Atul Bhatkhalkar on MahaVikas Aghadi : "मविआचे लोक हरभऱ्याच्या झाडावर, जनता महायुतीसोबत"
Atul Bhatkhalkar on MahaVikas Aghadi : "मविआचे लोक हरभऱ्याच्या झाडावर, जनता महायुतीसोबत"
हे देखील वाचा
''जरांगे 4 वेळा येऊन तुम्ही भेटला नाहीत, पण हाकेंना स्वत:हून भेटायला गेला''; मराठा आंदोलकांनी अडवलं
परभणी : राज्यभरात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा समाज आक्रमक झाला असून मराठा आंदोलकांकडून मराठा (Maratha) नेत्यांना, मंत्र्यांना आणि सर्वच राजकीय पक्षांना जाब विचारला जात आहे. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केली असून आगामी विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha election) उतरण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे, महाविकास आघाडी व महायुतीमधील सर्वच राजकीय पक्षांची चांगलीच गोची झाल्याचं दिसून येत आहे. त्यातच, मराठा आंदोलकांनी आज परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांना अडवून आरक्षणाबाबत जाब विचारला. तसेच, तुम्ही मनोज जरांगेंना (Manoj Jarnage) अद्याप का भेटला नाहीत, याउलट लक्ष्मण हाकेंची स्वत:हून भेट घेऊन पांठिंबा जाहीर केल्याचंही मराठा आंदोलकांनी म्हटलं.