एक्स्प्लोर

Nashik: मार्च एन्डलाही नाशिक जिल्ह्यातील कांदा मार्केट सुरू राहणार, कांदा व्यापाऱ्यांचा निर्णय

Onion Price: वर्षभराचा हिशोब करण्यासाठी मार्च एन्डला कांदा मार्केट बंद ठेवण्याची प्रथा आहे. यंदा जिल्ह्यातील कांदा मार्केट सुरू ठेवण्यात येणार आहे. 

नाशिक : मार्च एन्डलाही जिल्ह्यातील कांदा मार्केट सुरू ठेवण्याचा निर्णय नाशिकच्या व्यापाऱ्यांनी घेतला आहे. दरवर्षी नाशिक जिल्ह्यातील कांदा मार्केट हे मार्च महिन्याच्या शेवटी आर्थिक हिशोबामुळे बंद ठेवण्याची प्रथा आहे. मात्र यावर्षी शेवटचे दोन्ही दिवस जिल्ह्यातील कांदा मार्केट सुरू ठेवण्याचा निर्णय कांदा व्यापाऱ्यांनी घेतला आहे. 

नाशिक जिल्हा हा सर्वाधिक कांदा उत्पादन घेणारा जिल्हा असून लासलगाव कांदा बाजारपेठ देशातीलच नव्हे आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. मार्च महिन्यात आर्थिक वर्ष संपत असल्यामुळे शेवटचे दोन दिवस हे हिशोब तपासणीसाठी राखीव ठेवले जातात. त्यामुळे त्या दिवशी कांदा लिलाव होत नाही. त्यामुळे सर्वच परिसरातील कांदा मार्केट अखेरचे चार ते पाच दिवस लिलाव बंद ठेवण्यात येतात. मात्र यावर्षी कांदा मार्केट 30 व 31 मार्च रोजी देखील सुरू राहणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर पडल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे या पार्श्वभूमीवर गेल्या महिनाभरापासून अनेक भागात आंदोलन देखील झाले, तर दुसरीकडे किसान लॉन्ग मार्चने देखील कांदा दरावरून सरकारचे लक्ष वेधले. यानंतर राज्य शासनाने कांद्याला 350 रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले. त्याचबरोबर या निर्णयाबाबतचा जीआर देखील काढण्यात आला. यानुसार 1 फेब्रुवारी ते 31 मार्च दरम्यान विक्री केलेल्या कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल 350 रुपये अनुदान देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. त्यामुळे बाजारसमितीच्या व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव 30 व 31 मार्च रोजी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

शेतकरी आंदोलनाचे यश

कांदा दरातील घसरण आणि अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले. यावरून विधानसभेत देखील रणकंदन पाहायला मिळाले. दुसरीकडे राज्यभर शेतकऱ्यांची तीव्र आंदोलने झाली. त्यातील महत्वाचे आंदोलन म्हणजे शेतकरी लॉंग मार्च. या लॉंग मार्चमुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना 300 रुपये प्रतिक्विंटल अनुदान देण्याची घोषणा केली. मात्र शेतकऱ्यांनी अनुदान वाढवून देण्याची मागणी करत आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांद्याच्या आधीच्या अनुदानात 50 रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली होती.

शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 350 रुपये अनुदान 

त्यानुसार 1 फेब्रुवारी ते 31 मार्च दरम्यान विक्री केलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 350 रुपये अनुदान मिळणार आहे. दरम्यान 350  रुपयांच्या अनुदानाचे वाटप लवकरच सुरू होणार असल्याचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. 200 क्विंटल प्रतिशेतकरी या मर्यादेत 350 रुपयांचे अनुदान वाटप केले जाणार असल्याचा शासन आदेश काढण्यात आला आहे. हे अनुदान 30 दिवसांत वितरित करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार, मंत्री मुश्रीफांची माहिती, विरोधकांवर टीका
राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार, मंत्री मुश्रीफांची माहिती, विरोधकांवर टीका
आंबेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार तडाखा, घराचे छप्पर कोसळून वृद्धाचा मृत्यू,  शेती पिकांचंगी मोठं नुकसान
आंबेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार तडाखा, घराचे छप्पर कोसळून वृद्धाचा मृत्यू,  शेती पिकांचंगी मोठं नुकसान
1200 एकरवर जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठ महाराष्ट्रात उभारणार, निर्यात व्यवस्था बळकट करणार : जयकुमार रावल
1200 एकरवर जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठ महाराष्ट्रात उभारणार, निर्यात व्यवस्था बळकट करणार : जयकुमार रावल
Monsoon 2026: आनंदवार्ता! येत्या 48 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार; हवामानात मोठे बदल, महाराष्ट्रासह 'या' राज्यात जोर'धार' कोसळणार
आनंदवार्ता! येत्या 48 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार; हवामानात मोठे बदल, महाराष्ट्रासह 'या' राज्यात जोर'धार' कोसळणार

