एक्स्प्लोर

BLOG | पोलीस पण माणूसच आहे!

पोलिसांची कामावर येण्याची वेळ ठरलेली असते, मात्र जाण्याची वेळ रोज एकसारखी असेलच असे नाही. अशा सेवेत ते काम करतायत की कर्तव्यावर असताना घरी जायची वेळ निश्चित नाही, तरीही कुणाला तक्रार न करता ते आपली नोकरी बजावत असतात.

>> संतोष आंधळे, वरिष्ठ संपादक, माय मेडिकल मंत्रा

सध्या संपूर्ण जगाला हैराण करून सोडणाऱ्या कोरोनाशी मुकाबला करायची जबाबदारी सगळ्यांचीच आहे. अख्ख्या भारताला लॉकडाऊनचे आदेश असूनही अनेकवेळा काही 'टगे' केवळ हिंडण्याकरता बाहेर पडून पोलिसांची डोकेदुखी वाढवण्याचं काम करत आहे. पोलीस त्यांच्याप्रमाणे परिस्थिती हाताळत आहे. कधी प्रेमाने, तर कधी कडक शिस्तीचा धाक दाखवून या टवाळखोरांना वेळप्रसंगी चांगलाच 'प्रसाद' देण्याचं काम करत आहेत. मात्र या सध्याच्या भयभीत वातावरणात त्यांना कायदा-सुव्यवस्था राखताना जनतेच्या रोषालाही सामोरे जावं लागत आहे. जेव्हा भारतातील प्रत्येक जण (अत्यावश्यक सेवेतील यंत्रणेत काम करणारे सोडून) आपल्या घरात कुटुंबियांची काळजी घेत दोन महिन्यांचा किराणा घेण्यात 'बिझी' होते तेव्हा हाच पोलीस कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रस्त्यावर जगता पहारा देत होता. त्याच्या घरातील किराणा कुणी भरला असेल, त्यालाही कुटुंब आहेच ना, आई-वडील, बायको-मुलं त्यांचं पण सगळं आपल्या सारखंच आहे.

अनेक दिवसांपासून पोलीस रस्त्यावर उभे राहून गर्दी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचे ज्याप्रमाणे लोकांना चोप देणारे विडिओ व्हायरल झाले, त्याचप्रमाणे नागरिक आणि पोलिसांशी वाद होणारे व्हिडीओ व्हायरल झालेले आपण सर्वांनीच पहिले असतील. दात-ओठ आवळून आणि शिरा-स्नायू ताणून जेव्हा एखादी कारवाई पोलीस करत असतात, तेव्हा या सगळ्या प्रक्रियेचा त्यांच्या शरीरावरही परिणाम होत असतो. यामुळे त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही आपल्या सगळ्यांचीच अपेक्षा असते की पोलिसांनी कायम दक्ष असलं पाहिजे आणि ते दक्ष राहतातही. परंतु ह्या सगळ्या परिस्थितीत त्यांच्या तब्येतीची काळजी ते स्वतःच घेत असतात.

आजच्या या काळात सर्वच पोलीस कोणतीही तक्रार न करता प्रामाणिकपणे ड्युटी बजावत आहेत. त्यांनाही घरचे सांगत असतील काळजी घ्या आणि वेळेत जेवा. या प्रेमपूर्वक सूचना घेऊन रोज पोलीस घर सोडतात, रस्त्यावर थांबतात. गर्दी हटविण्याच्या कार्यात ते सुद्धा एक गर्दीचा भाग बनून जातात. आज अनेकजण गर्दी नको म्हणून ओरड करतात कारण विषाणूचा संसर्ग टाळावा म्हणून, मग आमच्या पोलिसाला तो नियम लागू होत नाही का? त्यालाही या विषाणूचा प्रादुर्भाव होईल याची भीती त्यांना वाटत नसेल का? शेवटी पोलीस पण एक माणूस आहे हो, हा साधा विचार आपल्या मनात येत नाही का? तुम्ही जर रस्त्यावर गर्दीच केली नाही किंवा नीट अंतर ठेवून शिस्तीत सर्व खरेदी केली तर तुम्ही जसे सुरक्षित राहाल तसेच हे पोलीस पण सुरक्षित राहू शकतील.

