एक्स्प्लोर

मोठी बातमी! पाऊस बंद झाल्याबरोबर सरकार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार; कृषिमंत्री नेमकं काय म्हणाले?

शेतकऱ्यांची पिक डोळ्यासमोर उद्वस्त झाली असून बळीराजा मोठ्या संकटात सापडलाय . अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी राज्यातील राजकीय वातावरणही तापले आहे

Akola: राज्यातील पाऊस थांबल्याबरोबर शेती नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना सरकार मदत करणार असल्याचं कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणालेत. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शिवारफेरीच्या उद्घाटनावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यातील जून, जुलै महिन्यातील नुकसानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाल्याचं ते यावेळी  म्हणाले. दरम्यान, राज्यात सध्या युरियाच्या तुटवड्यासंदर्भात केंद्राशी बोलणे सुरू आहे. यासंदर्भात लवकरच शेतकऱ्यांना गुड न्यूज देणार असल्याचं कृषिमंत्री भरणे म्हणालेत.

गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यभरात दाणादाण उडाली आहे . शेतकऱ्यांची पिक डोळ्यासमोर उद्वस्त झाली असून बळीराजा मोठ्या संकटात सापडलाय . अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी राज्यातील राजकीय वातावरणही तापले आहे .कर्जमाफी, नुकसान भरपाईवरून विरोधक आक्रमक होत असताना सरकारवर दबाव वाढतोय . गेल्या दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसाने सोलापूरसह बीड धाराशिव लातूर हिंगोली जिल्हांमध्ये अतोनात नुकसान झाले आहे .शेतकऱ्यांच्या खरीप पिकांना मोठा फटका बसला असून डोळ्यासमोर पिकांचा चिखल झाल्याने शेतकरी हतबल झालाय .

"राज्यातील पाऊस थांबल्याबरोबर शेती नुकसानीचे पंचनामे करू"

राज्यातील पावसाने उध्वस्त झालेल्या शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना सरकारकडून मदत दिली जाणार असल्याचं कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केलं आहे. अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शिवारफेरीच्या उद्घाटनावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. कृषिमंत्र्यांनी सांगितलं की, “राज्यात जून-जुलै महिन्यात झालेल्या शेतीच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पंचनाम्यानंतर उर्वरित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देखील लवकरच मदत मिळणार आहे.” दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांसाठी युरियाच्या तुटवड्याबाबत केंद्र सरकारशी चर्चा सुरू असल्याचंही भरणे यांनी सांगितलं. त्यांनी आश्वासन दिलं की, यासंदर्भात लवकरच शेतकऱ्यांना “गुड न्यूज” दिली जाईल.असं कृषिमंत्री भरणे म्हणालेत

अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आजपासून तीन दिवसीय शिवारफेरीला सुरुवात झालीय. या कार्यक्रमासाठी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल अकोल्यात आले होतेय. या तीन दिवसांत विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विदर्भातील अकराही जिल्ह्यातून शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक शिवार फेरीला भेट देणारायेत. शिवार फेरीत हे 43 वे वर्ष आहे.‌ 20 एकर क्षेत्रावर एकाच ठिकाणी थेट पीक प्रात्यक्षिक यावेळी पाहता येणारेय. 112 खरीप पिके, 27 भाजीपाला पिके, 59 फुल वर्गीय पिके असे एकूण 212 पिक वाण तथा तंत्रज्ञान शिफारशी शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी पहावयास मिळणारायेत.

कृषी विद्यापीठातील रिक्त पदासंदर्भात सरकार ठोस निर्णय घेणार

दरम्यान, राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील रिक्त पदास संदर्भात पुढच्या महिन्यात ते दोन महिन्यात सरकार ठोस निर्णय घेणार असल्याचं कृषिमंत्री म्हणालेय. अकोला विद्यापीठातील रिक्त पदांवरून अकोला कृषी विद्यापीठ आणि राज्य सरकारमधील मतभेदांची बातमी नुकतीच 'एबीपी माझा'ने दाखविली होतीय.तर जंगली जनावरांपासून पिकांना संरक्षणासाठी सरकार लवकरच बांबूंच्या कुंपणाची योजना आणणार असल्याचे कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल म्हणालेय. बच्चू कडू आणि रविकांत तुपकरांनी मंत्री आणि प्रशासनाबद्दल केलेल्या वक्तव्यावर थेट काही बोलायला त्यांनी यावेळी नकार दिला.

गेल्या सोळा वर्षांपासून पत्रकारितेत. लेखक, कवी. समाज माध्यमांद्वारे प्रभावी लेखन. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
Shetkari Kajmafi : मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? A to Z माहिती
मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? A to Z माहिती
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Embed widget