एक्स्प्लोर

सरकारनं दबावाला बळी पडू नये, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणारा 'हा' कायदा रद्द करु नये; स्वतंत्र भारत पार्टीची मागणी

सरकारनं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणारा कायदा रद्द करु नये अशी मागणी स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट (Anil Ghanwat) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.

Agriculture News : शेतकऱ्यांना विकलेल्या कृषी निविष्ठा निकृष्ट दर्जाच्या असल्यामुळं शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनानं प्रस्तवित केलेले कायदे मागे घ्यावेत, यासाठी काही संघटनांकडून शासनावर दबाव टाकला जात आहे. सरकारनं या दबावाला बळी पडू नये. या कायद्यांमध्ये सुधारणा करुन कायदे आंमलात आणावेत यासाठी स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट (Anil Ghanwat) यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवले आहे.

खते, बियाणे किंवा कीटकनाशके निकृष्ट, कमी प्रत, बनावट किंवा पिकांना नुकसानकारक असतील आणि त्यामुळं शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले तर त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सध्या कोणताही कायदा अस्तित्वात नाही. महाराष्ट्र शासनाची शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर वचक असावी. तसेच अशा गुन्हेगारांना कठोर शासन व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाने कायद्यात दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. शेतकऱ्यांची फसवणूक थांबण्यासाठी आणि फसवणूक झाल्यास नुकसान भरपाई मिळण्यासाठी अशा कायद्यांची गरज असल्याचे मत घनवट यांनी व्यक्त केले.

 शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये

कृषी निविष्ठा बाबतच्या कायद्याबद्दल कृषी सेवा केंद्र मालक, वितरक, उत्पादक कंपन्यांमध्ये अनेक गैरसमज आहेत. त्यामुळं कायदे रद्द करण्याची मागणी केली जात आहे. अशी मागणी करणे शेतकऱ्यांचे नुकसान करणारी आहे. तसेच गैरप्रकार करणाऱ्यांना पाठीशी घालणारी आहे. त्यामुळं राज्य शासनाने कायदे संमत करण्याअगोदर बियाणे, कीटकनाशक कंपन्या, वितरक, कृषीसेवा केंद्र चालक यांच्या संघटना आणि शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा करुनच निर्णय घ्यावा असे घनवट म्हणाले.   

नवीन प्रस्तावित कायद्यामध्ये खालील सुधारंना आवश्यक 

1) कृषी निविष्ठा संबंधी आरोपींसाठी एम पी डी ए. आणखी एक वेगळे कलम तयार करून, वाळू तस्कर, झोपडपट्टी दादा, यांच्या श्रेणीतून वेगळे करावे. शिक्षा व दंड असेच ठेवावेत.
2)  खते, बियाणे व कीटकनाशकं बरोबर पी जी आर ( संप्रेरके) व तणनाशकांचा ही या कायद्यात समावेश करण्यात यावा.
3) ज्या बाबींमध्ये तक्रार करण्यासाठी 48 तासाची मुदत आहे ती वाढवून आठ दिवस करण्यात यावी.
4) कंपनी, दुकानदार किंवा स्टोकिस्ट यांच्याकडून होते वसूल करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाईची तरतूद असावी.
5) जाणीवपूर्वक वारंवार खोटी तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांवर सुद्धा कारवाई किंवा दंड करावयाची कायद्यात तरतूद असावी.

स्वतंत्र भारत पक्षातर्फे वरील सुधारणा सुचण्यात येत आहेत. कोणत्याही परिस्थितीत कृषी निविष्ठा व्यवसायिक संघटनांच्या दबावाला बळी पडून कायदे रद्द करु नयेत, अशी विनंती स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद

व्हिडीओ

Savarkar Statue Andaman : सावरकरांना वंदन, पुतळ्याचं अनावरण Special Report
Maratha Reservation Hyderabad gazette : हैदराबाद गॅझेटचा खरंच फायदा झाला का? Special Report
CBSE Syllabus : CBSE भोंगळ कारभारावर शिवप्रेमींचा संताप Special Report
Nashik Tapovan Kumbhmela :  तपोवनचा वाद, संतापला हरित लवाद Special Report
Shiv Sena-BJP Alliance : महानगर पालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना यांच्यात युती Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
Embed widget