Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये अनेकवेळा संघर्ष झाला. दोन-तीन वेळा लाठीचार्ज करावा लागला. काही विद्यार्थ्यांच्या डोक्याला दुखापत झाली.

Jharkhand Student Protest: झारखंडमधील रांची येथे जेपीएससी-जेएसएससी परीक्षा घोटाळ्याविरोधात आंदोलन करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांनी बॅरिकेड्स तोडून विधानसभेच्या गेटपर्यंत मजल मारली. विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये अनेकवेळा संघर्ष झाला. दोन-तीन वेळा लाठीचार्ज करावा लागला. काही विद्यार्थ्यांच्या डोक्याला दुखापत झाली. आंदोलकांनी पोलिसांवर पाण्याच्या बाटल्या आणि चपलाही फेकल्या.
पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या
सकाळी 10 वाजता विद्यार्थी जुन्या विधानसभा भवनाजवळ जमले आणि त्यानंतर त्यांनी विधानसभेला घेराव घातला. पोलिसांनी काटेरी तारांचे बॅरिकेड्स उभारले होते. पोलिसांनी पाण्याचे फवारे मारताच, विद्यार्थी बॅरिकेड्सवर चढून नाचताना दिसले. काही विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गायले. त्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या. सहा स्तरी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान, सीआयडीने जेपीएससीचे माजी अध्यक्ष एल. क्यंगटे यांना अटक केली आहे. 21 जुलै रोजी जेपीएससी कार्यालयावर छापा टाकल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता. सीआयडी त्यांची सतत चौकशी करत आहे. झारखंडमध्ये पीएससी-एसएससी परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या 17 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. देवेंद्रनाथ महातो यांच्यासह सहा विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत. ते रुग्णवाहिकेतून विधानसभेच्या घेरावात सामील झाले.
#WATCH | JPSC-JSSC aspirants' protest in Ranchi (Jharkhand) | Student leader Devendra Nath Mahato says, "Till now, no one has come from the government side for talks..." pic.twitter.com/qA0nOYwaxd
— ANI (@ANI) August 10, 2026
विद्यार्थ्यांच्या सुमारे 98 टक्के मागण्या मान्य
दरम्यान, रविवारी, विद्यार्थी आणि सरकार यांच्यात चर्चेची तिसरी फेरी पार पडली. सरकारने दावा केला की विद्यार्थ्यांच्या सुमारे 98 टक्के मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. सरकारने जेपीएससी-पीटी परीक्षा रद्द करण्यास सहमती दर्शवली. तथापि, जेएसएससी-सीजीएल परीक्षा रद्द करणे आणि सीबीआय चौकशी करण्यावर कोणताही करार झाला नाही.
आयोगाच्या तीन सदस्यांचा राजीनामा
दरम्यान, जेपीएससीमध्ये एक मोठा प्रशासकीय बदलही झाला आहे. आयोगाचे तीन सदस्य अजिता भट्टाचार्य, जमील अहमद आणि अनिमा हंसदा यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे. तिन्ही सदस्यांनी राज्यपालांकडे आपले राजीनामे सादर केले असून, ते स्वीकारण्यात आले आहेत. यापूर्वी, 22 जुलै रोजी जेपीएससीचे अध्यक्ष एल. खियांगटे यांनीही राजीनामा दिला होता. सध्या, जेपीएससी भरती परीक्षांमधील अनियमिततेच्या आरोपांची सीआयडी चौकशी करत आहे. या संदर्भात आयोगाच्या सदस्यांची चौकशी केली जात आहे. डॉ. अजिता भट्टाचार्य यांची 10 ऑगस्ट रोजी चौकशी होणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Before You Go
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा





















