एक्स्प्लोर

Agriculture News : केळीनं भरलेली मालगाडी तब्बल 12 तासानंतर स्टेशनवरुन रवाना, शेतकरी संतप्त, लाखो रुपयांना बसणार फटका

चालक उपलब्ध नसल्याने केळीने भरलेली मालगाडी तब्बल 12 तासाहून अधिक वेळ झालं स्टेशनवर उभी होती. ही मालगाडी जळगाव जिल्ह्यातील सावदा रेल्वे स्टेशनवर उभी होती.

Jalgaon Agriculture News : केळीने (banana) भरलेली मालगाडी तब्बल 12 तासानंतर स्टेशनहून रवाना झाली. चालक उपलब्ध नसल्यानं 12 तास ही मालगाडी जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील सावदा रेल्वे स्टेशनवर (Savda Railway Station) उभी होती. रात्री एक वाजण्याच्या सुमारास ही गाडी दिल्लीकडे रवाना झाली. जळगाव ते दिल्ली अशी शेत मालाची वाहतूक या गाडीतून केली जाते. यावरुन शेतकरी मात्र, चांगलेच आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांनी रेल्वे प्रशासना विरोधात रोष व्यक्त करत थेट रेल्वे मंत्रालयातच या घटनेची माहिती दिली आहे. दरम्यान, मध्यरात्री एक वाजता चालक उपलब्ध झाल्यानंतर गाडी दिल्लीकडे रवाना झाली आहे.

तब्बल 12 तास एकाच जागेवर उभी असणाऱ्या मालगाडीत लाखो रुपयांची केळी होती. चालक नसल्यानं मालगाडीला निघण्यास विलंब झाल्यानं लाखो रुपयांच्या केळीचं नुकसान होण्याची शक्यता आहे. या नुकसानीस जबाबदार कोण? असा प्रश्नी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे.

 रेल्वे विभागाकडून केळी उत्पादक शेतकऱ्यांची थट्टा, शेतकऱ्यांचा आरोप
 
रेल्वेच्या गलथान कारभाराचा प्रत्येक केळी उत्पादक शेतकऱ्यांना आला आहे. केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम रेल्वे विभाग करत असल्याचा आरोप केळी उत्पादक शेतकरी करत आहेत. आधीच 14 तास उशिराने मिळालेली केळी वागन्स रात्री उशिरापर्यंत लोड करण्याचं काम केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून चालू होतं. रात्री बारा वाजता ते पूर्ण होऊन एक तासात सावदा रेल्वे स्टेशन येथून गाडी निघायला हवी होती. परंतू तसं न होता सुमारे 12 तास सावदा रेल्वे स्टेशनवर ती गाडी तशीच उभी असल्यानं रेल्वे विभागाकडून केळी उत्पादक शेतकऱ्यांची घोर थट्टा सुरु आहे की काय असा प्रश्न निर्माण उपस्थित केला जात आहे. कालच रेल्वेच्या गलथान कारभाराचा आरोप सावदा फळबागायतदार युनियनने केला आहे. सकाळी रेल्वे वॅगन उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिल्यानंतर तब्बल 14 तासानंतर ते उपलब्ध करुन देण्यात आले होते. त्यामुळं दिवसभर कापलेली केळी सावदामाल धक्क्यावरच पडून होती. 

रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली उडवा उडवीची उत्तरे 

या गलथान कारभाराविषयी रेल्वेचे डीआरएम (Divisional Railway Manager) लक्ष द्यायला तयार नसल्याचा आरोपही केला जात आहे. रात्री भरलेली गाडी सकाळी बारा वाजेपर्यंत सावदा रेल्वे स्टेशनवर जशीच्या तशी उभी असल्यानं शेतकऱ्यांना यातून लाखो रुपयांचे नुकसान होणार असल्याचं केळी उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले आहे. दरम्यान, या भोंगळ कारभाराविषयी प्रसारमाध्यमांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला तेव्हा अधिकाऱ्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली आहेत. एक महाशय तर खूपच उर्मट भाषेत या  शेतकऱ्यांशी बोलत होते. त्यामुळं रेल्वेला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न देणाऱ्या केळी उत्पादक शेतकऱ्यांवरच रेल्वेचे अधिकारी कोणता राग काढत आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शेतकऱ्यांचे सुमारे 25 लाखाचे नुकसान होणार

