Maharashtra Lok Sabha : राज्यात सर्वात कमी मतदान, श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात सर्वात कमी मतदान
लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातल्या पाचव्या आणि अखेरच्या टप्प्यात मतदारांनी निरुत्साह दाखवलाय.. अनेक मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचं दिसलं.. १३ मतदारसंघांमध्ये मिळून ५४.३३ टक्के मतदान झालंय. मुंबईतल्या सहा मतदारसंघांसह ठाणे, कल्याण, भिवंडी आणि पालघर मतदारसंघांमध्ये रात्री किती टक्के मतदान झालं, ते ग्राफिक्समधून.
आतापर्यंत झालेल्या पाच टप्प्यांमध्ये सर्वाधिक कमी मतदान डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारसंघात झालंय... कल्याणमध्ये ४१.७० टक्के मतदान झालंय... त्यामुळे या घसरलेल्या टक्केवारीचा फटका कुणाला बसणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.. दरम्यान हजारो नावं मतदारयादीतून गहाळ झाल्यामुळे मतदानाचा टक्का घसरल्याचं समोर येतंय.. सकाळपासून विविध मतदार केंद्रांवर लोक व्होटर आयडी हातात घेऊन मतदार यादीत नाव शोधत होते. नावं गायब झाल्याचं समजल्यावर प्रचंड संताप, हताशा व्यक्त होत होती... आता या प्रकाराविरोधात कोर्टात दाद मागण्याची तयारी नागरिकांनी सुरू केलीय.