एक्स्प्लोर

Nawab Malik : राष्ट्रपती निवडणुकीबाबत रणनीती 5 राज्यांच्या निवडणुकीनंतर कळेल : नवाब मलिक

मुंबई : 2014 साली राष्ट्रवादीने आम्हाला धोका दिला त्यामुळेच आम्ही स्वबळाची भाषा करत आहोत, या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले की, "नाना पटोले पहिल्यांदा बोलतात, बातम्या सुरु होतात. परंतु ते त्यानंतर सांगतात की, माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला. त्यामुळे आता ते काय बोलले हे मी ऐकलं नाही." अशी खोचक प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली. मागील काही दिवसांत नाना पटोले यांनी महाविकास आघाडी मध्ये नाराजी निर्माण होईल, अशी वक्तव्य केली होती. यावर शरद पवारांनी देखील खोचक प्रतिक्रिया दिली होती.

दरमान्य मागील काही दिवसांत प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची घेतलेली भेट आणि त्यानंतर दोन दिवसांपूर्वी राहुल गांधी प्रियांका गांधी यांची घेतलेली भेट याबाबत बोलताना माध्यमांमध्ये शरद पवार यांना राष्ट्रपती पदाचे उमेदवार घोषित करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे. तसेच प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. या प्रश्नाला उत्तर देताना नवाब मलिक म्हणाले की, "राष्ट्रपती पदाची निवडणूक आता नाही. ज्या बातम्या येत आहेत त्या निराधार आहेत, खोट्या आहेत. त्याचा खुलासा आम्ही कालपण केला आहे. 5 राज्यांचा निकाल जो येईल त्याबरून सांगता येईल. शरद पवार यांच्या उमेदवारीबाबत पक्षांतंर्गत कधीच चर्चा झाली नाही. किंवा इतर पक्षांसोबत सुद्धा आमची कोणतीच चर्चा झाली नाही. प्रशांत किशोर शरद पवार यांना भेटले हे खरं आहे. परंतु ते इतर नेत्यांना कशासाठी भेटत आहेत हे माहिती नाही."

आज काँग्रेस पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सायकलवर जाऊन भेट घेणार आहेत याबाबत बोलताना नवाब मलिक म्हणाले की, "2014ची निवडणूक भाजपने पेट्रोल-डिझेलचा मुद्दा समोर करून 'अब की बार मोदी सरकार' अशी जाहिरातबाजी केली. परंतु भाजप सत्तेत आल्यानंतर सातत्याने भाववाढ थांबत नाहीय. महत्त्वाची बाब आंतरराष्ट्रीय भाववाढ कमी आहे तरीदेखील देशात भाववाढ कायम आहे. सध्या केवळ सरकारी तिजोरी भरण्याचं काम सुरू आहे. दरवर्षी 4 लाख कोटी रुपये हे सरकार लोकांच्या खिशातुन काढत आहे. बोलायचं एक आणि करायचं एक असं काम मोदी सरकार करत आहे. गॅस दरवाढ, डिझेल दरवाढ थांबायचं नाव घेत नाही. सीएनजीची देखील दरवाढ देखील सुरुच आहे. लोकांच्या लक्षात येणार नाही, अशा प्रकारे त्यांचा खिसा कापण्याचं काम मोदी सरकार करत आहे. महागाईमुळे लोकांचे बजेट हाताबाहेर गेलं आहे. त्यामुळे आमच्या पक्षाची देखील धरणे आंदोलने सुरु आहेत."

अनिल देशमुख यांच्या पत्नीला ईडीचं समन्स आलं आहे याबाबत बोलताना मलिक म्हणाले की, "भाजप केंद्रीय यंत्रणेचा दुरुपयोग करून महाविकास आघाडीतील नेत्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. लोकांना त्रास देणे, बदनाम करणे असं धोरण यांनी अवलंब आहे. देशमुख कुटुंबिय, खडसे कुटुंबीय यांच्या बाबत हेच घडलं आहे. लोकांच्या मनात भीती निर्माण करून सत्ता मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. बंगालमध्ये तसंच केलं इतर पक्ष फोडून आपल्या पक्षात घेतलं परंतु सरकार आलं नाही. आता ज्यांना फोडलं होतं ते स्वतःच्या पक्षात जात आहेत. आता भाजपने त्यांचा झालेला गैरसमज दूर केला पाहिजे. आता कितीही यंत्रणांचा वापर केला तरी कोणीही त्यांना घाबरणार नाही."

महाराष्ट्र व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sukhbir Singh Badal : सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, सुनियोजित राजकीय षड्यंत्राचा आरोप
सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाल्या?
जयकुमार गोरे कॉप्या करुन पास झालेले मंत्री, सुषमा अंधारेंनी शेलक्या शब्दात घेतला समाचार, आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलं
जयकुमार गोरे कॉप्या करुन पास झालेले मंत्री, सुषमा अंधारेंनी शेलक्या शब्दात घेतला समाचार, आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलं
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget