एक्स्प्लोर

Sugarcane News : अहमदनगरमध्ये अतिरीक्त उसाचा प्रश्न, गाळपाची जबाबदारी 'या' साखर कारखान्यांवर

अहमदनगरमध्ये अतिरीक्त उसाच्या गाळपाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा अतिरीक्त ऊस गाळपाची जबाबदारी ही शेजारच्या कारखान्यांवर देण्यात आली आहे.

Sugarcane News : मे महिना सुरु झाला तरी अद्याप राज्यातील अनेक जिल्ह्यात ऊस शिल्लक आहे. अतिरीक्त उसाच्या गाळपाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र शिल्लक आहे. अतिरीक्त उसाच्या प्रश्नावर अहमदनगरचे जिल्हाधिकरी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत अतिरिक्त ऊस गाळपाची जबाबदारी शेजारच्या कारखान्यांवर देण्यात आली आहे.
 
सहकाराचा जिल्हा अशी ओळख असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड केली जाते. जिल्ह्याच्या उत्तर भागात राहाता, श्रीरामपूर आणि नेवासा या तीन तालुक्यांत उसाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. यंदा जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. श्रीरामपूर तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच 2 लाख 25 हजार मेट्रिक टन ऊस आहे. यापैकी 1 लाख 40 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप आतापर्यंत झाले आहे. तर 80 हजार मेट्रिक टन अतिरिक्त उसाचा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. कमी अधिक प्रमाणात इतरही तालुक्यातही अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाल्याने जिल्हाधिकरी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या उपस्थितीत अतिरिक्त ऊस गाळपाबाबत एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत अतिरिक्त ऊस गाळपाची जबाबदारी ही शेजारील कारखान्यांवर विभागून वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी भोसले हे राज्याच्या साखर आयुक्तांना सादर करणार आहेत. 6 जूनपर्यंत गळीत हंगाम बंद करू नये, असेही निर्देश या बैठकीत देण्यात आले आहेत.

दरम्यान, नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी 30 एप्रिलला खरीप हंगाम नियोजन आढावा बैठक घेतली. या बैठकीत स्थानिक लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील अतिरिक्त ऊस गाळपाबाबत पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले. त्यावर त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना अतिरिक्त ऊस गाळपाचे नियोजन करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिली होती. त्यानुसार ही बैठक घेण्यात आली.
 
1 कोटी 73 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण

सध्या जिल्ह्यात 14 सहकारी आणि 9 खासगी साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरु आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत 1 कोटी 73 लाख 30 हजार 13 मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. तर 1 कोटी 73 लाख 49 हजार 828 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. साखरेचा सरासरी उतारा 10.1 टक्के आहे.

नगरमधील 'या' कारखान्यांवर गाळपाची जबाबदारी

जिल्हाधिकार्‍यांच्या बैठकीत अतिरिक्त उसाच्या गाळपाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना प्रवरा नगर यांच्यावर 30 हजार मेट्रिक टन अतिरिक्त उसाच्या गाळपाची जबाबदारी देण्यात आली, तर सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, संगमनेर या कारखान्यावर 25 हजार मेट्रिक टन, ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना यांनी 25 मेट्रिक टन उसाचे गाळप करावे, असा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात उष्णतेचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे कारखान्यांना मजूर उपलब्ध होत नाहीत. अशावेळी ज्या कारखान्याने गाळप बंद केले आहे, त्या साखर कारखान्यांकडील हार्वेस्टर आणून ऊसाची तोडणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. नगरमधील क्रांती शुगर, जय श्रीराम, राहुरी या कारखान्यांच्या क्षेत्रातील ऊस गाळप पूर्ण झाल्याने त्यांनी गाळप बंद केले आहे. तर कुकडी, श्रीगोंदा, पियूष, अंबालिका आणि युटेक या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील उसाच्या गाळप पूर्ण होत आले आहे.

यंदा राज्यात मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र आहे. उसाचं क्षेत्र वाढल्याने यावर्षी राज्यात विक्रमी गाळप होण्याची शक्यता आहे. दरम्यान, उसाचे क्षेत्र वाढल्यामुळे गाळपाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अद्याप अनेक शेतकऱ्यांचा ऊस शेतातच असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे मे महिना पूर्ण कारखाने सुरु राहणार आहेत. अद्याप राज्यात 30 ते 33 लाख टनाच्या आसपास ऊसाचे गाळप शिल्लक राहिले आहे. त्यामुळे साधारणत 10 जूनपर्यंत काही साखर कारखाने सुरु राहणार असल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

मागच्या एक वर्षापासून एबीपी माझा सोबत कार्यरत...8 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत... व्यंगचित्रकार म्हणून पत्रकारितेला सुरुवात
Read More

महत्त्वाच्या बातम्या

पावसानं मारली दडी, पिकं वाचवण्यासाठी बळीराजाला पाणी विकत घेण्याची वेळ, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा संघर्ष   
पावसानं मारली दडी, पिकं वाचवण्यासाठी बळीराजाला पाणी विकत घेण्याची वेळ, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा संघर्ष   
Agriculture News: स्वयंपाकघरापासून औषधांपर्यंत... वर्षभर कायम मागणी; बडीशेप लागवड ठरू शकते शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पर्याय
स्वयंपाकघरापासून औषधांपर्यंत... वर्षभर कायम मागणी; बडीशेप लागवड ठरू शकते शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पर्याय
बोगस सोयबीन प्रकरण! अकोल्यात आणखी 9 बियाणे कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल, निकृष्ट दर्जाचे बियाणे असल्याचं समोर
बोगस सोयबीन प्रकरण! अकोल्यात आणखी 9 बियाणे कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल, निकृष्ट दर्जाचे बियाणे असल्याचं समोर
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात, राज्याच्या 'या' भागात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात, राज्याच्या 'या' भागात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांना मोठा दिलासा

व्हिडीओ

Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
CJP Protest : विद्यार्थी सोडाच... तीन टर्म आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
विद्यार्थी सोडाच... तीन टर्म आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
Share Market : सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
Amit Shah : CJP च्या आंदोलनामुळं नवी दिल्लीत बैठकांचा धडाका, अमित शाहांची धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत बैठक, इतर दोन मंत्र्यांची हजेरी 
अभिजित दिपकेच्या सीजेपीच्या आंदोलनाचा परिणाम, दिल्लीत बैठकांचा धडका, अमित शाहांच्या बैठकीत तीन मंत्र्यांची उपस्थिती  
Delhi Jantar Mantar Protest: 'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
Yogendra Yadav : संसदेकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने भरुन गेलेत, लाखोंचा जमाव पाहून योगेंद्र यादव भारावले, म्हणाले, 'हा ऐतिहासिक क्षण...'
50 वर्षांनंतर शिक्षण आणि बेरोजगारीच्या मुद्यावर युवक रस्त्यावर उतरले, योगेंद्र यादव व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
Embed widget