Bharat Jodo Yatra Maharashtra : भारत जोडो यात्रेत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचा सहभाग
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो पदयात्रा काल महाराष्ट्रात दाखल झाली. आज नांदेडमधील देगलुरच्या वणाळी गावातील बाबा फतेह सिंह गुरुद्वारामधून पदयात्रा पुढे निघतेय. काल रात्री भारत जोडो यात्रा देगलुरमध्ये दाखल झाली तेव्हा हजारो कार्यकर्त्यांनी मशाल घेऊन यात्रेचं स्वागत केलं. त्यानंतर राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. देगलूर ते वन्नाळी रस्त्यावर एकतेची मशाल घेऊन निघालेल्या यात्रेला नंतर राहुल गांधी यांनी संबोधित केलं. या यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेच्या वेदना समजून घ्यायच्या आहेत, असं राहुल गांधी यांनी सांगितलं. कन्याकुमारीपासून सुरु झालेली ही यात्रा काश्मीरपर्यंत कुणीही रोखू शकणार नाही, असं ते म्हणाले.




















