"पत्रात काही शब्द टाळले असते तर बरं झालं असतं!", अमित शाहांची राज्यपालांच्या पत्रावर प्रतिक्रिया
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तुम्ही धर्मनिरपेक्ष झालात का, अशी विचारणा करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या पत्रावर मोदी सरकार आणि भाजपमध्ये नाराजी असल्याचं स्पष्ट झालं. राज्यपालांनी ते विशेष शब्द टाळायला हवे होते, असं खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीच म्हटलं आहे.
एका खासगी वृत्तवाहिनाला दिलेल्या मुलाखतीत गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रात राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमध्ये झालेल्या पत्रवादावर प्रथमच भाष्य केलं. राज्यपालांचं पत्र मी वाचलं आहे. त्यांनी काही शब्द टाळले असते, तर बरं झालं असतं, असं शाह म्हणालेत. त्यांनी ते विशेष शब्द टाळायला हवे होते, असं गृहमंत्री यांनी म्हटलं.
All Shows
































