एक्स्प्लोर
Advertisement
चिपळूणच्या वाशिष्ठी नदीत शेकडो मगरी, पुराच्या पाण्यासोबत मगरी वस्तीत, मगरींमुळे बाहेर पडणं अशक्य
चिपळूण : गेल्या 36 तासांत अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि खेड येथील परिस्थिती अतिबिकट बनली. चिपळूणला महापुराचा विळखा बसला असून संपूर्ण शहर चहुबाजूने पाण्यात आहे. हजारो लोक पुरात अडकले असून एनडीआरफच्या टीम बचावकार्यासाठी दाखल झाल्या आहेत. चिपळूणच्या कळंबस्ते भागात एका घराच्या छतावर अडकलेल्या 15 जणांची गावकऱ्यांनीच धाडस करुन सुखरुप सुटका केली आहे.
कळंबस्ते भागशाळेजवळ जिथे वाशिष्ठीचा प्रवाह भयंकर आहे तिथे परवा रात्रीपासून माणसे घराच्या छतावर अडकली होती. नदीचा प्रवाह जवळच असल्यानं नदी आणि घर एक आहे अशी स्थिती झाली होती. परिसरातील घरं पूर्ण पाण्यात होती. काल पहाटेपासून रात्री उशीरापर्यंत लोकं अडकली होती. यात वृद्धांसह लहान मुलं देखील होती. आता पूर ओसरला असून लोकांपर्यंत मदतीचा हात पोहोचण्याची प्रतीक्षा आहे.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : दुपारी 07 च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
करमणूक
भारत
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement