Instagram Ban In India Fact Check: मोदी सरकार 25 ऑगस्टपासून इन्स्टाग्राम बंद करणार? व्हायरल पोस्टने खळबळ, सरकारची मोठी अपडेट
सोशल मीडियावर 25 ऑगस्ट 2026 च्या रात्रीपासून भारतात इन्स्टाग्रामवर बंदी घालण्यात येणार असल्याचा दावा केला जात आहे.

Instagram Ban In India Fact Check: सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, 25 ऑगस्ट 2026 पासून भारतात इन्स्टाग्रामवर बंदी घालण्यात येणार असल्याचा दावा केला जातोय. (Instagram Ban Viral Post) या दाव्यामुळे अनेक नेटकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. मात्र, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) च्या फॅक्ट चेक युनिटने हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचं स्पष्ट केलं आहे.
PIB ने काय सांगितलं?
PIB फॅक्ट चेकने सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टचा खुलासा करत म्हटलं आहे की, भारत सरकारने 25 ऑगस्टपासून इन्स्टाग्रामवर बंदी घालण्याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. त्यामुळे अशा दिशाभूल करणाऱ्या पोस्टवर विश्वास ठेवू नये किंवा त्या पुढे शेअर करू नयेत, असं आवाहन करण्यात आलं आहे. PIBने आपल्या अधिकृत सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे, "सोशल मीडियावर 25 ऑगस्ट 2026 च्या रात्रीपासून भारतात इन्स्टाग्रामवर बंदी घालण्यात येणार असल्याचा दावा केला जात आहे. हा दावा पूर्णपणे खोटा आहे. भारत सरकारने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही."
सोशल मीडियावर चर्चेला उधाण
ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी इन्स्टाग्रामवरील फोटो, व्हिडीओ आणि इतर डेटा बॅकअप करून ठेवण्याचा सल्ला देणारे संदेशही शेअर केले. त्यामुळे अनेक युजर्समध्ये संभ्रम निर्माण झाला. मात्र, Meta, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय किंवा इतर कोणत्याही सरकारी संस्थेकडून इन्स्टाग्रामवर बंदीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
सोशल मीडिया पर एक पोस्ट साझा कर दावा किया जा रहा है कि भारत सरकार द्वारा 25 अगस्त 2026 की रात से भारत में #Instagram पर प्रतिबंध लगा दिया जाएगा।#PIBFactCheck
— PIB Fact Check (@PIBFactCheck) July 27, 2026
❌ यह दावा #फर्जी है।
✅ भारत सरकार द्वारा ऐसी कोई घोषणा नहीं की गई है।
⚠️कृपया सतर्क रहें और ऐसे भ्रामक दावों के… pic.twitter.com/6v9Dz8bdUV
अधिकृत स्रोतांवरच विश्वास ठेवण्याचं आवाहन
सध्या भारतात इन्स्टाग्रामची सेवा सुरळीत सुरू असून, 25 ऑगस्टपासून बंदी लागू होणार असल्याच्या दाव्यात कोणतंही तथ्य नाही. केंद्र सरकारच्या निर्णयांबाबत किंवा धोरणांबाबत सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टवर आंधळेपणाने विश्वास न ठेवता, PIB Fact Check किंवा संबंधित सरकारी अधिकृत स्रोतांवरूनच माहितीची खात्री करून घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.तसंच, केंद्र सरकारशी संबंधित संशयास्पद संदेश, व्हिडीओ किंवा फोटो आढळल्यास ते PIB Fact Check कडे पडताळणीसाठी पाठवावेत, असंही नागरिकांना सांगण्यात आलं आहे.






















