एक्स्प्लोर

Ambedkar Jayanti 2024 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म का स्वीकारला? जाणून घ्या यामागचं कारण...

Ambedkar Jayanti 2024 : बाबासाहेबांना समाजातील जातिव्यवस्था संपवायची होती. म्हणून त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. पण, यामागे फक्त एवढंच कारण नसून आणखीही मोठं कारण आहे.

Ambedkar Jayanti 2024 : आज 14 एप्रिल भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Ambedkar Jayanti) यांची 133 वी जयंती साजरी केली जातेय. बाबासाहेबांनी समाजातील दुबळ्यांना सक्षम करण्यासाठी त्यांनी दीर्घ काळ लढा दिला आणि आपले संपूर्ण आयुष्य उपेक्षित वर्गाला समान हक्क मिळवून देण्यासाठी समर्पित केले. कनिष्ट जातीत जन्मलेल्या भीमराव आंबेडकरांना लहानपणापासूनच भेदभावाचा सामना करावा लागला. त्यांना समाजातील जातिव्यवस्था संपवायची होती. त्यानंतर बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला. पण, यामागे फक्त एवढंच कारण नसून आणखीही मोठं कारण आहे. ते समजून घेऊयात.  

आंबेडकरांनी हिंदू धर्म का सोडला? 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर 5 मे 1950 रोजी मुंबईत परतले होते. तेव्हा ‘जनता’ नियतकालिकाच्या प्रतिनिधीने डॉ. आंबेडकरांना ‘तुम्ही बौद्ध धर्म स्वीकारणार का,’ असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाच्या उत्तरातही डॉ. बाबासाहेब आबंडेकरांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला याची उत्तरे मिळू शकतात. “बौद्ध धर्माकडे माझ्या मनाचा कल निश्चित झालेला आहे. कारण बौद्ध धर्माची तत्त्वे टिकाऊ आहेत. ही तत्त्वे समानतेवर आधारलेली आहेत,” असे आंबेडकर तेव्हा म्हणाले होते.

‘हिंदू म्हणून जन्मलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही…’

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, असे असले तरी त्यांनी धर्मांतराचे संकेत बऱ्याच वर्षांआधी दिले होते. 13 ऑक्टोबर 1935 रोजी येवल्यात एका परिषदेला संबोधित करताना ‘दुर्दैवाने मी अस्पृश्य जातीत जन्माला आलो, हा काही माझा अपराध नाही. परंतु, मरताना मात्र मी हिंदू म्हणून मरणार नाही,’ असे बाबासाहेब म्हणाले होते. आपल्या भाषणात त्यांनी हिंदू धर्मामधील असमानतेवरही बोट ठेवले होते. “आपले माणुसकीचे साधे अधिकार मिळवण्यासाठी आणि हिंदू समाजामध्ये समान दर्जा प्राप्त करून घेण्यासाठी ही चळवळ निष्फळ ठरली आहे. त्या चळवळीसाठी व्यतीत केलेला वेळ, काळ, पैसा वाया गेला आहे. ही मोठी दु:खदायक वस्तुस्थिती आहे. म्हणूनच आपल्याला यासंबंधी अखेरचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. आपल्या दुर्बलतेची, अवनतीची स्थिती आपण हिंदू समाजाचे घटक आहोत, म्हणून आपल्यावर ओढवली आहे. म्हणून जो धर्म समान दर्जा देईल, समान हक्क देईल आणि योग्य तऱ्हेने वागवील अशा एखाद्या दुसऱ्या धर्मात जावे, असे तुम्हाला वाटत नाही का?” असे डॉ. आंबेडकर यांनी आपल्या भाषणात विचारले होते. हे करतानाच बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडा, असे आवाहन आपल्या अनुयायांना केले होते. “हिंदू धर्माशी असलेला संबंध तोडा. स्वाभिमान आणि शांतता मिळेल, अशा दुसऱ्या धर्मात जा. परंतु लक्षात ठेवा जो धर्म तुम्ही निवडाल त्यात समान दर्जा, समान संधी आणि समान वागणूक मिळाली पाहिजे!” असे बाबासाहेब म्हणाले होते.

  • प्रज्ञा म्हणजे अंधश्रद्धा आणि अलौकिक शक्तींविरुद्ध शहाणपण.
  • करुणा म्हणजे प्रेम, दुःख आणि पीडितांबद्दल सहानुभूती.
  • समानता म्हणजे धर्म, जात, लिंग, उच्च-नीच या विचारांपासून दूर राहून मानवाच्या समानतेवर विश्वास ठेवण्याचे तत्त्व.

बौद्ध धम्माचा अंगीकार करण्यामागे बाबासाहेबांचा असा विश्वास होता की, बौद्ध धर्म ज्ञान, करुणा आणि समतेचा संदेश देतो. यामुळे माणूस चांगले आणि सन्माननीय जीवन जगू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या :

Ambedkar Jayanti Wishes : आंबेडकर जयंतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; महामानवाला करा वंदन, पाठवा 'हे' मेसेज

महत्त्वाच्या बातम्या

Lord Shiv: भगवान महाकाल यांची भस्म आरती फक्त ब्रह्ममुहूर्तावरच का केली जाते? यामागील रहस्य काय? कमी लोकांना माहित, धार्मिक, पौराणिक महत्त्व...
भगवान महाकाल यांची भस्म आरती फक्त ब्रह्ममुहूर्तावरच का केली जाते? यामागील रहस्य काय? कमी लोकांना माहित, धार्मिक, पौराणिक महत्त्व...
Surya Grahan 2026 : 11 किंवा 12 ऑगस्ट? वर्षातलं दुसरं सूर्यग्रहण नेमकं कधी दिसणार? भारतात सूर्यग्रहणाची वेळ काय? वाचा A to Z माहिती
11 किंवा 12 ऑगस्ट? वर्षातलं दुसरं सूर्यग्रहण नेमकं कधी दिसणार? भारतात सूर्यग्रहणाची वेळ काय? वाचा A to Z माहिती
Lucky Zodiac Signs: तूळ, वृषभ, मकर, कर्क, वृश्चिक राशी सज्ज व्हा! 2027 मध्ये पॉवरफुल राजयोग बनतायत, कष्ट संपतायत, पैसा, नोकरी, प्रेमात मोठा यू-टर्न, ज्योतिषशास्त्र...
तूळ, वृषभ, मकर, कर्क, वृश्चिक राशी सज्ज व्हा! 2027 मध्ये पॉवरफुल राजयोग बनतायत, कष्ट संपतायत, पैसा, नोकरी, प्रेमात मोठा यू-टर्न, ज्योतिषशास्त्र...
Shravan 2026: मंडळींनो...श्रावणात शिवलिंगाला जलाभिषेक करताना 'या' 4 चुका चुकूनही करू नका, शिवपूजेच्या 'या' गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे, शास्त्रात म्हटलंय...
मंडळींनो...श्रावणात शिवलिंगाला जलाभिषेक करताना 'या' 4 चुका चुकूनही करू नका, शिवपूजेच्या 'या' गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे, शास्त्रात म्हटलंय...

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Raid Analog Paneer: संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
Rahul Gandhi on Amit Shah: विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
Analogue paneer: महाराष्ट्रात ‘ॲनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
महाराष्ट्रात ‘ॲनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
Ranchi Student Protest: आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
Embed widget