Fertilizer : खरीप हंगामात रासायनिक खतांचा वापर वाढला, केंद्रीय खत सचिवांनी सांगितली आकडेवारी; वाचा सविस्तर
मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या खरीप हंगामात (Kharif Seasion) डीएपी (DAP)आणि युरियाचा (Urea) वापर वाढला आहे. केंद्रीय खत सचिव रजत कुमार मिश्रा यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

Fertilizer : मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या खरीप हंगामात (Kharif Seasion) डीएपी (DAP)आणि युरियाचा (Urea) वापर वाढला आहे. केंद्रीय खत सचिव रजत कुमार मिश्रा यांनी याबाबतची माहिती दिली आहे. शेतकरी आणि राज्यांनी खतांचा संतुलित वापर करावा असे मिश्रा यांनी सांगितले आहे. चालू खरीप पिकाच्या हंगामात युरिया आणि डीएपीचा जास्त वापर दिसून आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत 13 लाख टन युरिया आणि 10 लाख टन डीएपीची वाढ झाली आहे.
चालू खरीप हंगामात विक्रमी 1.8 कोटी टन खतांचा वापर करण्यात आला आहे. युरियाच्या वापरात 13 लाख टनांहून अधिक वाढ झाली आहे. जर तुम्ही 10,000 कोटी रुपयांचा आधुनिक आणि अत्यंत कार्यक्षम युरिया प्लांट उभारला तर तुम्ही एका वर्षात 10.5 लाख टन उत्पादन करु शकता. त्यामुळं अतिरिक्त मागणी पूर्ण करण्यासाठी आम्हाला नवीन प्लांट उभारावा लागणार असल्याची माहिती केंद्रीय खत सचिव रजत कुमार मिश्रा यांनी दिली.
खत वितरणावर बारकाईने लक्ष ठेवा
गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत डीएपीचा वापर 10 लाख टन अधिक होणार असल्याचे केंद्रीय खत सचिवांनी सांगितले. पाण्यानंतर उत्पादनावर परिणाम करणाऱ्या नऊ पीक निविष्ठांपैकी खत हे एक आहे. कृषी क्षेत्राच्या आवश्यकतेनुसार खते देण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. रजत कुमार मिश्रा म्हणाले की, केंद्र सरकारनं 2022-23 मध्ये 2.5 लाख कोटी रुपयांच्या अनुदानाचा बोजा उचलला आहे. खतांच्या वितरणावर काटेकोरपणे नजर ठेवण्यास आणि प्रादेशिक विषमता दूर करण्यासही त्यांनी राज्यांना सांगितले.
रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होत आहे. दिवसेंदिवस उत्पादकता आणि जमिनीचा पोत खराब होत आहे. याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. मात्र, याबाबत कुठलेही मार्गदर्शन अथवा सल्ला मिळत नसल्याने दिवसेंदिवस खतांचा वापर वाढत आहे, असेही काही शेतकऱ्यांचे म्हणने सुद्धा आहे. शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे, रासायनिक खतांचा अतिवापर जमिनीचा पोत बिघडू शकतो. त्यामुळं आवश्यक असल्यास तरच रासायनिक खतांची मात्रा द्यावी, अन्यथा सेंद्रिय शेती करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. महाराष्ट्रात देखील गेल्या दोन दशकांमध्ये रासायनिक खतांचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. सध्या महाराष्ट्रात 70 लाख मेट्रीक टनाहून अधिक खतांचा वापर होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Fertiliser : खते महागणार? बळीराजाचा खर्च वाढणार; रशियाकडून सवलतीच्या दरात खत देणं बंद
Before You Go
Dharashiv Crop Loss : धाराशिवमध्ये अवकाळी पावसाने द्राक्ष बागांचं मोठं नुकसान, शेतकरी हवालदिल





