व्हिडीओ

Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग
Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report
MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report
Konkan Politics : बाळ मानेंच्या माघारीनंतर हकालपट्टी; भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बीडमध्ये शेतकऱ्याने मोसंबी बागेवर फिरवला जेसीबी; पाण्याअभावी वाळून गेली बाग, जाळून केली खाक
बीडमध्ये शेतकऱ्याने मोसंबी बागेवर फिरवला जेसीबी; पाण्याअभावी वाळून गेली बाग, जाळून केली खाक
Monsoon Rain Maharashtra: मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार? हवामान खात्याकडून महत्त्वाची अपडेट, परिस्थिती पोषक, देवगडमध्ये..
मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार? हवामान खात्याकडून महत्त्वाची अपडेट, परिस्थिती पोषक, देवगडमध्ये..
आचारसंहिता म्हणजे शोलेचा गब्बरसिंग, कॉकरोच जनता पार्टीबद्दलही बोलले सुधीर मुनगंटीवार; म्हणाले, सामान्य माणसांचं मन..
आचारसंहिता म्हणजे शोलेचा गब्बरसिंग, कॉकरोच जनता पार्टीबद्दलही बोलले सुधीर मुनगंटीवार; म्हणाले, सामान्य माणसांचं मन..
Suryakumar Yadav : टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर रोहित शर्मासोबत जे घडलं, तेच सूर्यकुमार यादव सोबत झालं, BCCI च्या निर्णयानं सगळे चक्रावले...
टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर रोहित शर्मासोबत जे घडलं, तेच सूर्यकुमार यादव सोबत झालं, BCCI चा मोठा निर्णय
Bal Mane Vidhan Parishad Election 2026 : माघार अन् हकालपट्टीनंतर बाळ मानेंचे लागोपाठ दुसऱ्या दिवशी 'ते' स्टेटस चर्चेत; कोकणच्या राजकारणात तर्कवितर्कांना वेग, रोख नेमका कुणाकडे?
माघार अन् हकालपट्टीनंतर बाळ मानेंचे लागोपाठ दुसऱ्या दिवशी 'ते' स्टेटस चर्चेत; कोकणच्या राजकारणात तर्कवितर्कांना वेग, रोख नेमका कुणाकडे?
Chhagan Bhujbal Rajya Sabha Election 2026: छगन भुजबळांना राज्यसभा अन् समीर भुजबळांना राज्यात मंत्रिपद? राष्ट्रवादीचे नेते फडणवीसांना भेटले, महत्त्वाच्या घोषणेची शक्यता
छगन भुजबळांना राज्यसभा अन् समीर भुजबळांना राज्यात मंत्रिपद? राष्ट्रवादीचे नेते फडणवीसांना भेटले, महत्त्वाच्या घोषणेची शक्यता
राष्ट्रवादीने दोनवेळा दगा दिला, भाजपसोबत आतून छुपी युती होते का? पुणे विधानपरिषद बिनविरोध झाल्याने वसंत मोरेंचा सवाल
राष्ट्रवादीने दोनवेळा दगा दिला, भाजपसोबत आतून छुपी युती होते का? पुणे विधानपरिषद बिनविरोध झाल्याने वसंत मोरेंचा सवाल
Devendra Fadnavis and Supriya Sule: सुप्रिया सुळेंच्या घोडेबाजाराच्या आरोपाला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले, 'माणसं पैशापेक्षा प्रेमाने जिंकता येतात'
सुप्रिया सुळेंच्या घोडेबाजाराच्या आरोपाला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले, 'माणसं पैशापेक्षा प्रेमाने जिंकता येतात'
Embed widget