एक्स्प्लोर
Zero Hour Jayashree Shelke : ठाकरेंनी कर्जमाफी केली, पण फडणवीसांनी फक्त थाप मारली
शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे गट आणि भाजप सरकारमध्ये पुन्हा एकदा वाद पेटला आहे. 'इतिहासातली सगळ्यात मोठी कर्जमाफीची थाप जर कोणी मारली असेल तर ती आजच्या महायुतीच्या मुख्यमंत्र्यांनी मारली आहे,' असा थेट आरोप ठाकरे गटाच्या प्रतिनिधींनी चर्चेदरम्यान केला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेद्वारे कोणताही गाजावाजा न करता शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी दिली, असे त्यांनी सांगितले. याउलट, 'सातबारा कोरा करू' असे आश्वासन देऊनही फडणवीस सरकार ते पूर्ण करण्यासाठी मुहूर्त का शोधत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सध्या कापसाचे भाव २०२० मधील ११,००० रुपयांवरून ६,००० रुपयांपर्यंत घसरले आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. उद्धव ठाकरे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ५ नोव्हेंबरपासून दौऱ्यावर आहेत.
All Shows
झीरो अवर

Zero Hour Full Episode : महापालिका निवडणुकीत बंडखोरीचा फटाक कोणाला बसेल?

Zero Hour Full : तिकीट न मिळाल्यानं कार्यकर्त्यांच्या नाराजीचा महापालिका निकालांवर किती परिणाम?

Zero Hour Full मुंबईत ठाकरेंच्या घोषणेचा मुहूर्त ठरला,ठाकरे एकत्र आले तर महायुतीला किती मोठं आव्हान?

Zero Hour Full नगराध्यक्षांच्या निकालाचा मनपा मतदानावर परिणाम होईल? मुंबईत महायुतीला कोणाचं आव्हान!

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Advertisement
Advertisement

एबीपी माझा वेब टीम
Opinion



