पोलिसांची कामावर येण्याची वेळ ठरलेली असते, मात्र जाण्याची वेळ रोज एकसारखी असेलच असे नाही. अशा सेवेत ते काम करतायत की कर्तव्यावर असताना घरी जायची वेळ निश्चित नाही, तरीही कुणाला तक्रार न करता ते आपली नोकरी बजावत असतात. त्यांना वाटत नसेल का, घरी जाऊन मुलांचा अभ्यास घ्यावा किंवा कुटुंबियांशी गप्पा मारत छानसा वेळ घालवावा. पोलिसांनाही या कठीण काळात काम करत असताना स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्याची याच्या सूचना वरिष्ठ कार्यालयातून दिल्या गेल्या पाहिजे, त्या अगोदरच दिल्या असतील तर उत्तमच.

परंतु, ज्याप्रमाणे आरोग्य व्यवस्थेतील प्रत्येक जण महत्वाचा आहे, त्याच प्रमाणे पोलीस दलातील शिपाई पदापासून ते उच्च स्तरावरील अधिकारी जपण्याची जबाबदारी नागरिकांनी उचलली पाहिजे. तुम्हाला वाटत असेल की काय अतिशयोक्ती मी सांगतोय, तर ते खरं आहे. आपण जर नियम पाळून आपल्या घरात बसलो, कुठेही अनावश्यक गर्दी केली नाही तर एक प्रकारे आपण त्यांच्या कामावरील ताण थोडा तरी हलका करू शकतो. आज आपल्याला सूचना आहेत, विनाकारण प्रवास करू नका आहे. तरी देखील वाहतूक थांबत नाही. ते थांबवण्याची जबाबदारी पोलिसांचीच आहे. परत पोलीस त्या कामाला लागले. आपण सर्वांनी ठरवलं आणि प्रवास नाही केला तर पोलीस काही वेळ तरी निवांत बसू शकतील.

पोलीस बळाचा वापर तेव्हाच करतात, जेव्हा त्यांना वाटतं की नीट सांगूनही काही लोकांना काळत नाही. कोरोना तुम्ही कोणत्या सेवेत आहात, हे बघून होत नाही. जितकी भीती सर्वसामान्य नागरिकांना आहे, तितकीच पोलिसांनाही आहे. खरोखरच पोलीस आज जीवाची बाजी लावून काम करत आहेत. त्याकरिता आपण त्यांचे कितीही आभार मानले तरी कमीच आहे. देशातील सर्व स्तरातील लोकांनी पोलीस सध्या पार पडत असलेल्या कामाचं कौतुक केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यातील नागरिकांना संबोधून केलेल्या भाषणातून पोलिसांच्या कामाची प्रशंसा केली आहे. ते त्यांचं कर्तव्य जर चोख पार पडत असतील, तर मग थोडी मदत आपल्याकडून पण करायला काय हरकत आहे. चला तर मग आपण त्यांना मदत करूया, आपल्या घरी शांतपणे बसुया.

>>  या ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मतं लेखकाची वैयक्तिक मतं आहेत. लेखक संतोष आंधळे हे माय मेडिकल मंत्राचे वरिष्ठ संपादक आहेत. 

संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitesh Rane Vastav 144 : नितेश राणेंबद्दल हिंदू, मुस्लीम खाटकांना काय वाटतं? : ABP Majha
Nitesh Rane Vastav 144 : नितेश राणेंबद्दल हिंदू, मुस्लीम खाटकांना काय वाटतं? : ABP Majha
Sanjay Shirsat : लाडकी बहिणसाठी 4000 कोटी, एकूण 7 हजार कोटींचा फटका माझ्या विभागाला बसला; मंत्री संजय शिरसाट स्पष्टच बोलले
लाडकी बहिणसाठी 4000 कोटी, एकूण 7 हजार कोटींचा फटका माझ्या विभागाला बसला; मंत्री संजय शिरसाट स्पष्टच बोलले
Manikrao Kokate : मी कधीही चुकीचे काम करत नाही, माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य; न्यायालयाच्या निरीक्षणावर स्पष्टच बोलले
मी कधीही चुकीचे काम करत नाही, माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य; न्यायालयाच्या निरीक्षणावर स्पष्टच बोलले
बजरंग दल, VHP कडून इशारा; औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवली, एसआरपीएफ तैनात, प्रत्येकाची तपासणी
बजरंग दल, VHP कडून इशारा; औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवली, एसआरपीएफ तैनात, प्रत्येकाची तपासणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nitesh Rane Vastav 144 : नितेश राणेंबद्दल हिंदू, मुस्लीम खाटकांना काय वाटतं? : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 02PM TOP Headlines 02 PM 15 March 2025ABP Majha Marathi News Headlines 01PM TOP Headlines 12 PM 15 March 2025TOP 50 | टॉप 50 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitesh Rane Vastav 144 : नितेश राणेंबद्दल हिंदू, मुस्लीम खाटकांना काय वाटतं? : ABP Majha
Nitesh Rane Vastav 144 : नितेश राणेंबद्दल हिंदू, मुस्लीम खाटकांना काय वाटतं? : ABP Majha
Sanjay Shirsat : लाडकी बहिणसाठी 4000 कोटी, एकूण 7 हजार कोटींचा फटका माझ्या विभागाला बसला; मंत्री संजय शिरसाट स्पष्टच बोलले
लाडकी बहिणसाठी 4000 कोटी, एकूण 7 हजार कोटींचा फटका माझ्या विभागाला बसला; मंत्री संजय शिरसाट स्पष्टच बोलले
Manikrao Kokate : मी कधीही चुकीचे काम करत नाही, माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य; न्यायालयाच्या निरीक्षणावर स्पष्टच बोलले
मी कधीही चुकीचे काम करत नाही, माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य; न्यायालयाच्या निरीक्षणावर स्पष्टच बोलले
बजरंग दल, VHP कडून इशारा; औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवली, एसआरपीएफ तैनात, प्रत्येकाची तपासणी
बजरंग दल, VHP कडून इशारा; औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवली, एसआरपीएफ तैनात, प्रत्येकाची तपासणी
बीडमध्ये शिक्षकाने संपवले जीवन; फेसबुक पोस्ट लिहल्याने उडाली खळबळ, पोलीस तपास सुरू
बीडमध्ये शिक्षकाने संपवले जीवन; फेसबुक पोस्ट लिहल्याने उडाली खळबळ, पोलीस तपास सुरू
...तर राज्य अन् केंद्र सरकारला यात लक्ष घालण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू; शेतकरी आत्महत्येच्या मुद्यावरून शरद पवरांकडून चिंता व्यक्त      
...तर शेतकऱ्यांच्या मुद्यावर राज्य अन् केंद्र सरकारला लक्ष घालण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू; शरद पवरांकडून चिंता व्यक्त      
'योग अन् यज्ञ' हेच सनातन संस्कृतीचे प्राण तत्व; पतंजली विश्वविद्यालयात बाबा रामदेव यांच्या उपस्थितीत होलिकोत्सव साजरा
'योग अन् यज्ञ' हेच सनातन संस्कृतीचे प्राण तत्व; पतंजली विश्वविद्यालयात बाबा रामदेव यांच्या उपस्थितीत होलिकोत्सव साजरा
Karuna Sharma on Dhananjay Munde : जसे मी बोलले, धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं, आता सहा महिन्यात आमदारकीही जाणार; करुणा शर्मांचा मोठा दावा
जसे मी बोलले, धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं, आता सहा महिन्यात आमदारकीही जाणार; करुणा शर्मांचा मोठा दावा
Embed widget