एक्स्प्लोर

Agriculture News : केळीनं भरलेली मालगाडी तब्बल 12 तासानंतर स्टेशनवरुन रवाना, शेतकरी संतप्त, लाखो रुपयांना बसणार फटका

चालक उपलब्ध नसल्याने केळीने भरलेली मालगाडी तब्बल 12 तासाहून अधिक वेळ झालं स्टेशनवर उभी होती. ही मालगाडी जळगाव जिल्ह्यातील सावदा रेल्वे स्टेशनवर उभी होती.

Jalgaon Agriculture News : केळीने (banana) भरलेली मालगाडी तब्बल 12 तासानंतर स्टेशनहून रवाना झाली. चालक उपलब्ध नसल्यानं 12 तास ही मालगाडी जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील सावदा रेल्वे स्टेशनवर (Savda Railway Station) उभी होती. रात्री एक वाजण्याच्या सुमारास ही गाडी दिल्लीकडे रवाना झाली. जळगाव ते दिल्ली अशी शेत मालाची वाहतूक या गाडीतून केली जाते. यावरुन शेतकरी मात्र, चांगलेच आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांनी रेल्वे प्रशासना विरोधात रोष व्यक्त करत थेट रेल्वे मंत्रालयातच या घटनेची माहिती दिली आहे. दरम्यान, मध्यरात्री एक वाजता चालक उपलब्ध झाल्यानंतर गाडी दिल्लीकडे रवाना झाली आहे.

तब्बल 12 तास एकाच जागेवर उभी असणाऱ्या मालगाडीत लाखो रुपयांची केळी होती. चालक नसल्यानं मालगाडीला निघण्यास विलंब झाल्यानं लाखो रुपयांच्या केळीचं नुकसान होण्याची शक्यता आहे. या नुकसानीस जबाबदार कोण? असा प्रश्नी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे.

 रेल्वे विभागाकडून केळी उत्पादक शेतकऱ्यांची थट्टा, शेतकऱ्यांचा आरोप
 
रेल्वेच्या गलथान कारभाराचा प्रत्येक केळी उत्पादक शेतकऱ्यांना आला आहे. केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम रेल्वे विभाग करत असल्याचा आरोप केळी उत्पादक शेतकरी करत आहेत. आधीच 14 तास उशिराने मिळालेली केळी वागन्स रात्री उशिरापर्यंत लोड करण्याचं काम केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून चालू होतं. रात्री बारा वाजता ते पूर्ण होऊन एक तासात सावदा रेल्वे स्टेशन येथून गाडी निघायला हवी होती. परंतू तसं न होता सुमारे 12 तास सावदा रेल्वे स्टेशनवर ती गाडी तशीच उभी असल्यानं रेल्वे विभागाकडून केळी उत्पादक शेतकऱ्यांची घोर थट्टा सुरु आहे की काय असा प्रश्न निर्माण उपस्थित केला जात आहे. कालच रेल्वेच्या गलथान कारभाराचा आरोप सावदा फळबागायतदार युनियनने केला आहे. सकाळी रेल्वे वॅगन उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिल्यानंतर तब्बल 14 तासानंतर ते उपलब्ध करुन देण्यात आले होते. त्यामुळं दिवसभर कापलेली केळी सावदामाल धक्क्यावरच पडून होती. 

रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली उडवा उडवीची उत्तरे 

या गलथान कारभाराविषयी रेल्वेचे डीआरएम (Divisional Railway Manager) लक्ष द्यायला तयार नसल्याचा आरोपही केला जात आहे. रात्री भरलेली गाडी सकाळी बारा वाजेपर्यंत सावदा रेल्वे स्टेशनवर जशीच्या तशी उभी असल्यानं शेतकऱ्यांना यातून लाखो रुपयांचे नुकसान होणार असल्याचं केळी उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले आहे. दरम्यान, या भोंगळ कारभाराविषयी प्रसारमाध्यमांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला तेव्हा अधिकाऱ्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली आहेत. एक महाशय तर खूपच उर्मट भाषेत या  शेतकऱ्यांशी बोलत होते. त्यामुळं रेल्वेला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न देणाऱ्या केळी उत्पादक शेतकऱ्यांवरच रेल्वेचे अधिकारी कोणता राग काढत आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शेतकऱ्यांचे सुमारे 25 लाखाचे नुकसान होणार

रेल्वेकडून दिलेल्या वेळेत केळीची लोडिंग न झाल्यास रेल्वेकडून प्रति चार हजार रुपये विलंब शुल्क आकारण्यात येते. केव्हा केव्हा पाच ते दहा मिनिटांचेंदी विलंब फी आकारण्यात येते. मात्र, रेल्वेकडून उशीर झाल्यास शेतकऱ्यांना कोणतीही  मुभा मिळत नाही. केळीनं भरलेली रेल्वे गाडी 12 तास सावदा स्टेशनवर उभी होती. हे नाशिवंत फळ असल्याने ते जास्त वेळ टिकत नाही. या गाडीतील केळी ही खराब होणार हे निश्चित आहे. त्यामुळं दिल्लीतील व्यापारी कमी दरात  या केळीची मागणी करतील. त्यामुळं शेतकऱ्यांचे सुमारे 25 लाखाचे नुकसान होणार आहे. याला रेल्वे प्रशासनच जबाबदार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
Shetkari Kajmafi : मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? A to Z माहिती
मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? A to Z माहिती
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
Embed widget