एक्स्प्लोर

BLOG | ऐका, मुंबई काय सांगतेय?

सध्या या रस्त्यांवर, गल्ली बोळात, नाक्या नाक्यांवर मी जीवघेणी शांतता अनुभवतेय. निर्मनुष्य रस्ते, वाहनं जागच्या जागी स्तब्ध. काही अतिउत्साहींचा अपवाद सोडल्यास नजर जाईल तिथपर्यंत नुसते भकास रस्ते दिसतात. तेव्हा ती शांतता, तो सुन्नपणा खायला उठतो मला.

मी मुंबई बोलतेय.. कधीही न झोपणारं शहर, अशी ओळख असलेली. स्वप्ननगरी, मायानगरी मुंबई. जिथे कायम उत्साह फसफसलेला असतो, जिथे माझ्या दोन कोटी लेकरांचा गजबजाट, किलबिलाट होत असतो, काही वेळा कलकलाटही. पण, मला तो बरा वाटतो. कारण, तो माझ्या लेकरांचा असतो. सध्या तर माझ्या पोटातून तुमच्या मेट्रोची तयारीही जोरात सुरु होती.. तिलाही ब्रेक लागलाय. सध्या या रस्त्यांवर, गल्ली बोळात, नाक्या नाक्यांवर मी जीवघेणी शांतता अनुभवतेय. निर्मनुष्य रस्ते, वाहनं जागच्या जागी स्तब्ध. काही अतिउत्साहींचा अपवाद सोडल्यास नजर जाईल तिथपर्यंत नुसते भकास रस्ते दिसतात. तेव्हा ती शांतता, तो सुन्नपणा खायला उठतो मला. माझ्या अंगाखांद्यावर खेळणाऱ्या, बागडणाऱ्या मुंबईकरांची माझ्यावर उमटलेली पावलं पाहायची मला सवय. सध्या त्या पावलांचे ठसे नाहीसे झालेत. कारण एकचं. कोरोनाचा राक्षस जगभरात धुमाकूळ घालत माझ्या भारतात, महाराष्ट्रात, मुंबईत धडकलाय. एकेक करत त्याने वेटोळं करायला सुरुवात केली आणि त्याने वाटोळं केलं हो माझ्या लेकराबाळांच्या दिनक्रमाचं. एरवी घड्याळाच्या ठोक्याला घराबाहेर पडणारा मुंबईकर, रात्री उशीरापर्यंत घरी येऊन थडकायचा. सध्या तो त्याच्या लेकराबाळांसह घरीच अडकून पडलाय. सध्या ते गरजेचंही आहे म्हणा. या कोरोनाची साखळी तोडायची असेल तर मुंबईसह भारतातील जनतेने एकजुटीची अखंड साखळी निर्माण केली पाहिजे. घरी राहिलं पाहिजे. गर्दी नकोच करायला. तरी तुमच्यातले काही जण गर्दी करताना दिसतायत. भाजी मार्केटमधली बातमी मी पाहिली, आणि बँकांसमोरच्या रांगांचीही..

काय हो हे..कशाल करताय असं?, अहो, आपल्या पंतप्रधान मोदी साहेबांनी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी कितीदा सांगितलं, तुम्हाला जीवनावश्यक वस्तुंची दुकानं, भाजीपाला, मेडिकलची दुकानं उघडी असणार आहेत, तरी असं का करता रे. गर्दी टाळा बाबांनो, हात जोडून सांगते. घरीच राहा आणि घरीच राहून तुमच्या मुलाबाळांना, आईबाबांना वेळ द्या जरा. एरवी आपल्या आईबाबांनाही फक्त येतो, फोन करतो असं म्हणण्यापुरते भेटता तुम्ही. फोनवरुन तब्येतीची विचारपूस करता. सध्या जरा वेळ मिळालाय तर आईबाबांसोबत प्रेमाने बसा, बोला. त्यांचे आईबाबा होण्याची ही उत्तम वेळ आहे. त्यांच्या खांद्यावर तुम्ही टाकलेला एक हात त्यांना सुरु असलेल्या औषधापेक्षा मोठा गुणकारी असेल. तुमच्या बायकोला, जी तुमच्यासाठी राब राब राबते अगदी घरातल्या किचनपासून ते तिच्या ऑफिसच्या डेस्कपर्यंत. तिच्याशी बोला, तिला सांगा. छान झालंय जेवण. तू खूप करतेस माझ्यासाठी. असं नुसतं म्हणा तिला, तुमच्यासाठी पुन्हा पदर खोचून झोकून देईल ती सर्वस्व. तुमच्या मुलाबाळांनाही वेळ द्या. खास करुन लहान लहान मुलांना. एरवी लवकर जाऊन उशीराने येणारा बाबा त्यांना पाहायला मिळतो. जरा त्यांच्याशी खेळा, त्यांच्या विश्वात रमा. बघा, किती सकारात्मक ऊर्जा मिळेल ते.

