एक्स्प्लोर
Nashik Wet Drought : ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक
नाशिकमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे वणीमधील शेतकऱ्यांनी राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची आग्रही मागणी केली आहे. पावसामुळे द्राक्ष आणि भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. संतप्त शेतकऱ्यांनी सापुतराचा रस्ता रोखून आपला निषेध व्यक्त केला. द्राक्ष पिकांसाठी प्रति एकर दीड लाख रुपये आणि भाजीपाल्यासाठी प्रति एकर पन्नास हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. बिरसा मुंडा चौकामध्ये शेतकऱ्यांनी कांदे, टोमॅटो आणि बटाटे रस्त्यावर फेकून रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत झाली. मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून, त्यांना तातडीने सरकारी मदतीची अपेक्षा आहे. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे.
महाराष्ट्र
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 100 वर्ष : शतसाधना :संघ एक, अध्याय अनेक Shatsadhana
Manoj Jarange Dasara Melava : राज्यभरातून शेतकरी बैठकीला बोलावू, आंदोलन सुरु करु; जरांगेंचा इशारा
Manoj Jarange Dasara Melava : त्या राज ठाकरेकडे कमी आहे का? त्याची प्रॉपर्टी कापाना...जरांगे कडाडले
Manoj Jarange Dasara Melava : हेक्टरी 70 हजार ते 100 टक्के भरपाई...मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange Dasara Melava : दिवाळीआधी ओला दुष्काळ जाहीर करा, मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

महेश गलांडे
Opinion

















