एक्स्प्लोर

Bamboo Plantation : सहकार क्षेत्रात बांबूचं पीक घेतल्यास इथेनॉल उत्पादनात क्रांती होईल : पाशा पटेल

बांबू उत्पादक शेतकऱ्यांचा सहकारी तत्वावर समूह तयार होऊन, देशात इथेनॉल उत्पादनात क्रांती होईल असे मत पाशा पटेल यांनी व्यक्त केले.

Bamboo Plantation : देशाचे सहकार मंत्री अमित शाह यांनी बांबूचे पीक सहकार क्षेत्रात घ्यावं, असं वक्तव्य भाजप नेते आणि महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केलं आहे. त्यासंदर्भात निर्णय झाला, तर बांबू उत्पादक शेतकऱ्यांचा सहकारी तत्वावर समूह तयार होऊन, देशात इथेनॉल उत्पादनात क्रांती होईल असेही पाशा पटेल म्हणाले. बांबू पीक हे शेतकऱ्यांसाठी जास्त खर्चिक नाही. त्यामुळं याची लागवड केल्यास शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो असेही पाशा पटेल म्हणाले.

दरम्यान, 2030 पर्यंत 10 टक्के वाहनं फ्लेक्स इंजिनवर ( एकापेक्षा जास्त इंधनाचा वापर करणारे इंजिन ) चालतील. त्यामुळं त्यासाठी इथेनॉल मोठ्या प्रमाणावर लागणार आहे. उसाची मर्यादित उपलब्धता पाहता तेवढे इथेनॉल उसापासून तयार करणं शक्य होणार नाही. त्यामुळं आता बांबूपासून इथेनॉल तयार करण्याचं तंत्र विकसीत झालं आहे. जर बांबूला सहकारात घेतले तर काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत उत्पादित होणारा बांबू मोठ्या प्रमाणावर इथेनॉल उत्पादन करु शकेल असेही पाशा पटेल यावेळी म्हणाले.  दरम्यान,1 टन उसासाठी 2 कोटी लिटर पाणी लागतं.  तर त्यापासून 80 लिटर इथेनॉल तयार होतं. त्याउलट 1 टन बांबूसाठी 20 लाख लिटर पाणी लागतं आणि 400 लिटर इथेनॉल तयार होतं, असे पटेल म्हणाले.

त्यामुळं जर उसाऐवजी बांबूची शेती केली तर पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होते. सोबतच इथेनॉलचा उत्पादनही अनेक पटींनी जास्त होतो. त्यामुळं आम्ही उसाऐवजी बांबूची शिफारस करत असल्याचे पाशा पटेल यांनी सांगितले. दरम्यान, बांबूपासून 30,000 लिटरची निर्मिती करणारी जगातील पहिली इथेनॉल रिफायनरी भारतात उभारणार असल्याचेही पाशा पटले यांनी सांगितले. 

दरम्यान, बांबू पिकाला पाणी आणि खते यांचे प्रमाण फारच कमी लागते. तसेच रोगप्रतिकारक शक्ती जास्त असल्याने पिकासाठी कीटकनाशकांचा वापर सुद्धा कमी होतो. आशिया खंडात गेल्या वीस वर्षापासून बांबूचे उत्पादन लक्षणीय वाढले आहे. जर महाराष्ट्राचा विचार केला तर मानवेल, कटांग काटस, कोंड्या मेस, पिवळा बांबू या प्रजातीचे बांबू आढळतात. बांबूची लागवड केल्यापासून साधारणतः पाच वर्षांचा त्याचे उत्पन्न मिळायला लागते. त्यानंतर साडेचार लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न प्रतिमहिना मिळू शकते. हस्तकला, शेती, फर्निचर, खाद्य, बांधकाम, कागद उद्योगासाठी बांबूचा उपयोग होतो. 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

देवाभाऊंनी दिलेला शब्द पाळला! शेतकऱ्यांना सावरण्यासाठी कर्जमाफी अतिशय महत्त्वपूर्ण, अनिल बोडेंनी केलं स्वागत
देवाभाऊंनी दिलेला शब्द पाळला! शेतकऱ्यांना सावरण्यासाठी कर्जमाफी अतिशय महत्त्वपूर्ण, अनिल बोडेंनी केलं स्वागत
कर्जमाफी योजना फसवी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नाहीच, स्वाभिमानी शेतकरी संगटनेचा सरकारवर प्रहार 
कर्जमाफी योजना फसवी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नाहीच, स्वाभिमानी शेतकरी संगटनेचा सरकारवर प्रहार 
इस्रायल इराण युद्धाचा भारतावर परिणाम, कोट्यावधी रुपयांचा तांदूळ अडकला, किंमतीत मोठी घसरण
इस्रायल इराण युद्धाचा भारतावर परिणाम, कोट्यावधी रुपयांचा तांदूळ अडकला, किंमतीत मोठी घसरण
जिरायती भागात पाणीटंचाई होऊ देणार नाही, युगेंद्र पवारांचं शेतकऱ्यांना आश्वासन, जानाई शिरसाई योजनेची पाहणी
जिरायती भागात पाणीटंचाई होऊ देणार नाही, युगेंद्र पवारांचं शेतकऱ्यांना आश्वासन, जानाई शिरसाई योजनेची पाहणी

व्हिडीओ

Uddhav Thackeray Eknath Shinde Vidhabhavan :उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने;विधानभवनात काय घडलं?
Devendra Fadnavis Budget 2026 : 2 लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोठी घोषणा
Sanjay Raut PC : मोदींनी इस्रायल-इराणचं युद्ध थांबवावं, युद्धाचे परिणाम भारताला भोगावे लागणार - राऊत
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य, मिटकरींच्या डोळ्यात अश्रू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
Embed widget