रेल्वेकडून दिलेल्या वेळेत केळीची लोडिंग न झाल्यास रेल्वेकडून प्रति चार हजार रुपये विलंब शुल्क आकारण्यात येते. केव्हा केव्हा पाच ते दहा मिनिटांचेंदी विलंब फी आकारण्यात येते. मात्र, रेल्वेकडून उशीर झाल्यास शेतकऱ्यांना कोणतीही  मुभा मिळत नाही. केळीनं भरलेली रेल्वे गाडी 12 तास सावदा स्टेशनवर उभी होती. हे नाशिवंत फळ असल्याने ते जास्त वेळ टिकत नाही. या गाडीतील केळी ही खराब होणार हे निश्चित आहे. त्यामुळं दिल्लीतील व्यापारी कमी दरात  या केळीची मागणी करतील. त्यामुळं शेतकऱ्यांचे सुमारे 25 लाखाचे नुकसान होणार आहे. याला रेल्वे प्रशासनच जबाबदार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : एका प्रामाणिक अधिकाऱ्याला किती त्रास द्यायचा? नागपुरात काही लोकांची मनमानी होऊ दिली नाही, म्हणून...;  तुकाराम मुंडे स्पष्टच बोलले
एका प्रामाणिक अधिकाऱ्याला किती त्रास द्यायचा? नागपुरात काम करताना काही लोकांची मनमानी होऊ दिली नाही, म्हणून...;  तुकाराम मुंडेंचा घणाघात
Dr. Anjali Nimbalkar : विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
Devendra Fadnavis: शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
Hardik Pandya : आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत चार जणांना जमलेली कामगिरी हार्दिक पांड्यानं केली, पहिलाच भारतीय ठरला
हार्दिक पांड्याच्या नावावर नवा विक्रम, टी 20 मध्ये 'ही' कामगिरी करणारा भारताचा पहिलाच खेळाडू ठरला

व्हिडीओ

Nitin Nabin BJP President : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी बिहारच्या नितीन नवीन यांची निवड
Australia Sydney Terrorist Attack : ऑस्ट्रेलियातल्या सिडनीत दहशतवादी हल्ला Special Report
John Cena Retirement : जॉन सीनाची WWE रेसलिंगमधून निवृत्ती, कारण काय? Special Report
Nagpur Slum Area : झोपडपट्टी सुधारणेचं नागपूर मॉडेल Special Report
Ahilyanagar Leopard : अहिल्यानगरात बिबट्याची दहशत कधी संपणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : एका प्रामाणिक अधिकाऱ्याला किती त्रास द्यायचा? नागपुरात काही लोकांची मनमानी होऊ दिली नाही, म्हणून...;  तुकाराम मुंडे स्पष्टच बोलले
एका प्रामाणिक अधिकाऱ्याला किती त्रास द्यायचा? नागपुरात काम करताना काही लोकांची मनमानी होऊ दिली नाही, म्हणून...;  तुकाराम मुंडेंचा घणाघात
Dr. Anjali Nimbalkar : विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
Devendra Fadnavis: शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
Hardik Pandya : आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत चार जणांना जमलेली कामगिरी हार्दिक पांड्यानं केली, पहिलाच भारतीय ठरला
हार्दिक पांड्याच्या नावावर नवा विक्रम, टी 20 मध्ये 'ही' कामगिरी करणारा भारताचा पहिलाच खेळाडू ठरला
IND vs SA : शुभमन गिलला सूर गवसला, टीम इंडियाचा तिसऱ्या टी 20 मध्ये दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय, मालिकेत 2-1 अशी आघाडी
भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विजय, मालिकेत 2-1 अशी आघाडी, शुभमन गिलला सूर गवसला
Ranveer Singh Deepika Padukone: आठ तासांपेक्षा जास्त काम करायला दीपिका पादुकोणची ना; आता तिचा नवरा रणवीर सिंहच म्हणतोय; 'कर लो ना थोड़ी ज्यादा शूटिंग...'
दीपिका पादुकोण म्हणते, 'आठच तासांची शिफ्ट...'; आता तिचा नवरा रणवीर सिंहच म्हणतोय; 'कर लो ना थोड़ी ज्यादा शूटिंग...'
IND vs SA : अर्शदीप सिंगचं दमदार कमबॅक, गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 117 धावांवर रोखलं, एकटा एडन मारक्रम लढला
अर्शदीप सिंगचं दमदार कमबॅक, गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 117 धावांवर रोखलं, एकटा एडन मारक्रम लढला
IND vs PAK Asia Cup U19 : भारताच्या पोरांनी पाकिस्तानला लोळवलं, आशिया कप अंडर 19 स्पर्धेत आयुष म्हात्रेच्या टीमचा दणदणीत विजय
भारतानं पाकिस्तानला लोळवलं, आशिया कप अंडर 19 स्पर्धेत आयुष म्हात्रेच्या टीमचा दणदणीत विजय
Embed widget