एक्स्प्लोर
Bacchu Kadu On BJP: 'गरज सरो अन् वैद्य मरो', BJP च्या धोरणांवर बच्चू कडू संतापले
प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी भाजप आणि शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारने त्यांना दिलेली कार्यालयाची जागा परत घेतल्याने ते नाराज आहेत. 'एकं आहे बीजेपीच्या धोरणनिर्णय गरज करो अन्वैत्य मरो' (गरज सरो, वैद्य मरो), अशा शब्दात बच्चू कडू यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. हा निर्णय म्हणजे फडणवीस सरकारने दिलेला दणका असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. एकनाथ शिंदे सरकारच्या काळात हा निर्णय घेण्यात आला होता, पण आता त्यात बदल करण्यात आला आहे, असे या वृत्तात म्हटले आहे. मात्र, या निर्णयामुळे आपल्याला काही फरक पडणार नाही आणि आपले काम चालूच राहील, कारण आपण फिरत्या कार्यालयातून एका फोनवर लोकांची कामे करतो, असेही बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















