एक्स्प्लोर

IND vs ENG: टी-20 विश्वचषकात टीम इंडियाची इंग्लंडविरुद्ध कामगिरी कशी? सेमीफायनलपूर्वी महत्त्वाचे आकडे समोर

T20 World Cup 2022: भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि इंग्लंड या चार संघांनी टी-20 विश्वचषक 2022च्या सेमीफायनलमध्ये धडक दिलीय.

T20 World Cup 2022: भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि इंग्लंड या चार संघांनी टी-20 विश्वचषक 2022च्या सेमीफायनलमध्ये धडक दिलीय. सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. तर, भारतासमोर इंग्लंडच्या संघाचं आव्हान असणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना 10 नोव्हेंबर रोजी अॅडिलेडच्या मैदानावर रंगणार आहे. यापूर्वी टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यात कोणाचं पारडं जड राहीलं? यावर एक नजर टाकुयात.

कोणाचं पारडं जड?
टी-20 विश्वचषकात भारत आणि इंग्लंड आतापर्यंत तीन वेळा आमने सामने आलाय. त्यापैकी दोन सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. तर, एक सामना इंग्लडनं जिंकला आहे. या आकडेवारीनुसार, टी-20 विश्वचषकात भारताचं पारडं जडं दिसत आहे. 

भारताचा 18 धावांनी विजय ( टी-20 विश्वषक, 2007)
2007 मध्ये प्रथमच भारत आणि इंग्लंड पहिल्यांदाच टी-20 विश्वचषकात आमने सामने आले होते. या सामन्यात भारताचा स्टार माजी क्रिकेटपटू युवराज सिंहनं स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात 6 षटकार ठोकून इतिहास रचला. या ऐतिहासिक सामन्यात भारतानं इंग्लंडचा 18 धावांनी धुव्वा उडवला. 

भारताचा इंग्लंडवर तीन धावांनी विजय ( टी-20 विश्वषक, 2009)
2009 साली इंग्लंड आणि भारत यांच्यात दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषकाचा सामना खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना खूपच रोमांचक ठरला. मात्र, या सामन्यातही भारतीय संघाचा वरचष्मा पाहायला मिळालं. या सामन्यात भारतानं इंग्लंडचा तीन धावांनी पराभव केला. 

भारताचा लाजिरवाणा पराभव (टी-20 विश्वषक, 2012)
2012मध्ये इंग्लंड आणि भारतीय संघ टी-20 विश्वचषकात तिसऱ्यांदा एकमेकांसमोर आला. या सामन्यात इंग्लंडनं 2009 च्या  टी-20 विश्वचषकातील पराभवाचा बदला घेतला आणि सामना 90 धावांनी एकतर्फी जिंकला.महत्वाचे म्हणजे, टी-20 विश्वचषकाच्या नॉकआऊट सामन्यात भारत आणि इंग्लंड पहिल्यांदाच एकमेकांशी भिडणार आहे. यापूर्वी भारत आणि इंग्लंड नॉक आऊट सामन्यात कधीच आमने-सामने आले नाहीत. 

ट्वीट-

 

हे देखील वाचा- 

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

RBI : आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू

व्हिडीओ

Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RBI : आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
Nifty 50 : निफ्टी 50 ने 2 महिन्यांचा उच्चांक गाठला, आयटी आणि रिअल्टी शेअर्सच्या वाढीसह सलग तिसऱ्या सत्रात वाढ कायम
निफ्टी 50 ने 2 महिन्यांचा उच्चांक गाठला, आयटी आणि रिअल्टी शेअर्सच्या वाढीसह सलग तिसऱ्या सत्रात वाढ कायम
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
Embed widget