Amravati : ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश, उपसरपंचावर कारवाईचं आश्वासन; तात्पुरती पाण्याचीही व्यवस्था
अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर गावात एका वार्डात 25 दिवसांपासून पिण्याचं पाणी मिळत नसल्याने अखेर या वार्डातील ग्रामस्थांनी गाव सोडून गावाबाहेरील एका विहीरी जवळ बसून आंदोलन सुरू केले आहे. आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम असून काल प्रशाससाना सोबत चर्चा झाल्यावर आज या वॉर्ड मधील पाण्याच्या पाईपलाईनचे काम सुरू करण्यात आले आहे. जुन्या पाईपलाईनला जोडून तात्पुरती नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सध्या सुरू झालं आहे.. पुढील काही दिवसात या भागात कायमस्वरूपी पाईपलाईन टाकली जाईल, त्याची टेंडर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती चांदुर रेल्वे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी एबीपी माझाला दिली...





















