Mumbai : तब्बल 22 म्हशींवर सूऱ्याने सपासप वार, 7 म्हशींचा मृत्यू, भिवंडीतील धक्कादायक प्रकार
Mumbai : भिवंडी शहरातील बंदर मोहल्ला येथील अरहम मोमिन यांच्या तबेल्यात अज्ञात इसमांनी तबेल्यातील तब्बल 22 म्हशीं वर सूऱ्याने सपासप वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे त्यापैकी 7 म्हशींचा मृत्यू झालं आहे . या हल्ल्यात 22 म्हशीचे गळा आणि पायांच्या नसा सुऱ्याने कापण्यात आल्याअसून या घटनेने मुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात 7 म्हशीचा मृत्यू झाला आहे तर 15 म्हशी गंभीर जखमी झाल्या असून त्यामधील काही म्हशी अंत्यवस्थेत असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे . याबाबत अरहम मोमीन यांच्या तक्रारी वरून निजामपूरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले असून पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा तपास सुरु केला आहे...



















