एक्स्प्लोर

Rythu Bandhu Scheme : तेलंगणात रायथू बंधू योजनेचा शेतकऱ्यांना मदतीचा हात, 64 लाख जणांच्या खात्यावर 50 हजार कोटींची रक्कम

तेलंगणा सरकारडून राबवण्यात येणाऱ्या रायथू बंधू योजनेतून (Rythu Bandhu Scheme) प्रति एक एकर शेतीसाठी वर्षाला दहा हजार रूपये मदत स्वरूपात हंगाम सुरू होण्याआधी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाते.

Rythu Bandhu Scheme :  तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून रायथू बंधू ही योजना चालवली जाते. या योजनेतून शेतकऱ्यांना प्रत्येकी दहा हजार रूपयांसह विविध योजना दिल्या जातात. या योजनेचाच एक भाग म्हणून संक्रातीच्या आधी सरकारने राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत जमा केलेल्या रक्कमेचा 50 हजार कोटींचा टप्पा पार केला आहे. राज्यातील 66 लाख शेतकऱ्यांपैकी 64 लाख शेतकऱ्यांना या रकमेचा लाभ झाला आहे. तर उर्वरित दोन लाख शेतकऱ्यांनाही ही रक्कम लवकरच मिळणार आहे.  

तेलंगणा सरकारने 2018 च्या खरीप हंगामात ही योजना सुरू केली होती. 2018 पासून शेतकऱ्यांना या योजनेद्वारे आठ वेळा हे पैसे मिळाले आहेत. तेलंगणा सरकारने सुमारे 43, 036.64 कोटी रुपये या योजनेवर खर्च केले  आहेत. तर नुकताच देण्यात आलेल्या आठव्या हप्त्यासाठी सुमारे 7 हजार 500 कोटी रुपये खर्च केले आहेत. 

काय आहे रायथू बंधू योजना? 
तेलंगणा सरकारडून राबवण्यात येणाऱ्या रायथू बंधू योजनेतून शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा केला जातो. शिवाय प्रति एक एकर शेतीसाठी वर्षाला दोन टप्यात दहा हजार रूपये मदत स्वरूपात हंगाम सुरू होण्याआधी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाते. या योजनेमुळे तेलंगणात कृषी क्षेत्राची चांगली प्रगती झाली आहे. 2014 मध्ये 1.8 टक्के असलेले कृषी आणि त्याच्याशी संलग्न असलेल्या क्षेत्र आता 8 टक्क्यांवर पोहोचले आहे. विशेष म्हणजे कोरोनाची महामारी आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनच्या कठीण काळातही राज्य सरकारने ही योजना सुरू ठेवली  आहे. तेलंगणा सरकारच्या रायथू बंधू योजनेच्याच धरतीवर केंद्र सरकारने पीएम किसान योजना सुरू केली आहे. शिवाय तेलंगणात हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि झारखंड या राज्यांनीही ही योजना आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे. 

शेतकऱ्यांकडून आनंदोत्सव 
राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर या योजनेतील आठवा हप्ता जमा केल्यानंतर राज्यभरातील शेतकऱ्यांनी आणि टीआरएस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज्यात आनंदोत्सव साजरा केला आहे. शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या प्रतिमेला ‘अभिषेक’ केला. तर काहींनी राज्यभर बैलगाडी आणि ट्रॅक्टर रॅली काढल्या. याबरोबरच महिला शेतकऱ्यांनी बथुकम्मा आणि कोलाटम सारखे खेळ खेळले.  तर पुरुषांनी पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात बैलगाड्या आणि ट्रॅक्टर रॅली काढली. शेतकऱ्यांच्या या आनंदोत्सवात राज्यातील अनेक मंत्री, खासदार, आमदारसुद्धा सहभागी झाले होते. यात शिक्षण मंत्री पी. सबिता, इंद्रा रेड्डी यांनी त्यांच्या महेश्वरम मतदारसंघात स्वतः ट्रॅक्टर चालवला. तर कृषी मंत्री एस. निरंजन रेड्डी यांनी सत्थुपल्ली मतदारसंघातील नारायणपुरम येथे ट्रॅक्टर चालविला. याबरोबरच राज्याचे पर्यटन मंत्री व्ही. श्रीनिवास राव यांनी महबूबनगरजवळील गावात ट्रॅक्टर चालविला.  

महत्वाच्या बातम्या

 

महत्त्वाच्या बातम्या

फार्मर आयडीच्या जाचक अटी शिथिल करा; पोटरखराब, फॉरेस्ट व वतन जमिनीधारक शेतकऱ्यांना न्याय द्या, शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
फार्मर आयडीच्या जाचक अटी शिथिल करा; पोटरखराब, फॉरेस्ट व वतन जमिनीधारक शेतकऱ्यांना न्याय द्या, शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मुदत वाढवली, किती तारखेपर्यंत भरता येणार पिक विमा?
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मुदत वाढवण्याची मागणी, खासदा ओमराजेंचं कृषीमंत्र्यांना पत्र
Tanaji Sawant: लोकांचे संसार जळायला लागलेत अन् तुम्ही म्हणता बघून घेतो, म्हणजे काय? शेतकरी पिक विमा प्रश्नावर आमदार तानाजी सावंत संतप्त, तहसीलदारांनाच सुनावलं
लोकांचे संसार जळायला लागलेत अन् तुम्ही म्हणता बघून घेतो, म्हणजे काय? शेतकरी पिक विमा प्रश्नावर आमदार तानाजी सावंत संतप्त, तहसीलदारांनाच सुनावलं
Dattatray Bharane: शेतकऱ्यांनो अजिबात काळजी करू नका, राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची प्रोत्साहन यादी, 2 लाख थकबाकी असलेल्या सर्वांची कर्जमाफी होणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
शेतकऱ्यांनो अजिबात काळजी करू नका, राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची प्रोत्साहन यादी, 2 लाख थकबाकी असलेल्या सर्वांची कर्जमाफी होणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

व्हिडीओ

Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sinhagad Fort Closed : मुसळधार पावसामुळे वीकेंडला सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद; हवामान विभागाचा पुणे जिल्ह्याला 'रेड अलर्ट'
मुसळधार पावसामुळे वीकेंडला सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद; हवामान विभागाचा पुणे जिल्ह्याला 'रेड अलर्ट'
Real estate house possession RERA: नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
Sharad Pawar :मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली, पक्षाच्या युवकांचा सेनापती बदलला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला संधी
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली, पक्षाच्या युवकांचा सेनापती बदलला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला संधी
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Indian Boxers News : भारतीय बॉक्सिंगच्या इतिहासातली सुवर्णरात्र! एक-दोन नव्हे, थेट जिंकली 7 सुवर्णपदकं; रिंगमध्ये नेमकं काय घडलं? संपूर्ण जग झालं थक्क
भारतीय बॉक्सिंगच्या इतिहासातली सुवर्णरात्र! एक-दोन नव्हे, थेट जिंकली 7 सुवर्णपदकं; रिंगमध्ये नेमकं काय घडलं? संपूर्ण जग झालं थक्क
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Embed widget