एक्स्प्लोर
MVA-MNS PC:1 नोव्हेंबरला मुंबईत विरोधी पक्षांचा विरोट मोर्चा,सर्वपक्षीय विरोधकांची पत्रकार परिषद
महाराष्ट्रातील मतदार याद्यांमध्ये (Voter Lists) झालेल्या गोंधळाविरोधात विरोधी पक्ष एकवटले असून, शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या नेतृत्वात १ नोव्हेंबर रोजी मुंबईत विराट मोर्चाची घोषणा करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी, 'निवडणुकीचं मॅच फिक्सिंग झालेलं आहे आणि या मॅच फिक्सिंग विरुद्धच आपली ही लढाई आहे,' असं म्हणत या आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्राच्या मतदार यादीत सुमारे ९६ लाख बोगस मतदार असून ते घुसखोरच आहेत, असा गंभीर आरोप विरोधकांनी केला आहे. सत्ताधारी पक्षाच्याच आमदारांनी (MLAs) बोगस मतदार नोंदणीची जाहीर कबुली दिल्याने हा वाद आणखी चिघळला आहे. निवडणूक आयोगाचा कारभार भ्रष्ट आणि मनमानी स्वरूपाचा असून, त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने रस्त्यावर उतरूनच दणका द्यावा लागेल, अशी भूमिका विरोधी पक्षांनी पत्रकार परिषदेत मांडली. हा लढा राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वात दिल्लीतही लढला गेला होता आणि आता तोच संघर्ष महाराष्ट्रात तीव्र होत आहे.
महाराष्ट्र
Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion





















