एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

BLOG : कोविड गुरुजी, आम्हाला माफ करा!

कालच्या 9 मार्चला महाराष्ट्रातील पहिली कोविड केस आढळून 2 वर्षे पूर्ण झाली. कोविड पॅन्डेमिक ही मानवी इतिहासातील एक अभूतपूर्व घटना आहे. मानव प्राणी हा पृथ्वीतलावरील सर्वात बुद्धिमान प्राणी आहे, असे मानले जाते. अर्थात हे आपलं कौतुक आपण मानवच करत असतो. कोविड पॅन्डेमिकमधून या बुध्दिमान माणसाने काय बोध घेतला, हे ही या टप्प्यावर समजावून घ्यायला हवे.

मागील दोन वर्षांमध्ये जगभरात साडेचार कोटीहून अधिक लोकांना कोविडची बाधा झाली आणि 60 लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू या महामारीमध्ये झाला आहे. आणि अजूनही ही महामारी धड संपलेली देखील नाही आणि या महामारीमध्ये मेलेली माणसे, या महामारीमुळे झालेले आर्थिक नुकसान कमी आहे म्हणून की काय, या बुद्धिमान मानवी जातीतील एक देशाने म्हणजे रशियाने युक्रेनवर आक्रमण केले आहे. रोज शेकडो माणसे मरत आहेत.आंतरराष्ट्रीय टेन्शन इतके वाढते आहे की जग आण्विक युध्दाच्या उंबरठ्यावर येऊन थांबले आहे की काय, अशी भीती वाटते आहे. आता तेलाच्या किमती वाढून जगभरातील आर्थिक व्यवस्था अजून डबघाईस येईल, ते वेगळेच. युनो, नाटो, युरोपियन युनियन सारख्या आंतरराष्ट्रीय यंत्रणा प्रयत्न तर करताहेत पण… काहीच सकारात्मक घडत नाही.

कोणता बुध्दिमान प्राणी महामारीच्या काळात असे युद्ध नाहक सूरु करु शकतो? 1918 च्या स्वाईन फ्ल्यू पॅन्डेमिकमुळे पहिले महायुध्द संपले, असे मी अभ्यासले होते. पण यावेळी उलटेच घडले. मागील शंभर वर्षात मानवी बुध्दिमत्तेमध्ये झालेली ही वाढ कौतुकास्पदच आहे.

कोविड महामारीमुळे आपल्याकडील शाळा कॉलेज मागील दोन वर्षापासून बंद होत्या. यामुळे परिघावरील समाजातील खूप मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर पडली आहेत. उगवत्या पिढीचे भवितव्य यामुळे संकटात सापडले आहे. आपण आपली एक पिढीच महामारीच्या शिक्षणावर झालेल्या परिणामामुळे गमावत असल्याची भीती अनेक तज्ञांनी व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत आता कुठं शाळा कॉलेज सुरू होत असताना आपल्याकडे कर्नाटकात हिजाब प्रश्न उपस्थित होऊन त्या वादात शाळा कॉलेज काही काळ बंद ठेवण्याची वेळ आली. वाद एवढा पेटला की, त्यात एका तरुण मारला गेला. खरे म्हणजे, असे सारे वाद बाजूला ठेवून शाळा कॉलेज सुरळीत सुरु होणे आवश्यक असताना आपण सारेच नको त्या वादात अडकून पडलो. असे वाद सहमतीने सोडवून मुलांच्या शाळा कॉलेज नीट सुरु करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला हवे होते. पण झाले ते भलतेच! महामारीतून आपण शिकतो ते असे आणि तरीही आपण मानव बुद्धिमान? 

युक्रेन युध्दामुळे भारतीय मुले वैद्यकीय शिक्षणासाठी  देशाबाहेर का जात आहेत, हा महत्त्वाचा प्रश्न किमान उपस्थित झाला. जसे काही हे आपल्याला पहिल्यांदाच कळाले. कोविड आजाराचे  आपल्या देशातील पहिले काही रुग्ण हे केरळमधून वैद्यकीय शिक्षणासाठी चीनमध्ये गेलेली मुले होती. तेव्हा जणू हा विषय आपल्या गावीही नव्हता. आणि आज अचानक हा विषय आपल्या ध्यानी आला. हरकत नाही, देर आये दुरुस्त आये, पण आता तरी शिक्षणसम्राटांच्या, कार्पोरेटच्या दावणीला बांधलेले वैद्यकीय शिक्षण आपण मुक्त करणार आहोत का? तशी आपली राजकीय आणि सामाजिक इच्छाशक्ती आहे का? 

नुकत्याच आपल्याकडे पाच राज्यात निवडणुका झाल्या. कोविड महमारीच्या छायेत या निवडणुका होत असल्याने या निवडणुकीच्या निमित्ताने सार्वजनिक आरोग्य या विषयावर साधक बाधक चर्चा होईल ,अशी अनेकांची अपेक्षा होती. पण असे काहीच झाले नाही. या साऱ्या निवडणुकींच्या भाषणामध्ये, माध्यमावरील चर्चेमध्ये, विविध राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये सार्वजनिक आरोग्याचा विषय अपवादानेच चर्चेला आला. एवढ्या मोठ्या आरोग्य विषयक संकटातून आपण जात असताना देखील आरोग्यविषयक भविष्यकालीन नियोजन आपल्या सार्वजनिक चर्चेचा महत्त्वाचा विषय होऊ नये, याला काय म्हणावे? 

गरज सरो वैद्य मरो, अशी म्हण का पडली असावी, असा प्रश्न मला नेहमी पडतो. केवळ वैद्यच नव्हे तर गरज संपली की, आख्ख्या सार्वजनिक आरोग्याचा विसर आपल्याला पडतो, असे दिसते आहे. आणि तरीही आपण पृथ्वीतलावरील सर्वाधिक बुद्धिमान प्राणी आहोत, कोई शक?

सॉरी टू से, पण कोविडने शिकवलेले धडे खरेच आपण मनापासून गिरवतो आहोत का? 

हे युद्ध, हे विनाकारण उभे केलेले वाद, आजही एक समाज म्हणून सार्वजनिक आरोग्याकडे आपण करत असलेले दुर्लक्ष हे पाहिले तर आपण हात जोडून एकच वाक्य नम्रपणे म्हणू शकतो, 

कोविड गुरुजी, आम्हाला माफ करा!

(फेसबुकवरुन साभार)

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dombivli MIDC Blast : आईची नजर मुलाच्या वाटेकडे, 15 दिवसांपासून वयोवृद्ध आई बघतेय मनोजची वाट; डोंबिवली स्फोटात झाला बेपत्ता
आईची नजर मुलाच्या वाटेकडे, 15 दिवसांपासून वयोवृद्ध आई बघतेय मनोजची वाट; डोंबिवली स्फोटात झाला बेपत्ता
Rahul Gandhi : खोट्या एक्झिट पोलचा शेअर मार्केटवर परिणाम, पीएम मोदी-अमित शाहांचा थेट सहभाग; राहुल गांधींचा गंभीर आरोप, जेपीसी चौकशीची मागणी
खोट्या एक्झिट पोलचा शेअर मार्केटवर परिणाम, पीएम मोदी-अमित शाहांचा थेट सहभाग; राहुल गांधींचा गंभीर आरोप, जेपीसी चौकशीची मागणी
मोदी हेच पंतप्रधान, महाराष्ट्रासाठी मंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला?; नितीश कुमार अन् चंद्राबाबूंना 'मोठं पॅकेज'
मोदी हेच पंतप्रधान, महाराष्ट्रासाठी मंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला?; नितीश कुमार अन् चंद्राबाबूंना 'मोठं पॅकेज'
Shrikant Shinde : इकडं नव्या खासदारांना मुख्यमंत्र्यांकडून सूचना अन् तिकडं  खासदार श्रीकांत शिंदेंच्या खांद्यावर मोठी जबाबदारी!
इकडं नव्या खासदारांना मुख्यमंत्र्यांकडून सूचना अन् तिकडं श्रीकांत शिंदेंच्या खांद्यावर मोठी जबाबदारी!
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : Maharashtra News Update : 06 PM : 06 June 2024 : एबीपी माझा हेडलाईन्सPankaja Munde Beed : पराभवानंतर पंकजा मुंडेंच्या घरी समर्थकांची रिघ; कार्यकर्त्यांना अश्रू अनावरTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 06 PM : 06 June 2024 : ABP MajhaBajrang Sonawane Mumbai : देशात मोदींची गॅरंटी चालली नाही, बीडमध्ये काय चालणार? -बजरंग सोनावणे

