Nana patole on CM Thackeray and Ajit Pawar : नाना पटोले यांची उद्विग्नता समोर आली : प्रवीण दरेकर
"आपल्याच सहकाऱ्यावर अशा प्रकारची पाळत ठेवली जाते, असं स्वतः तिन पक्षांच्या सरकारमधील एका पक्षाचा प्रदेशाध्यक्ष बोलतोय, हे महाविकास आघाडी सरकार म्हणून अत्यंत गंभीर आहे. तिन पक्षाच्या सरकारमध्ये आपापसातच सुसंवाद नसेल, समन्वय नसेल, तर राज्याच्या जनतेला आपण काय देणार आहोत, हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे सध्या राज्य एका वेगळ्या वळणावर आहे, असं मला वाटतंय. कारण नाना पटोलेंची अशी वक्तव्य दररोज येत आहेत. तसेच इतर मित्र पक्षांकडून त्यांना प्रत्युत्तरही दिलं जातंय. हे राज्याच्या दृष्टीनं अत्यंत गंभीर आहे. कारण नाना पटोले सांगतात की, स्वबळाची भाषा केल्यापासून राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पायाखालची वाळू घसरतेय, याचा अर्थ नाना पटोलेंनी स्पष्ट केलंय की, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आहेत. तसेच यापूर्वी त्यांच्या अनेक नेत्यांनी एकत्र निवडणूक लढवण्यासंदर्भात सूतोवाचही केलं आहेच. त्यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेस एकटी पडल्याचं दिसतंय.", असं प्रवीण दरेकर म्हणाले.