Raju Waghmare On Operation Tiger Zero Hour : २०२९ पर्यंत उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपलेला असेल? | Zero Hour
मंडळी, खरं तर आपल्या राज्याला मोठा राजकीय आणि सांस्कृतिक वारसा आहे.. त्याच राज्यात पक्षनिष्ठा आणि विचारसरणीची कित्येक आदर्श उदाहरणं आहेत. पण, आता हे जरा दुर्मिळ होत चाललंय.. कारण, २०१९ नंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतका काय गोंधळ उडालाय.. की मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यांच्या शब्दांमध्ये सांगायचं तर... अलीकडे राजकारणाचा कॅरम असा काय फुटलाय.. की कोणती सोंगटी नेमकी कुठे गेली.. हे काही कळायला नेम नाहीय..
आता तुम्ही म्हणाल की त्याचा आज काय संबंध.. तर कसं आहे ना मंडळी.. २०२२ साली एकनाथ शिंदेंनी केलेलं बंड..
हे आपल्या देशासाठी पक्ष फुटण्याचं नवं मॉडेल बनलं.. आता फुटण्याच म्हणा की फोडण्याचं.. हे तुमचं तुम्ही ठरवा..
पण, २०२२ सालानंतर आजपर्यंत तीन मोठे पक्ष फुटले.. पॅटर्न एक.. महाराष्ट्रातील शिवसेना पॅटर्न..
आधी पक्षातल्या एका नेत्यानं दोन तृतीयांश लोकप्रतिनिधींना एकत्र आणायचं.. मग, पक्षातील नेतृत्वाविरोधात आवाज उठवायचा.. आणि त्यानंतर थेट पक्षावर ताबा सांगायचा..
जे शिवसेनेत झालं.. तेच राष्ट्रवादीतही झालं.. तेच आता पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जींच्या तृणमूलसोबतही होतंय़..
पश्चिम बंगालमधलं राजकीय नाट्य संपण्याच्या वळणावर असतानाच उद्धव ठाकरेंचे आणखी खासदार फुटणार अशा चर्चांना उधाण आलं.. घटनाक्रम पाहिला तर काही जणांना त्यात तथ्य दिसू लागलं..
ठाकरेंनीही बैठकांचं सत्र लावलं.. त्यात खासदारांकडून निष्ठेची हमीच घेण्यात आली.. पण, पक्षावर आलेली ही वेळ.. आणि त्यानंतर सुरु झालेले खासदारांच्या मनधरणीचे प्रयत्न..
यावरुन ठाकरेंच्या शिवसेनेची सध्याचे सर्वात कट्टर विरोधक शिवसेना मात्र, चांगली समाधानी झालेली दिसतेय..
All Shows
































