एक्स्प्लोर

Dhule News : वाढत्या थंडीचा परिणाम दुभत्या जनावरांवर, शरीरातील उष्णता कमी झाल्याने दुधाच्या उत्पन्नात घट होणार

Dhule News : थंडीचा परिणाम दुभत्या जनावरांवर देखील होत आहे. यामुळे दुधाच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर जनावरांची  काळजी घेण्याची आवाहन पशुसंवर्धन विभागाने केलं आहे. 

Dhule News : संपूर्ण राज्यात एकीकडे तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात घसरल्याने थंडीचा (Cold) गारठा चांगलाच वाढला आहे. या थंडीचा परिणाम सर्वसामान्य माणसांवर होतो तसा तो दुभत्या जनावरांवर (Milch Animals) देखील होत आहे. यामुळे दुधाच्या (Milk) उत्पन्नात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर जनावरांची  काळजी घेण्याची आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आलं आहे. 

थंडीमुळे दुधाच्या उत्पन्नात घट
संपूर्ण राज्यात तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणावर घसरत असून उत्तर महाराष्ट्र यंदाच्या हंगामात सर्वाधिक गारठला आहे. नाशिक जिल्ह्याचे तापमान 10 अंश सेल्सिअसवर तर ओझरचे तापमान सहा अंशावर येऊन ठेपले आहे. तर दुसरीकडे धुळे जिल्ह्याचे तापमान सात अंशावर आल्याने कडाक्याच्या थंडीत वाढ झाली आहे. या वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दुसरीकडे वाढत्या थंडीचा परिणाम हा जनावरांवर देखील होत आहे. यामुळे दूध उत्पादनात देखील घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जनावरांच्या शरीरातील उष्णतेचे प्रमाण घटल्याने त्याचा परिणाम दुधावर देखील होत असतो. हिवाळ्यापूर्वी नऊ ते दहा लिटर दूध देणारी जनावरे तापमानात घट झाल्यानंतर चार ते पाच लिटर दूध देऊ लागली आहेत. यामुळे पशुपालकांनी देखील जनावरांची काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. जनावरांच्या गोठ्यात शेकोटी पेटवणे, तसेच जनावरांचे अंग झाकणे त्यांच्या शरीरातील उष्णता वाढीस लागण्यासाठी प्रयत्न करणे असे उपाय पशुपालकांकडून केले जात आहेत.

उबदार वातावरण निर्माण करुन जनावरांची काळजी घ्या : पशुसंवर्धन विभाग
राज्यात दिवसेंदिवस तापमानाचा पारा घसरत असून पुढील काही दिवसात देखील तापमानात आणखी घसरण होणार असल्याची माहिती हवामान विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी आपल्या जनावरांची काळजी घ्यावी तसेच लम्पी आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे इतर आजारांची देखील जनावरांना लागण होण्याची शक्यता असल्याने पशुपालकांनी जनावरांना जास्तीत जास्त उबदार वातावरण निर्माण करुन द्यावं, असं आवाहन पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी राजेंद्र लंघे यांनी केलं आहे.

थंडीत जनावरांची कशी काळजी घ्यावी?

  • जनावरांना रात्रीच्यावेळी शेडमध्ये किंवा गोठ्यातच बांधावे
  • तसेच रात्रीच्या वेळी जनावरांच्या अंगावर गोणपाट टाकावे
  • त्याचबरोबर गोठ्यामध्ये ऊब निर्माण व्हावी यासाठी शेकोटी पेटवावी
  • जनावरे शेडमध्ये बांधलेल्या ठिकाणी उघडी असलेली बाजू कापडाने किंवा आणखी पर्यायी मार्गाने झाकावी जेणेकरुन वारा आत येऊन जनावरांना थंडी जाणवणार नाही 

महत्त्वाच्या बातम्या

 Maharashtra Farm Loan Waiver : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार, 30 जुलैच्या आतच प्रत्यक्ष लाभ मिळणार?
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार, 30 जुलैच्या आतच प्रत्यक्ष लाभ मिळणार?
Farmers Loan Waiver: राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाची अपडेट, उद्या पहिली यादी जाहीर होणार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा
राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाची अपडेट, उद्या पहिली यादी जाहीर होणार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा
पावसानं मारली दडी, पिकं वाचवण्यासाठी बळीराजाला पाणी विकत घेण्याची वेळ, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा संघर्ष   
पावसानं मारली दडी, पिकं वाचवण्यासाठी बळीराजाला पाणी विकत घेण्याची वेळ, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा संघर्ष   
Agriculture News: स्वयंपाकघरापासून औषधांपर्यंत... वर्षभर कायम मागणी; बडीशेप लागवड ठरू शकते शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पर्याय
स्वयंपाकघरापासून औषधांपर्यंत... वर्षभर कायम मागणी; बडीशेप लागवड ठरू शकते शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पर्याय

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget