एक्स्प्लोर

Ranbhaji In Palghar : पालघरमध्ये रानभाज्यांची आवक वाढली, मुख्य रस्ते आणि बाजार रानभाज्यांना फुलले

Wild Vegetables In Palghar : पालघरमधील मुख्य रस्ते आणि बाजार सध्या रानभाज्यांनी फुलले आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जंगल असल्याने विविध प्रकारच्या भाज्या सध्या बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत.

Wild Vegetables In Palghar : पालघरमधील मुख्य रस्ते आणि बाजार सध्या रानभाज्यांनी (Wild Vegetables) फुलले आहेत. जिल्ह्यात (Palghar) मोठ्या प्रमाणावर जंगल असल्याने विविध प्रकारच्या भाज्या सध्या बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत. आदिवासी समाजातील नागरिक जंगलातून रानभाज्या गोळा करुन रस्त्यावर ठिकठिकाणी विक्री करतात. यामध्ये कवळी, कोवळे बांबू, करटुले, कडूकंद, शेवळे, माठ, फांग, चाईचा मोहर, बोखरीचा मोहर, टेहरा, वाथरटे, रानकंद मोखा, वाघाटा, दिघवडी, भूईफोड, उळशाचा मोहर आदींचा समावेश आहे. लोत, कंटोली, शिराळा, काकडी, तेरा, शेवळी, शिण, पेंढरु अशा शंभरपेक्षाही जास्त भाज्या पालघरमधील जंगलांमध्ये उपलब्ध आहेत. सध्या जंगलात मिळणाऱ्या कंटोली या भाजीला चांगला भाव मिळत आहे.

कोणत्याही प्रकारची शेती किंवा बियाणे न पेरता पावसाळ्यात पाऊस पडल्यावर निसर्गतःच उगवल्या जाणाऱ्या भाज्या म्हणजे रानभाज्या (Ranbhaji). या रानभाज्या जंगलात, शेत जमिनीच्या कडेला, माळावर, बांधाच्या बाजूला उगवतात. अशा रानभाज्या आरोग्याला पोषक असतात. त्यामुळे फ्लॉवर, कोबी, बटाटा, मेथी, भेंडी या भाज्यांना कंटाळलेल्यांसाठी केवळ पावसाळ्यातच येणाऱ्या रानभाज्या म्हणजे खूशखबर असते. त्यामुळे खास पावसाळ्यात रानभाज्या खाणं हा अनेकांसाठी वेगळा अनुभव असतो.

पौष्टिक रानभाज्यांना मोठी मागणी

बाजारात या रानभाज्यांची किंमत इतर पालेभाज्यांपेक्षा जास्त असली तरी शरीरासाठी या भाज्या पौष्टिक असल्याने मोठी मागणी या रानभाज्यांना आहे. या भाज्यांमध्ये कोणत्याही केमिकलचा वापर नसल्याने ग्राहकांचा कल या भाज्यांकडे जास्त असल्याचं पाहायला मिळत आहे. भिवंडी वाडा मार्गावर तसेच विक्रमगड जव्हार मार्गावर मोठ्या प्रमाणात आदिवासी महिलांकडून या रानभाज्या विक्री केली जात आहे. शिवाय इथे येणारे पर्यटक या रानभाज्यांना विशेष महत्त्व देत आहेत. या भाज्यांचं दुसरं महत्त्व म्हणजे दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी समाजातील लोकांना या रानभाज्यांमुळे पावसाळ्यात 2 ते 3 महिने रोजगार मिळतो .

आदिवासी कुटुंबांना दोन-तीन महिने रोजगार

रानभाज्या या फक्त पावसाळ्यात मिळतात. शिवाय कोणतेही खत, केमिकल फवारणी शिवाय नैसर्गिकरित्या उगवलेल्या या भाज्यांतून मिळणारे पौष्टिक तत्त्व अधिक आहे. पावसाळ्यात अनेक घरांत या भाज्या शिजवल्या जातात. पावसाळ्यात अवघे दोन ते तीन महिने जंगलात मिळणाऱ्या या रानभाज्यांमुळे नागरिकांना भाज्यांची चव तर मिळतेच शिवाय इथल्या आदिवासी समाजातील अनेक कुटुंबांना रोजगारही उपलब्ध होतो.

हेही पाहा

Healthy Vegetables : रानभाजीचं आहारातील महत्त्व, आरोग्यवर्धक रानभाज्यांची चव तुम्ही चाखलीत का?

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More

महत्त्वाच्या बातम्या

चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
Shetkari Kajmafi : मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? A to Z माहिती
मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? A to Z माहिती

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget