एक्स्प्लोर

Ajit Pawar : राज्यात 45 दिवसात 137 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अजित पवारांचा सरकारवर निशाणा, अब्दुल सत्तारांनी पवारसाहेबांचं मार्गदर्शन घ्यावं

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरुन विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा लगावला.

Ajit Pawar on Farmers suicides : राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरुन विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा लगावला. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून गेल्या 45 दिवसात राज्यात 137 शेतकऱ्यांनी आत्महत्या (Farmers suicides) केल्या आहेत. दररोज तीन शेतकरी आत्महत्या करत असल्याचे अजित पवार म्हणाले. शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त केलं पाहिजे. आताच्या सरकारमधील कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी पवारसाहेबांचं मार्गदर्शन घ्यावं, असा सल्लाही अजित पवारांनी दिला. तसेच पवार साहेबांनी अन्नधान्याच्या बाबतीत देशाला कशा पद्धतीनं स्वयंपूर्ण केलं, हे आपण पाहिलं असल्याचेही ते म्हणाले. 

मागण्यांची पूर्तता झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही

मदतीसाठी राज्यातला शेतकरी फार आशेनं सरकारकडे बघत आहे. तुम्ही-आम्ही जनतेचं प्रतिनिधित्त्व करताना आत्महत्या होणं ही लाजिरवाणी बाब आहे. हे सरकार निष्क्रिय नाही हा विश्वास जनतेला, बळीराजाला द्या असेही अजित पवार म्हणाले. सभागृहात केलेल्या मागण्यांची पूर्तता झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं. अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुसान झालं आहे. त्यामुलं राज्यात ओला दुष्काळ जाहीर केल्यास त्यातून शेतकऱ्यांना मदत मिळेल असेही अजित पवार म्हणाले. अतिवृष्टीमुळं ज्या भागातील जमिनी खरडून गेल्या, पिकं वाहून गेली अशा ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्क माफ करावं. शेतमजुरांना आर्थिक मदत द्यावी. खावटी अनुदान पैशाच्या रूपात द्यावं अशी मागणी यावेळी अजित पवार यांनी केली.

पिकांसाठी हेक्टरी 75 हजार रुपये, तर फळ पिकांसाठी हेक्टरी दीड लाखांची मदत द्यावी

पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांना खूप मोठा फटका बसला आहे. त्यामुळं सरकारनं  पिकांसाठी हेक्टरी 75 हजार रुपयांची मदत जाहीर करावी, तसेच फळ पिकांसाठी हेक्टरी दीड लाख रुपयांची मदत सरकारनं जाहीर करावी अशी मागणी यावेळी अजित पवारांनी केली आहे. त्याचप्रमाणे यंदा महाराष्ट्रात ऊसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणावर पहायला मिळत असून 1 ऑक्टोबरपासून साखर कारखाने सुरु करण्याची परवानगी दिल्यास ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस पुढे जाईल असेही ते म्हणाले.

गोगलगायमुळं मराठवाड्यात सोयाबीनचं मोठं नुकसान, नुकसान भरपाई द्यावी
 
मराठवाड्यामध्ये उस्मानाबाद, बीड, लातूर याठिकाणी गोगलगायमुळं कोवळ्या सोयाबीनचं मोठं नुकसान झालं आहे. उगवलेलं सोयाबीन गोगलगायनं खाल्ल्यानंतर नुकसानभरपाईची तरतूद नियमात नाही, त्यासंदर्भातील निर्णय मुख्यमंत्र्यांना घ्यावा लागेल असेही अजित पवार यावेळी म्हणाले. या सरकारला पीककर्जाबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करावा लागेल. पीककर्ज माफ केलं पाहिजे. कोसळलेल्या घरांच्या नुकसानभरपाईसह ओलाव्यामुळं भेगा पडलेल्या घरांचाही पंचनामा झाला पाहिजे. अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या शाळा, शासकीय इमारतींचे देखील पंचनामे झाले पाहिजेत अशी मागणी अजित पवारांनी केली.
सोयाबीनचा प्रतिएकर खर्च 11 हजार 700 रुपये आहे. तर कापसाचा प्रतिएकर खर्च हा 11 हजार 570 रुपये येतो. असं असताना आताच्या सरकारनं हेक्टरी केवळ 13 हजार 600 रुपयांची  मदत जाहीर केली आहे. शेतकऱ्यान काय करावं? कसं जगावं? प्रपंच कसा चालवावा? असे सवालही अजित पवारांनी सभागृहात उपस्थित केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात अवकाळीचा तडाखा! गारपीट, विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस; गहू, मका, आंबा जमीनदोस्त, आज कुठे हाय अलर्ट?
राज्यात अवकाळीचा तडाखा! गारपीट, विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस; गहू, मका, आंबा जमीनदोस्त, आज कुठे हाय अलर्ट?
राज्यात अवकाळी पावसाचा कहर! वीज पडून जालन्यात दोन जणांचा मृत्यू, तर जनावरेही दगावली, शेती पिकांना मोठा फटका
राज्यात अवकाळी पावसाचा कहर! वीज पडून जालन्यात दोन जणांचा मृत्यू, तर जनावरेही दगावली, शेती पिकांना मोठा फटका
गरीब शेतकरी कसा निवडणार? कर्जमुक्तीची योग्य अंमलबजावणी न झाल्यास बँका डबघाईस येतील, शेतकरी कर्जबाजारी होतील, पटोलेंचा हल्लाबोल
गरीब शेतकरी कसा निवडणार? कर्जमुक्तीची योग्य अंमलबजावणी न झाल्यास बँका डबघाईस येतील, शेतकरी कर्जबाजारी होतील, पटोलेंचा हल्लाबोल
Dattatray Bharne : आखाती देशातील युद्धाचा निर्यातीला फटका, शेती क्षेत्रावर मोठा परिणाम; कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी व्यक्त केली चिंता
युरियाच्या साठ्याबाबत काळजी घ्या, आखाती देशातील युद्धाचा निर्यातीला फटका, कृषी क्षेत्रावर मोठा परिणाम; मंत्री दत्तात्रय भरणेंनी व्यक्त केली चिंता

व्हिडीओ

Ajit Pawar NCP Alliance : विलनीकरणाला माझा कधीच विरोध नव्हता, तटकरेंचं मोठं वक्तव्य
Nashik Police on Ashok Kharat : न्यायालयीन कोठडी मिळाल्यावर खरातची वैद्यकीय तपासणी
Eknath Shinde vs Deepak Kesarkar : केसरकरांचे 'बोल' शिंदेंचे खडे बोल Special Report
Ashok Kharat Daughter Marriage : लग्नपत्रिका खरातच्या मुलीची मांदियाळी नेत्यांची Special Report
Ashok Kharat Case Update : अशोक खरातच्या घराबाहेरुन मोठी घडामोड, मुलाला केली SIT न ताब्यात घेतलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident News: भरधाव डंपर दोन दुचाकींना मागून धडकला; काका पुतण्यासह आणखी एकाचा जागीच दुर्दैवी अंत, घटनेनं हळहळ
भरधाव डंपर दोन दुचाकींना मागून धडकला; काका पुतण्यासह आणखी एकाचा जागीच दुर्दैवी अंत, घटनेनं हळहळ
Narhari Zirwal : माझी काहीच चूक नाही...; आक्षेपार्ह व्हिडीओवर नरहरी झिरवळांचा सुनेत्रा पवारांना फोन, काय काय घडलं, सगळं सांगितलं
माझी काहीच चूक नाही...; आक्षेपार्ह व्हिडीओवर नरहरी झिरवळांचा सुनेत्रा पवारांना फोन, काय काय घडलं, सगळं सांगितलं
'महाराणी ताराराणी मराठा योद्धा' आचार्य नयन पद्मसागर यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, मराठा-मारवाडी वाद पेटवण्याचा प्रयत्न; निलेशचंद्र मुनींची आचार्य नयन पद्मसागरांना चपराक
'महाराणी ताराराणी मराठा योद्धा' आचार्य नयन पद्मसागर यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, मराठा-मारवाडी वाद पेटवण्याचा प्रयत्न; निलेशचंद्र मुनींची आचार्य नयन पद्मसागरांना चपराक
Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी दुरुस्तीला मुदतवाढ, आदिती तटकरेंकडून नवी तारीख जाहीर
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी दुरुस्तीला मुदतवाढ, आदिती तटकरेंकडून नवी तारीख जाहीर
शिवरायांचे राज्य इतकं नपुसंक का झालं? एक जैन मुनी उपमुख्यमंत्री शिंदेंसमोर सांगतात महाराणी ताराराणी जैन धर्मीय होत्या! मरहट्टे म्हणून मिरवणारे सत्ताधारी गप्प, का? कशासाठी? संजय राऊतांचा प्रहार
शिवरायांचे राज्य इतकं नपुसंक का झालं? एक जैन मुनी उपमुख्यमंत्री शिंदेंसमोर सांगतात महाराणी ताराराणी जैन धर्मीय होत्या! मरहट्टे म्हणून मिरवणारे सत्ताधारी गप्प, का? कशासाठी? संजय राऊतांचा प्रहार
Mumbai News: एक फुल दोन माळी; एका मुलीवरून दोन तरुण भिडले; मुंबईत भर रेल्वे रुळावर फ्री स्टाईल हाणामारी, PHOTO
एक फुल दोन माळी; एका मुलीवरून दोन तरुण भिडले; मुंबईत भर रेल्वे रुळावर फ्री स्टाईल हाणामारी, PHOTO
Mohammed Shami: फिटनेसपासून कामगिरीपर्यंत सर्व सिद्ध करूनही टीम इंडियात संधी मिळेना, मोहम्मद शमी पुन्हा मनातील बोलला, म्हणाला 'ज्यादिवशी कंटाळा येईल त्यादिवशी...'
फिटनेसपासून कामगिरीपर्यंत सर्व सिद्ध करूनही टीम इंडियात संधी मिळेना, मोहम्मद शमी पुन्हा मनातील बोलला, म्हणाला 'ज्यादिवशी कंटाळा येईल त्यादिवशी...'
Maharashtra Cabinet Meeting: राज्य सरकारचा 12 वर्षांनंतर मोठा निर्णय, मंत्रिमंडळाच्या बैठकीत 6 धडाकेबाज निर्णय
राज्य सरकारचा 12 वर्षांनंतर मोठा निर्णय, मंत्रिमंडळाच्या बैठकीत 6 धडाकेबाज निर्णय
Embed widget