Bhandara : भंडाऱ्यातील लाखांदूर तालुक्यात 16 वर्षांपासून रखडला पाणी प्रश्न, नागरिकांची मागणी काय?
राज्य सरकार आणि राज्यकर्त्यांची उदासीनता म्हणजे काय? याचा प्रत्यय भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील शेतकरी मागील 16 वर्षांपासून अनुभवतायत.. गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह जलाशयाचे पाणी मिळावे, यासाठी लाखांदूर तालुक्यातील नागरिकांचा सरकारशी लढा सुरू आहे. विशेष म्हणजे, हे क्षेत्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं आहे. तर, या जिल्ह्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत...मात्र तरीही पाण्याचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने शेतकरी हवालदिल झालेत दरम्यान या हिवाळी अधिवेशनात रखडलेला प्रश्न मार्गी लागावा, अशी अपेक्षा येथील ग्रामस्थ, शेतकऱ्यांनी व्यक्त केलीये... दरम्यान यासंदर्भात ग्रामस्थांच्या मागण्यांसंदर्भात अधिक माहिती देतायत आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाई





















