एक्स्प्लोर

Artificial intelligence : AI, डिजिटल नवोपक्रम आणि सायबर सुरक्षेत महाराष्ट्र देशात आघाडीवर : ब्रिजेश सिंह 

Maharashtra Artificial intelligence : भविष्यातील रोजगार संधी आणि जागतिक स्पर्धा लक्षात घेऊन राज्यात AI आधारित शिक्षण आणि संशोधनाला चालना दिली जात आहे.

मुंबई : कृषी, प्रशासन, नागरिक सेवा वितरण आणि सायबर सुरक्षेपर्यंत प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरामुळे महाराष्ट्र देशात आघाडीवर पोहोचला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ई-गव्हर्नन्स आणि डिजिटल नवोपक्रमाच्या माध्यमातून प्रशासन अधिक सक्षम, वेगवान आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी राज्य शासन काम करत असल्याचं माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक तथा प्रधान सचिव ब्रिजेश सिंह (Brijesh Singh IPS) यांनी सांगितलं. ते तंत्रज्ञान, नवोपक्रम, डिजिटल गव्हर्नन्स आणि CSR विषयक उच्चस्तरीय 'टेक महाइम्पॅक्ट 2026' परिषदेत बोलत होते.

ब्रिजेश सिंह यांनी सांगितलं की, महाराष्ट्राच्या नेतृत्वाला तंत्रज्ञानाची सखोल जाण असून सार्वजनिक हित, रोजगारनिर्मिती आणि उद्योगवाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जात आहे. ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स (GCC) साठी राज्याने स्पष्ट धोरण आखले असून अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या व्यवसाय प्रक्रिया भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात स्थलांतरित होत आहेत.

Golden Database Maharashtra : नागरिकांसाठी 'गोल्डन डेटाबेस'ची अभिनव व्यवस्था

नागरिकांना वारंवार तीच कागदपत्रे सादर करावी लागू नयेत यासाठी राज्य शासनानं 'गोल्डन डेटाबेस' विकसित केला आहे. या प्रणालीमुळे नागरिकांची माहिती एकत्रित स्वरूपात उपलब्ध राहील आणि विविध शासकीय योजनांसाठी पात्रता API च्या माध्यमातून आपोआप पडताळली जाईल. त्यामुळे कागदोपत्री प्रक्रियेला मोठी गती मिळणार आहे.

E Governance Maharashtra : ई-ऑफिसमुळे प्रशासनाचे संपूर्ण डिजिटायझेशन

राज्यातील विविध विभागांमध्ये ई-ऑफिस प्रणाली लागू करून प्रशासकीय कामकाजाचं डिजिटायझेशन करण्यात येत आहे. तसेच 100 दिवस आणि 150 दिवसांच्या विशेष मोहिमांद्वारे विभागीय कामकाजाला गती देण्यात आली आहे. उपग्रह चित्रांच्या साहाय्याने अतिक्रमण शोधणे, जंगलतोडीवर नियंत्रण ठेवणे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक नुकसानीचे मूल्यांकन करण्याची प्रक्रिया अधिक स्वयंचलित करण्यात आली आहे.

AI University Maharashtra : महाराष्ट्रात एआय विद्यापीठ स्थापन होणार

महाराष्ट्र स्वतःचे एआय विद्यापीठ स्थापन करण्याच्या दिशेने काम करत असून तंत्रज्ञान क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्यावर भर देत आहे. भविष्यातील रोजगार संधी आणि जागतिक स्पर्धा लक्षात घेऊन राज्यात AI आधारित शिक्षण आणि संशोधनाला चालना दिली जात आहे.

Maharashtra Cyber Security : 1,000 कोटींच्या 'महाराष्ट्र सायबर' कार्यक्रमाला बळ

सायबर सुरक्षेसाठी 2015 मध्ये जवळपास 1,000 कोटी रुपयांच्या तरतुदीसह 'महाराष्ट्र सायबर' कार्यक्रम सुरू करण्यात आला. याअंतर्गत FBI तसेच फ्रान्स आणि एस्टोनियाच्या धर्तीवर 47 अत्याधुनिक सायबर प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत. आता 'महाराष्ट्र सायबर सिक्युरिटी कॉर्पोरेशन'च्या माध्यमातून ही क्षमता उद्योग क्षेत्रालाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.

Agri AI Policy : कोरकू, भिल, माडिया स्थानिक भाषांमध्ये शेतकऱ्यांना एआयची मदत

राज्याने 'अ‍ॅग्री एआय पॉलिसी' लागू केली असून स्थानिक बोलीभाषांमध्ये शेतकऱ्यांना मोबाईलवर आवाजाच्या माध्यमातून पिके, खत व्यवस्थापन आणि बाजारभावाबाबत माहिती देणारी AI आधारित व्यवस्था विकसित केली जात आहे. कोरकू, भिल आणि माडिया यांसारख्या भाषांमध्ये ही सुविधा उपलब्ध होणार आहे.

Data Protection Law : डिजिटल डेटा संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीची तयारी

डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन (DPDP) कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासन तयारी करत आहे. डेटा लोकलायझेशनच्या गरजा लक्षात घेऊन स्वदेशी डेटा सेंटर उभारणीवर भर देण्यात येत असून पुढील वर्षी मेपर्यंत या कायद्याची पूर्ण अंमलबजावणी अपेक्षित असल्याचे ब्रिजेश सिंह यांनी सांगितले.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

AI Virus: चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
Tech-Neck Problem Health News: मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
Instagram Ban In India Fact Check: मोदी सरकार 25 ऑगस्टपासून इन्स्टाग्राम बंद करणार? व्हायरल पोस्टने खळबळ, सरकारची मोठी अपडेट
मोदी सरकार 25 ऑगस्टपासून इन्स्टाग्राम बंद करणार? व्हायरल पोस्टने खळबळ, सरकारची मोठी अपडेट
Advertisement

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget