एक्स्प्लोर

Rahibai Popere : अतिवृष्टीचा बीजमाता राहीबाईंना फटका, तब्बल तीन वेळा केली भाजीपाल्याची लागवड 

अतिवृष्टीचा फटका बीजमाता राहीबाई पोपेरे (Rahibai Popere) यांना देखील बसला आहे. अतिवृष्टीमुळं त्यांना तब्बल तीन वेळा भाजीपाला पिकांची लागवड करावी लागली आहे.

Rahibai Popere : यावर्षी परतीच्या पावसाचा (Rain) खूप मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांच्या हाती आलेली पिकं देखील वाया गेली आहेत. या अतिवृष्टीचा फटका बीजमाता राहीबाई पोपेरे (Rahibai Popere) यांना देखील बसला आहे. अतिवृष्टीमुळं त्यांना तब्बल तीन वेळा भाजीपाला पिकांची लागवड करावी लागली आहे. पावसामुळं लावलेली पीक वाया गेल्यानं त्यांना पुव्हा पिकांची लागवड करावी लागली आहे. त्यासाठी घरात जतन केलेले सर्व देशी बियाणे त्यांनी शेतात पेरावे लागले.

यावर्षी राज्यातील बहुतांश भागात यावर्षी जोरदार पावसानं हजेरी लावली. काही ठिकाणी तर अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीचा खूप मोठा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसला आहे. काढणीला आलेली पीक यामुळं वाया गेल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे. अशातच बीजमाता म्हणून ओळख असलेल्या  राहिबाई पोपेरे यांना देखील यांनी देखील अतिवृष्टीचा फटका बसला आहे. पावसामुळं लागवड केलेल्या भाजीपाल्याचे पीक वाया गेल्यानं त्यांना तब्बल तीन वेळा पिकाची लागवड करावी लागली. यामुळं पिकाचं मोठं नुकसान झाल्याची माहिती  राहिबाई पोपेरे यांनी दिली. जिद्दी आणि कष्टाळू असणाऱ्या राहीबाईंनी निसर्गापुढं हार न मानता तिनवेळा गावरान बियाणांची उत्पादनासाठी लागवड केली आहे. घरातील सदस्यांना बरोबर घेत पुन्हा एकदा विविध पिकांचा भाजीपाल्याची लागवड करत त्यांनी बियाणे निर्मिती करण्यात यश मिळवले आहे.


Rahibai Popere : अतिवृष्टीचा बीजमाता राहीबाईंना फटका, तब्बल तीन वेळा केली भाजीपाल्याची लागवड 

कोण आहेत राहिबाई पोपेरे 

राहीबाई पोपेरे यांना ओळखत नाही असा आज महाराष्ट्रातील एकही जिल्हा नाही, गाव नाही. परराज्यात देखील राहीबाईंचं काम पोहोचलय. त्यांच्या कामाची दखल सरकारनं सुद्धा घेतलीय. सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या पदमश्री या पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. कोणतंही शिक्षण झालं नसतानाही शेती क्षेत्रात देशी बीज संवर्धनाचं मोठं काम राहिबाईंनी केलं आहे. 

 200 हून अधिक बियाणांची देशी वाण 

राहीबाई यांचं अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोंभाळने हे गाव.  त्यांचा जन्मही याच गावात झाला आणि त्यांचं सासरची हेच गाव. या लहानश्या गावात राहीबाईंनी मोठं काम केलं आहे. त्यांच्याकडे 52 हून अधिक पिकांची 200 हून अधिक बियाणांची देशी वाण आहेत. 114  रजिस्टर केलेली वाण आहेत. दुर्मिळ होत चाललेल्या बियाणांच्या सर्व वाणांचं जतन त्यांनी केलं आहे. राहीबाई यांच्याकडे अनेक प्रकारच्या जुन्या गावठी पालेभाज्या व वेलवर्गीय भाज्यांचे बियाणे जतन केलेले आहे. हे कोणत्याही आंतरराष्ट्रीय सीड कंपनीकडे उपलब्ध नाही. राहीबाईकडे जे बियाणे आहे ते शेकडो वर्षे आपले पूर्वज खात होते ते मुळ स्वरूपात आहे. त्यांच्याकडे फक्त वालाचेच वीस प्रकार उपलब्ध आहेत. तसेच भाताच्या 16 जाती आहेत. त्याचबरोबर नाचणी, मूग, हरभरा, कारले, दोडका, पालक, गोसावळा, मेथी, भेंडी, गवार, विविध प्रकारच्या रानभाज्यांची वाण त्यांच्याकडे आहेत.

राहीबाईंनी तीन हजार स्त्रीया व शेतकरी यांचा बचतगट बनवलाय. त्यांच्या मार्फत या भाज्या अस्सल गावठी व संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने पिकवल्या जातात व त्यांचे बियाणे मडक्यात जतन केले जाते. तसेच ज्यांना गरज आहे, त्यांना विक्री देखील केली जाते. या कामात सुरुवातीला त्यांना 'बायफा' या संस्थेची खूप मोठी मदत झाली. त्यातूनच त्यांनी हे मोठं काम उभा केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Raksha Bandhan :बीजमाता राहीबाई पोपेरेंकडून भाऊ चंद्रकांत पाटलांना बीज राखी; कशी बनवली ही राखी...

