एक्स्प्लोर
EC vs Rahul Gandhi: निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आव्हान, 'मतचोरी'वर पुरावा द्या!
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर 'मतचोरी'चा आरोप केला होता. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये फेरफार झाल्याचा दावा करत त्यांनी काही पुरावे सादर केले. राहुल गांधींच्या मते, लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात निवडणूक आयोगाने 'जादूने' एक कोटी नवीन मतदार तयार केले. यावर निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राहुल गांधींना थेट आव्हान दिले. "हलफनामा देना होगा या देश से माफी मांगनी होगी, तिसरा विकल्प नाही," असे आयोगाने स्पष्ट केले. सात दिवसांत हलफनामा न मिळाल्यास आरोप निराधार मानले जातील, असेही आयोगाने म्हटले. निवडणूक आयोग कोणत्याही राजकीय पक्षात भेदभाव करत नाही, असेही आयोगाने नमूद केले. वीस वर्षांपासून राजकीय पक्ष मतदान यादीत सुधारणा करण्याची मागणी करत आहेत, याचा विचार करून बिहारमधून एसआयआरची सुरुवात केल्याचे आयोगाने सांगितले. मात्र, काही काँग्रेस नेत्यांनी आयोगावर भाजपच्या स्क्रिप्टनुसार काम करत असल्याचा आरोप केला. राहुल गांधी सध्या बिहारमध्ये 'वोटर अधिकार यात्रेत' आहेत. आता राहुल गांधी सात दिवसांत पुरावे देतात की माफी मागतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
महाराष्ट्र
Raj Uddhav Thackeray Brothers Alliance : उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार
Ratnagiri Lote MIDC : इटलीतून हद्दपार केलेला प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमध्ये सुरु
Laxman hake OBC : अजितदादांच्या बालेकिल्ल्यात आमचा विजय, महाराष्ट्र अभी बाकी है, लक्ष्मण हाके आक्रमक
Satara Jallosh : जेसीबीतून फुलांसह 100 किलो गुलालाची उधळण, तुफान जल्लोष
Sudhir Mungantiwar : मुख्यमंत्रिपद येतं-जातं, परमनंट कोणीच नाही
आणखी पाहा























