Uddhav Thackeray Full PC : मिंध्यांनी चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घ्यावा, उद्धव ठाकरेंचा घणाघात
मुंबई: बाबरी जेव्हा पाडली तेव्हा हे सगळे 'उंदीर' बिळात लपले होते. भाजपकडे कोणतंही शौर्य नव्हतं. बाबरी पाडली त्या वेळी दंगली झाल्या त्यावेळी आमची सत्ता नव्हती तरीही आम्ही मुंबई वाचवली. आता हे सगळे बिळातून बाहेर आले आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेब ठाकरेंबद्दल वादग्रस्त दावा केला त्यावर उद्धव प्रतिक्रिया दिली आहेत. उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपकडे शौर्य नव्हतं त्यावेळी मुंबई शिवसेनेनी वाचवली आहे. त्यावेळी पंतप्रधानांचं नााव देखील कुठेही नव्हतं. बाबरी पाडली त्या वेळी दंगली झाल्या त्यावेळी आमची सत्ता नव्हती तरीही आम्ही मुंबई वाचवली. बाबरी मशिदीबाबत ही बातमी आली तेव्हा बाळासाहेबांना फोन आला तेव्हा ते बोलले माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला अभिमान आहे. आता हे सगळे बिळातून बाहेर आले आहेत.


