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra kharif Sowing: महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
Maharashtra Farm Loan Waiver Pune: शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी आज जाहीर होणार, पुणे जिल्हा बँकेच्या 61 हजार 900 शेतकऱ्यांना 523 कोटींचा लाभ मिळणार
शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी आज जाहीर होणार, पुणे जिल्हा बँकेच्या 61 हजार 900 शेतकऱ्यांना 523 कोटींचा लाभ मिळणार
धक्कादायक! खते आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर काळाचा घाला, भीषण अपघातात जागीच मृत्यू, बीडच्या केजमध्ये घडली घटना
धक्कादायक! खते आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर काळाचा घाला, भीषण अपघातात जागीच मृत्यू, बीडच्या केजमध्ये घडली घटना
 Maharashtra Farm Loan Waiver : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार, 30 जुलैच्या आतच प्रत्यक्ष लाभ मिळणार?
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार, 30 जुलैच्या आतच प्रत्यक्ष लाभ मिळणार?

व्हिडीओ

Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Student Protest: 'पेपर चोर, गद्दी छोड..' दिल्ली, महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये विद्यार्थ्याचं आंदोलन पेटलं; सिवानमध्ये 10 राऊंड फायरिंग, 8 जिल्ह्यात दगडफेक, बंदला हिंसक वळण
'पेपर चोर, गद्दी छोड..' दिल्ली, महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये विद्यार्थ्याचं आंदोलन पेटलं; सिवानमध्ये 10 राऊंड फायरिंग, 8 जिल्ह्यात दगडफेक, बंदला हिंसक वळण
NEET Maharashtra Protest: वर्षा बंगल्यावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात, मंत्रालय परिसरात कडक सुरक्षा; मुख्यमंत्री, मंत्री, आमदारांच्या सुरक्षेत वाढ, निवासस्थानी सुद्धा बंदोबस्त; सरकारच्या निर्णयावर संजय राऊतांची खोचक टिप्पणी
वर्षा बंगल्यावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात, मंत्रालय परिसरात कडक सुरक्षा; मुख्यमंत्री, मंत्री, आमदारांच्या सुरक्षेत वाढ, निवासस्थानी सुद्धा बंदोबस्त; सरकारच्या निर्णयावर संजय राऊतांची खोचक टिप्पणी
Abhijeet Dipke on PM Modi: दिल्ली पोलिसांनी खाकी वर्दी उतरवून RSSची हाफ चड्डी घालावी, अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल; धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नसल्यास 20 जुलैपेक्षा मोठ्या मोर्चाचा इशारा
दिल्ली पोलिसांनी खाकी वर्दी उतरवून RSSची हाफ चड्डी घालावी, अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल; धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नसल्यास 20 जुलैपेक्षा मोठ्या मोर्चाचा इशारा
Nashik Palghar Earthquake: नाशिक, पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; सुरगाण्यात एकापाठोपाठ चार हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
नाशिक, पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; सुरगाण्यात एकापाठोपाठ चार हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Mumbai Rain Water: दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
'आपलं काम सोडून सगळं काही करतात महामानवजी, मोदीजी आपण काय बोलतो हे नेहमी विसरतात...' सीजेपीनं पेपर लीकवरून 27 जुलै 2023 पासून ते संसदेतील 2 जुलै 2024 पर्यंत मोदींची भाषणेच दाखवली
'आपलं काम सोडून सगळं काही करतात महामानवजी, मोदीजी आपण काय बोलतो हे नेहमी विसरतात...' सीजेपीनं पेपर लीकवरून 27 जुलै 2023 पासून ते संसदेतील 2 जुलै 2024 पर्यंत मोदींची भाषणेच दाखवली
Latur Crime News: प्रेमाचं जाळं अन् अपहरण; लातूर ते थेट चिपळूण, अल्पवयीन मुलीला नराधमांनी डांबून तिच्यासोबत नको ते केलं, पोलिसांची चक्रं फिरली, लोकेशन सापडलं, 24 तासात आणलं घरी
प्रेमाचं जाळं अन् अपहरण; लातूर ते थेट चिपळूण, अल्पवयीन मुलीला नराधमांनी डांबून तिच्यासोबत नको ते केलं, पोलिसांची चक्रं फिरली, लोकेशन सापडलं, 24 तासात आणलं घरी
Sonam Wangchuk: सोनम वांगचूक यांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, दरवाजा जोरात ढकलला, पोलिसांना म्हणाले, 'तणावामुळे माझा मृत्यू झाला तर...'
सोनम वांगचूक यांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, दरवाजा जोरात ढकलला, पोलिसांना म्हणाले, 'तणावामुळे माझा मृत्यू झाला तर...'
Embed widget