एक्स्प्लोर

Grapes Farmers : द्राक्ष उत्पादकांसाठी सरकारचा पुढाकार, नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण होण्यासाठी प्लास्टिक आच्छादनाचा प्रयोग

नैसर्गिक आपत्तींपासून द्राक्षबागांचे संरक्षण करण्यासाठी त्यावर प्लास्टिक आच्छादन लावण्याचा प्रयोग राज्यात करण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर 100 हेक्टर क्षेत्रावर हे आच्छादन लावण्यात येणार आहे.

Grapes Farmers : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. नैसर्गिक आपत्तींपासून द्राक्षबागांचे संरक्षण करण्यासाठी त्यावर प्लास्टिक आच्छादन लावण्याचा प्रयोग राज्यात करण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर 100 हेक्टर क्षेत्रावर हे आच्छादन लावण्यात येणार आहे. त्यानंतर त्याची राज्यभरात अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिली. गेल्या एक ते दोन  वर्षांपासून अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि सातत्यानं वातावरणात होणारा बदल या समस्यांपासून द्राक्षबागांचे अतोनात नुकसान होत आहे. हे नुकसान शेतकऱ्यांना टाळता यावं यासाठी हा प्रयोग केला जाणार आहे.

राज्यात मोठ्या प्रमाणावर द्राक्षबागांचे क्षेत्र आहे. मात्र, दरवर्षी अवकाळी पाऊस, अतिवृष्टी तर कधी वातावरणात होणारे बदल याचा मोठा फटका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसतो. परिणामी उत्पादनात मोठी घट होते. मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागांना खर्च करुन बवे तसे उत्पन्न मिळत नाही. त्यामुळं अशा नैसर्गिक संकटाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने आता पुढाकार घेतला आहे. वातावरणीय परिस्थितीमुळं द्राक्षबागांचं मोठं नुकसान होतं. यातून द्राक्षबागांचं संरक्षण व्हावं यासाठी प्लास्टिक आच्छादन लावण्याचा प्रयोग राज्यात करण्यात येणार आहे. सुरुवातीला हा प्रयोग शंभर हेक्टर क्षेत्रावर करण्यात येणार आहे. या ठिकाणी हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण राज्यभरात याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होती. यावर कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी द्राक्ष बागांसदर्भात हा निर्णय घेतला आहे. राज्यामध्ये 1.20 लाख हेक्टर क्षेत्र द्राक्ष लागवडीखाली आहे. फळांच्या निर्यातीतून राज्याला मोठा प्रकारचा महसूल मिळतो, असेही त्यांनी सांगितले. परंतू, अवकाळी आणि गारपीट सारख्या नैसर्गिक संकटांमुळे द्राक्ष पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. त्यामुळे हे नुकसान होऊ नये यासाठी डिझाईन केलेले लोखंडी संरचना, प्लास्टिक अच्छादन असे स्ट्रक्चर चा प्रभावी उपाय काही शेतकऱ्यांनी सुचवला होता. जेव्हा  वातावरणात बदल होत असेल त्यावेळी प्लास्टिक आच्छादनाची व्यवस्था पटकन करता येईल, यासाठी एकरी चार ते साडेचार लाख रुपये खर्च येतो. या सगळ्या संशोधनाचा आढावा घेण्याचे निर्देश राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाला देण्यात आले होते.

दरम्यान, याबाबत विद्यापीठानं तज्ञांची समिती नेमली होती. या समितीनं आता अहवाल सादर केला आहे. प्लॅस्टिक आच्छादन  वापरून पीके संरक्षित करण्यासाठी लागणारा जो काही खर्च आहे त्याचाकाही हिस्सा जर केंद्राने दिला तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. म्हणून यासाठी केंद्राकडे देखील पाठपुरावा सुरु असल्याचे दादाजी भुसे यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात

व्हिडीओ

Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report
Nashik Sudhakar Badgujar : एबी फॉर्मची मारामार बडगुजरांनी लाटले चार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Ajit Pawar : मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
आम्ही महायुतीसोबच, पण..; रामदास आठवलेंचं बंड झालं थंड; देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला शब्द
आम्ही महायुतीसोबच, पण..; रामदास आठवलेंचं बंड झालं थंड; देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला शब्द
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे-पवारांच्या युतीला दे धक्का; उमेदवाराने परस्पर अर्ज माघारी घेतला; निवडणुकांपूर्वीच 1 जागा झाली कमी
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे-पवारांच्या युतीला दे धक्का; उमेदवाराने परस्पर अर्ज माघारी घेतला; निवडणुकांपूर्वीच 1 जागा झाली कमी
Embed widget