एक्स्प्लोर

Rythu Bandhu Scheme : तेलंगणात रायथू बंधू योजनेचा शेतकऱ्यांना मदतीचा हात, 64 लाख जणांच्या खात्यावर 50 हजार कोटींची रक्कम

तेलंगणा सरकारडून राबवण्यात येणाऱ्या रायथू बंधू योजनेतून (Rythu Bandhu Scheme) प्रति एक एकर शेतीसाठी वर्षाला दहा हजार रूपये मदत स्वरूपात हंगाम सुरू होण्याआधी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाते.

Rythu Bandhu Scheme :  तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून रायथू बंधू ही योजना चालवली जाते. या योजनेतून शेतकऱ्यांना प्रत्येकी दहा हजार रूपयांसह विविध योजना दिल्या जातात. या योजनेचाच एक भाग म्हणून संक्रातीच्या आधी सरकारने राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत जमा केलेल्या रक्कमेचा 50 हजार कोटींचा टप्पा पार केला आहे. राज्यातील 66 लाख शेतकऱ्यांपैकी 64 लाख शेतकऱ्यांना या रकमेचा लाभ झाला आहे. तर उर्वरित दोन लाख शेतकऱ्यांनाही ही रक्कम लवकरच मिळणार आहे.  

तेलंगणा सरकारने 2018 च्या खरीप हंगामात ही योजना सुरू केली होती. 2018 पासून शेतकऱ्यांना या योजनेद्वारे आठ वेळा हे पैसे मिळाले आहेत. तेलंगणा सरकारने सुमारे 43, 036.64 कोटी रुपये या योजनेवर खर्च केले  आहेत. तर नुकताच देण्यात आलेल्या आठव्या हप्त्यासाठी सुमारे 7 हजार 500 कोटी रुपये खर्च केले आहेत. 

काय आहे रायथू बंधू योजना? 
तेलंगणा सरकारडून राबवण्यात येणाऱ्या रायथू बंधू योजनेतून शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा केला जातो. शिवाय प्रति एक एकर शेतीसाठी वर्षाला दोन टप्यात दहा हजार रूपये मदत स्वरूपात हंगाम सुरू होण्याआधी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाते. या योजनेमुळे तेलंगणात कृषी क्षेत्राची चांगली प्रगती झाली आहे. 2014 मध्ये 1.8 टक्के असलेले कृषी आणि त्याच्याशी संलग्न असलेल्या क्षेत्र आता 8 टक्क्यांवर पोहोचले आहे. विशेष म्हणजे कोरोनाची महामारी आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनच्या कठीण काळातही राज्य सरकारने ही योजना सुरू ठेवली  आहे. तेलंगणा सरकारच्या रायथू बंधू योजनेच्याच धरतीवर केंद्र सरकारने पीएम किसान योजना सुरू केली आहे. शिवाय तेलंगणात हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि झारखंड या राज्यांनीही ही योजना आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे. 

शेतकऱ्यांकडून आनंदोत्सव 
राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर या योजनेतील आठवा हप्ता जमा केल्यानंतर राज्यभरातील शेतकऱ्यांनी आणि टीआरएस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज्यात आनंदोत्सव साजरा केला आहे. शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या प्रतिमेला ‘अभिषेक’ केला. तर काहींनी राज्यभर बैलगाडी आणि ट्रॅक्टर रॅली काढल्या. याबरोबरच महिला शेतकऱ्यांनी बथुकम्मा आणि कोलाटम सारखे खेळ खेळले.  तर पुरुषांनी पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात बैलगाड्या आणि ट्रॅक्टर रॅली काढली. शेतकऱ्यांच्या या आनंदोत्सवात राज्यातील अनेक मंत्री, खासदार, आमदारसुद्धा सहभागी झाले होते. यात शिक्षण मंत्री पी. सबिता, इंद्रा रेड्डी यांनी त्यांच्या महेश्वरम मतदारसंघात स्वतः ट्रॅक्टर चालवला. तर कृषी मंत्री एस. निरंजन रेड्डी यांनी सत्थुपल्ली मतदारसंघातील नारायणपुरम येथे ट्रॅक्टर चालविला. याबरोबरच राज्याचे पर्यटन मंत्री व्ही. श्रीनिवास राव यांनी महबूबनगरजवळील गावात ट्रॅक्टर चालविला.  

महत्वाच्या बातम्या

 

महत्त्वाच्या बातम्या

Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
Shetkari Kajmafi : मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? A to Z माहिती
मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? A to Z माहिती
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Embed widget