एक्स्प्लोर

अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?

देशाला पुढे नेण्यासाठी राजकीय नेतृत्व निवडण्याच्या पद्धतीत बदल होणे आवश्यक आहे. भारताला एका शांततापूर्ण क्रांतीची गरज आहे, जेणेकरून देशाला योग्य नेतृत्व मिळू शकेल, असे वांगचूक यांनी म्हटलं आहे.

Sonam Wangchuk on india: पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी देशाच्या भवितव्यावर थेट भाष्य केलं आहे. जर सध्याची परिस्थिती अशीच राहिली, तर भारत 2047 पर्यंत एक विकसित देश बनू शकणार नाही, असे म्हटले आहे. वांगचुक म्हणाले की, श्रीलंका आणि बांगलादेशसारख्या देशांनी भारताला आधीच मागे टाकले आहे. योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला एका शांततापूर्ण क्रांतीची गरज आहे. त्यांनी गुरुवारी रात्री उशिरा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला, ज्यात त्यांनी म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. या काळात त्यांनी देश आणि त्याच्या भविष्याबद्दल खूप विचार केला.

वांगचुक यांचा व्हिडिओमध्ये पाच मुद्यांना हात 

  • 50 वर्षांपूर्वी भारताच्या मागे किंवा बरोबरीत असलेले अनेक शेजारी देश आता लक्षणीयरीत्या पुढे गेले आहेत. थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, श्रीलंका आणि बांगलादेश ही याची उदाहरणे आहेत. जर भारताला 2047 पर्यंत जगात एक सन्माननीय देश म्हणून टिकून राहायचे असेल, तर मोठे बदल आवश्यक आहेत.
  • देशातील प्रशासकीय आणि व्यवस्थेतील समस्या एका राजकीय पक्षापुरत्या मर्यादित ठेवता येणार नाहीत. वेगवेगळ्या पक्षांच्या सरकारांच्या काळातही विरोधाचे आवाज दाबले गेले आहेत.
  • 2012-13 च्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनानंतर राजकीय बदल झाला. सरकार बदलूनही भ्रष्टाचार आणि अन्याय संपलेले नाहीत. आता या समस्यांनी नवीन रूप धारण केले असून त्या पूर्वीपेक्षा अधिक गंभीर झाल्या आहेत.
  • देशाला पुढे नेण्यासाठी राजकीय नेतृत्व निवडण्याच्या पद्धतीत बदल होणे आवश्यक आहे. भारताला एका शांततापूर्ण क्रांतीची गरज आहे, जेणेकरून देशाला योग्य नेतृत्व मिळू शकेल.
  • आम्ही अशा लोकांच्या शोधात आहोत जे निःस्वार्थी, निर्भय, सद्गुणी आणि सक्षम आहेत. देशात असे लोक कुठे आहेत हे मला माहीत नाही. मी लोकांना आवाहन करतो की त्यांनी आपापल्या प्रदेशातून आणि देशातून अशा किमान एका व्यक्तीचे नाव सुचवावे. ही नावे माझी स्वातंत्र्यदिनाची भेट असतील. मला अशा लोकांना भेटायचे आहे जे देशाचा नवा नकाशा घडवण्यात मदत करू शकतील.
  • शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतरही, त्यांना नव्या मंत्र्यांकडून कोणतेही मोठे बदल दिसत नाहीत. देशाची प्रगती थेट त्याच्या शिक्षण व्यवस्थेशी जोडलेली आहे. जोपर्यंत शिक्षण मागे राहील, तोपर्यंत देशाचे भविष्यही मागे राहील.

वांगचुक यांचे जंतरमंतरवर उपोषण 

सोनम वांगचुक यांनी 28 जून रोजी दिल्लीतील जंतर मंतर येथे अनिश्चित काळासाठी उपोषण सुरू केले. नीट-यूजी पेपरफुटी आणि परीक्षा पद्धतीतील अनियमिततेचा निषेध करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ त्यांनी हे उपोषण सुरू केले. 18 जुलै रोजी, त्यांची प्रकृती खालावल्यानंतर दिल्ली पोलिसांनी वांगचुक यांना जंतर मंतरवरून फरफटत सफदरजंग रुग्णालयात नेले. नंतर त्यांना मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले. सरकारकडून आश्वासन मिळाल्यानंतर वांगचुक यांनी 24 जुलै रोजी आपले उपोषण संपवले.

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
Maharashtra Government: जमिनीचे दावे वर्षानुवर्षे अडकलेत? आता मंडळ अधिकारी ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत जमिनीचे दावे निकाली निघणार; राज्य सरकारचा मेगा प्लॅन
जमिनीचे दावे वर्षानुवर्षे अडकलेत? आता मंडळ अधिकारी ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत जमिनीचे दावे निकाली निघणार; राज्य सरकारचा मेगा प्लॅन
Census 2027: जात, धर्म, बँक खातं ते कोरोना लस कुठे घेतली?; जनगणनेवेळी तुम्हाला विचारले जाणारे 40 प्रश्न; पाहा संपूर्ण यादी!
जात, धर्म, बँक खातं ते कोरोना लस कुठे घेतली?; जनगणनेवेळी तुम्हाला विचारले जाणारे 40 प्रश्न; पाहा संपूर्ण यादी!
Shetkari Kajmafi : मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? A to Z माहिती
मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? A to Z माहिती
Advertisement

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Cockroach Janta Party BCI: कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
Embed widget