त्याच वेळी अशा अडचणीच्या काळात आपले जीव वाचावेत म्हणून त्यांचे जीव धोक्यात घालून, त्यांच्या रडू कोसळणाऱ्या लेकरांना, कुटुंबियांना घरीच सोडून ड्युटीवर येणाऱ्या पोलीस दलाला, सुरक्षा यंत्रणेतील सर्व अधिकारी, कर्मचारी, या आरोग्याच्या लढाईत तुमची ढाल बनून कोरोना नावाच्या शत्रूचा पहिला वार अंगावर झेलणाऱ्या डॉक्टरांसह वैद्यकीय यंत्रणेतील सर्व कर्मचाऱ्यांना, सफाई कर्मचारी, वीजेचा सप्लाय 24 तास राहण्यासाठी राबणारे, फायर ब्रिगेडचे जवान, राज्याचे, देशाचे कारभारी, अधिकारी, अत्यावश्यक सेवेतील मंडळींना साऱ्यांनाच सॅल्यूट ठोका.

तसं आपण थाळीनाद, टाळीनाद केला अन् केलं त्यांच्या योगदानाला वंदन. पाहिलं मी. अन् तुम्ही एकजुटीचे दिवे प्रज्ज्वलित केले, तेही पाहिले. (काही अतिउत्साही लोकांनी बडवलेल्या थाळ्या, पत्रे, उजळलेले अकलेचे दिवेही पाहिले बरं का?) असो. पुढे सांगते..केवळ कोरोना काळातच नव्हे तर एरवी सणवारात जेव्हा तुम्ही कुटुंबियांसमवेत एन्जॉय करत असता, तेव्हाही ही अत्यावश्यक सेवेतील मंडळी आपल्यासाठी ड्युटी बजावत असतात. त्यांना मनापासून वंदन करा. सांगा, त्यांना हे युद्ध तुम्ही फिल्डवर राहून लढताय, आम्ही घरात राहूनच लढू. तुम्हाला साथ देऊ. अन् हे केवळ मुंबईकरांना नव्हे, तर माझ्या देशवासियांना सांगतेय मी. कारण प्रत्येक राज्यातून महाराष्ट्रात येणारी मंडळी एकदा तरी मला भेट देतातच. तेव्हा तीही माझीच बाळं नाही का. त्यामुळे बाबांनो आहात तिथेच थांबा, घरी राहा.

जाता जाता आणखी एक सांगते, सध्या तुम्ही घरात आहात त्यावेळी हा विचार मात्र नक्की करा. आपण, कोरोनासारख्या शत्रूंना एन्ट्रीच न देण्यासाठी यापुढे आपण काय काय करु शकतो. अगदी मूलभुत गोष्टी तर नक्की पाळू शकतो. म्हणजे नियमित हात धुणं, आपल्या शरीराची, परिसराची स्वच्छता ठेवणं, सार्वजनिक ठिकाणी कचरा न करणं, कुठेही न थुकणं यासारख्या.

सध्या म्हणे, माझ्या समुद्रात डॉल्फिन फिरायला लागलेत. तसंच हवेचा दर्जाही उंचावलाय. या गोष्टींसाठीही खबरदारी घ्या की जरा. समुद्राला आलेली भरती पाहायला जेव्हा समुद्रावर जाता, तेव्हा लाटेसोबत तो समुद्र बाहेर फेकत असलेली घाण आठवा. आपल्या अतिउत्साहाला आलेली भरती थांबवण्याची हीच वेळ आहे. वातावरण प्रदूषण मुक्त, शुद्ध ठेवण्यासाठी काय काय करु शकतो. ते सर्व करा आणि फक्त कोरोनाच्या या काळात नव्हे. आयुष्यभरासाठी. माझे रस्ते सध्या निर्जन दिसत असले तरी पाहा किती स्वच्छ दिसतायत. तुम्ही वावरतानाही ते तसे राहू शकतात. अन्य देशातल्या शहरांमधली उदाहरणं आहेतच आपल्यासमोर. वेळ आलीय स्वत:ला या निमित्ताने शिस्त लावून घेण्याची, आरोग्यविषयक शिस्त.

माझ्यावर याआधी अनेक संकटं आली, कधी बॉम्बस्फोट झाले, कधी तो कसाब काळ बनून आला. पण, तुमच्या साथीने मीही यातून बाहेर आले. पुन्हा धावू लागले. आता तुमची पावलं पुन्हा थांबलीयेत, कोरोना नावाच्या दहशतवाद्याच्या हल्ल्यामुळे. याही वेळी आपण नक्की बाहेर येणार बघा, या महासंकटातून. तुमची साथ हवीय. पुन्हा मोठी धाव घेण्यासाठी एक पॉझ महत्त्वाचा आहे.

मग आहेच, तुमचं ऑन युअर मार्क, गेट सेट गो. तुमच्या जीवासाठीच कराल ना एवढं. तुम्ही माझा जीव आहात म्हणून पोटतिडकीने सांगतेय. कराच एवढं. तुमच्या नव्हे माझ्या जीवासाठी.

तुमचीच..

लाडकी मुंबई

संबंधित ब्लॉग :

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Embed widget