapsody या गाण्यांचे शब्द ऐकले तर आपल्याला आपल्या भारतीय गाण्यांच्या विषयाबद्दल दया येते. लोकांच्या प्रत्यक्ष आयुष्याशी संबंधित एकही गाणे आपल्या देशात कुणी लिहीत नाही आणि म्हणतही नाही! आमच्या देशातले सिनेमे प्रेम आणि देशभक्ती सोडून दुसऱ्या कुठल्याच विषयाला हात लावत नाहीत. आमचं प्रेम पण एकदम खानदानी आणि संस्कारी, त्यामुळे नटीला पटवणे, तिच्या सौंदर्याची तारीफ करणे किंवा ती सोडून गेल्यावर रडत बसणे हे तीन मूड सोडून चौथे काही गाणेच मिळतच नाही, कारण असे गाणे बनवायला कुठला सिनेमाचं इतर विषयांवर बनत नाही. आमच्या देशात रूढीपरंपराच्या विरुद्ध विद्रोह करणे हे गेले 70 वर्षे कुणाच्या रक्तातच नाही, त्यामुळे इथे कुणी कशाला त्यावर सिनेमा बनवेल, आणि त्यावर गाणे लिहील? आमच्या देशातला दळभद्री सिनेमा, त्यात दाखवले जाणारे भिकार रडके प्रेम आणि त्यास कसलीही कुरकुर न करता पाहणारे लोक हे सार्वकालिक सत्य आहे. जिथे सिनेमा आणि त्यातील संगीत हे लोकांना वास्तवापासून दूर कल्पनेच्या जगात नेण्यासाठी असतं, तिथे लोकांना मुस्कटात मारून वास्तवात आणत वेगळी दृष्टी देणारा जॉन लेनन किंवा बॉब डिलन का जन्माला यावा? डॉ. विनय काटे यांचे अन्य काही ब्लॉग  BLOG | दिल्लीचा Serological Survey काय सांगतो? भारतीय जनतेचं संज्ञान असंतुलन - 'मोदी व गांधी'

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
Devendra Fadnavis on OBC Census: मोठी बातमी : एका कमांडवर ओबीसींची लोकसंख्या हातात येणार, जातीगत जनगणना स्वागतार्ह : देवेंद्र फडणवीस
मोठी बातमी : एका कमांडवर ओबीसींची लोकसंख्या हातात येणार, जातीगत जनगणना स्वागतार्ह : देवेंद्र फडणवीस
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
Embed widget