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli MIDC Blast : आईची नजर मुलाच्या वाटेकडे, 15 दिवसांपासून वयोवृद्ध आई बघतेय मनोजची वाट; डोंबिवली स्फोटात झाला बेपत्ता
आईची नजर मुलाच्या वाटेकडे, 15 दिवसांपासून वयोवृद्ध आई बघतेय मनोजची वाट; डोंबिवली स्फोटात झाला बेपत्ता
Rahul Gandhi : खोट्या एक्झिट पोलचा शेअर मार्केटवर परिणाम, पीएम मोदी-अमित शाहांचा थेट सहभाग; राहुल गांधींचा गंभीर आरोप, जेपीसी चौकशीची मागणी
खोट्या एक्झिट पोलचा शेअर मार्केटवर परिणाम, पीएम मोदी-अमित शाहांचा थेट सहभाग; राहुल गांधींचा गंभीर आरोप, जेपीसी चौकशीची मागणी
मोदी हेच पंतप्रधान, महाराष्ट्रासाठी मंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला?; नितीश कुमार अन् चंद्राबाबूंना 'मोठं पॅकेज'
मोदी हेच पंतप्रधान, महाराष्ट्रासाठी मंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला?; नितीश कुमार अन् चंद्राबाबूंना 'मोठं पॅकेज'
Shrikant Shinde : इकडं नव्या खासदारांना मुख्यमंत्र्यांकडून सूचना अन् तिकडं  खासदार श्रीकांत शिंदेंच्या खांद्यावर मोठी जबाबदारी!
इकडं नव्या खासदारांना मुख्यमंत्र्यांकडून सूचना अन् तिकडं श्रीकांत शिंदेंच्या खांद्यावर मोठी जबाबदारी!
दादा म्हणाले, तुला बघतोच, आता बजरंग बप्पा म्हणतात, बघा मी निवडून आलोच : बजरंग सोनवणे 
दादा म्हणाले, तुला बघतोच, आता बजरंग बप्पा म्हणतात, बघा मी निवडून आलोच : बजरंग सोनवणे 
Kangana Ranaut : विमानतळावर CISF च्या महिला जवानने कानशिलात लगावली; कंगना रणौतचा आरोप
विमानतळावर CISF च्या महिला जवानने कानशिलात लगावली; कंगना रणौतचा आरोप
मोठी बातमी : किरण सामंत निवडणूक काळात उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंना भेटले, निलेश राणेंचा खळबळजनक दावा
मोठी बातमी : किरण सामंत निवडणूक काळात उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंना भेटले, निलेश राणेंचा खळबळजनक दावा
Nilesh Rane : पालकमंत्री असूनही उदय सामंत लीड देऊ शकले नाहीत, राणे कधीही माफ करणार नाहीत; निलेश राणेंचा इशारा
पालकमंत्री असूनही उदय सामंत लीड देऊ शकले नाहीत, राणे कधीही माफ करणार नाहीत; निलेश राणेंचा इशारा
Embed widget