Nagpur Special Report : नागपुरातील वाळू चोरांचा प्रताप, तब्बल 8 हजार ट्रक वाळू चोरी : ABP Majha
सरकारची मालमत्ता चोरी करून पुन्हा सरकारलाच विकल्याचं कधी पाहिलंय का... नागपुरात असाच काहीसा प्रकार घडलाय.. वाळू तस्करांनी राज्य शासनाला कोणताही कर न भरता कोट्यवधींची वाळू चोरलीच नाही... तर विकासकामांच्या नावाखाली पुन्हा ती शासनाच्या वेगवेगळ्या विभागांच्या माथी मारल्याचं पोलीस तपासात समोर आलंय.... धक्कादायक बाब म्हणजे गेल्यावर्षभरात वाळू चोरीचा आकडा 40 हजार ब्रास म्हणजेच 8 हजार ट्रक एवढा आहे... मध्यप्रदेश आणि विदर्भातील जंगलातून वाहून येणाऱ्या अनेक नद्यांमध्ये वाळूचं प्रमाण प्रचंड आहे... आणि हीच वाळू सध्या तस्करांसाठी सोन्याची खाण बनलीये...नागपूर पोलिसांनी आतापर्यंत वाळू चोरीच्या या वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये चार गुन्हे दाखल केलेत..
All Shows
































