![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Cotton Production : 15 हजार रुपयांनी विक्री होणारा कापूस पाच हजारांवर, 'या' राज्यातील शेतकरी आक्रमक, चक्का जाम आंदोलनाचा इशारा
Cotton Production : सध्या कपासच्या दरात (Cotton Price) मोठी घसरण झाली आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.
![Cotton Production : 15 हजार रुपयांनी विक्री होणारा कापूस पाच हजारांवर, 'या' राज्यातील शेतकरी आक्रमक, चक्का जाम आंदोलनाचा इशारा Maharashtra Agriculture News Cotton sold at rs 6500 per quintal in Telangana farmers are facing loss Cotton Production : 15 हजार रुपयांनी विक्री होणारा कापूस पाच हजारांवर, 'या' राज्यातील शेतकरी आक्रमक, चक्का जाम आंदोलनाचा इशारा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/04/8607d3d7752ac4a44d55c46b0ada39e01672812375828339_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Cotton Production : मागील वर्षी देशातील शेतकऱ्यांनी (Farmers) विविध संकटांचा सामना करावा लागला. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकट येत होती. अतिवृष्टीमुळं (Heavy Rain) अनेक राज्यात शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अशातच नवीन वर्षात शेतकऱ्यांच्या पिकांना चांगला दर मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, तसे होतोना दिसत नाही. सध्या कपासच्या दरात (Cotton Price) मोठी घसरण झाली आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. तेलंगणा ( Telangana) राज्यात मागील काही दिवसांमध्ये कापसाचे 15 हजार रुपये क्विंटलवर गेले होते. आता या ठिकाणी कापसाला सहा हजार रुपयांचा दर मिळत आहे.
Cotton Production : शेतकऱ्यांचा खर्च निघणही कठीण
सध्या कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. कारण कापसाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. तेलंगणात प्रति क्विंटल 6000 रुपये दरानं कापसाची विक्री केली जात आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. कमी दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांचा खर्चही निघणं कठीण झालं आहे. त्यामुळं शेतकरी कापसाला वाढीव दर देण्याची मागणी करत आहेत.
Maharashtra Agriculture News : पावसामुळं उत्पादनात मोठी घट
पावसामुळं अनेक ठिकाणी पिकांमध्ये पाणी साचलं होतं. याचा मोठा फटका कापसासह अन्य पिकांना बसला होता. त्यामुळं उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. उत्पादनात 50 टक्के घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अशातच बाजारात कापसाचा दर सहा हजार ते आठ हजार रुपये प्रतिक्विंटल झाला आहे. दर कमी झाल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने कापसाला प्रति क्विंटल 15 हजार रुपयांचा दर द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
Maharashtra Agriculture News : कापसाला रास्त भाव न मिळाल्यास चक्का जाम आंदोलनाचा इशारा
कापसाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत. याविरोधात काही ठिकाणी शेतकरी आंदोलन देखील करत आहेत. राज्य सरकारनं कापसाचा दर 15 हजार रुपये प्रतिक्विंटल करावा अशी मागणी शेतखर्यांनी केली आहे. जर सरकारनं कापसाच्या दरात वाढ नाही केली तर संपूर्ण राज्यात आंदोलन करू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. राज्यात ठिकठिकाणी चक्का जाम करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Maharashtra Agriculture News : महाराष्ट्रात काय स्थिती?
शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून कापसाकडे पाहिले जाते. विदर्भासह (Vidarbha) आणि मराठवाडा (Marathwada) आणि उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) मोठ्या प्रमाणावर कापसाचे उत्पादन घेतले जाते. मात्र, सध्या कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. मागील वर्षी कापसाला मिळालेला विक्रमी दर पाहता यावर्षीही कापसाला चांगला दर मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, कापसाचे दर पंधराशे ते दोन हजार रुपयांनी घटले आहेत. सध्या कापसाचा 7 हजार 500 ते 7 हजार 900 रुपयांचा दर मिळत आहे. त्यामुळं कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. अचानक आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सरकी आणि कापसाचा उठाव कमी झाल्यानं दर पडल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Cotton Import News : ऑस्ट्रेलियातून 51 हजार टन कापसाची आयात होणार, आयात शुल्कही माफ; शेतकरी संघटनांची नाराजी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)