एक्स्प्लोर

T20 world cup 2022 : टीम इंडियासाठी सेमीफायनलमध्ये पोहोचणं सोपं नाही, पावसाचा व्यत्यय टीम इंडियासाठी पडू शकतो महाग

Team India : टी20 वर्ल्ड कप 2022 स्पर्धेत सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला आता बाकी दोन्ही सामने जिंकणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

T20 WC 2022, Semifinals Scenario : टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेत भारताला रविवारी दक्षिण आफ्रिका संघाकडून पराभव पत्करावा लागला. टीम इंडियाला 5 विकेट्सच्या फरकाने सामना गमवावा लागला. दरम्यान या पराभवामुळे भारताचं गुणतालिकेत पहिलं स्थानही गेलं असून आता सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. भारताने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकल्याने भारत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. ज्यामुळे उर्वरीत दोन सामने जिंकून आरामात सेमीफायनलमध्ये पोहचू शकतो. पण या सर्वामध्ये पावसाने व्यत्यय आणल्यास मात्र टीम इंडियाच्या अडचणी वाढू शकतात...

तर भारत असणाऱ्या ग्रुप 2 मध्ये प्रत्येक संघाने आपले 3 सामने खेळले असून प्रत्येक संघाला आणखी 2 सामने खेळायचे आहेत. भारताचे सुपर-12 फेरीतील शेवटचे दोन सामने बांग्लादेश आणि झिम्बाब्वेविरुद्ध खेळायचे आहेत. यावेळी भारतीय संघ बांग्लादेशकडून हरला तर त्यांना जास्तीत जास्त झिम्बाब्वेला नमवून 6 गुण मिळवण्याचीच संधी आहे. पण बांग्लादेशने भारतानंतर पाकिस्तानलाही मात दिल्यास ते 8 गुणांसह भारताला मागे टाकून सेमीफायनलमध्ये एन्ट्री मिळवतील. दुसरीकडे पाकिस्तानचा विचार करता त्यांनी पाकिस्तानने आता त्यांचे उर्वरीत दोन्ही सामने बांग्लादेश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जिंकल्यास भारत आणि त्यांच्यात नेट-रनरेटचं गणित असेल. त्यामुळे भारत बांग्लादेशकडून बुधवारी पराभूत झाल्यास बांग्लादेश आणि पाकिस्तान या दोघांचे सेमीफायनलमध्ये एन्ट्रीचे चान्सेस वाढतील. सध्या विचारत करता सर्वाधिक 5 गुणांसह दक्षिण आफ्रिका सेमीफायनलच्या शर्यतीत अव्वल आहे. 

झिम्बाब्वेविरुद्ध भारत पराभूत झाल्यास?

भारताने बांग्लादेशविरुद्ध सामना जिंकला आणि झिम्बाब्वेविरुद्ध सामना गमावल्यास झिम्बाब्वे संघाचे दक्षिण आफ्रिका संघासोबत सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचे चान्सेस वाढतील. यासाठी झिम्बाब्वेला नेदरलँड संघाला मात द्यावी लागेल. सध्या झिम्बाब्वेचा फॉर्म पाहता ते नेदरलँडला नक्कीच मात देऊ शकतात. असे झाल्यास 7 गुणांसह ते सेमीफायनलमध्ये पोहोचतील.

पाऊस होऊ शकतो व्हिलेन

ऑस्ट्रेलियामध्ये विश्वचषक सुरु असून आतापर्यंत बऱ्याच सामन्यात पावसाने व्यत्यय घातला आहे. दरम्यान आता टीम इंडियाच्या उर्वरीत दोन्ही सामन्यात पावसाने व्यत्यय आणला आणि सामने रद्द झाले तर भारताला प्रत्येकी 1-1 गुण देऊन त्यांच्या खात्यावर 6 गुणच होणार आहेत. ज्यामुळे भारतापेक्षा इतर संघाचे सेमीफायनलमध्ये एन्ट्रीचे चान्सेस वाढतील.

असा आहे सुपर 12 चा ग्रुप 2
क्रमांक संघ सामने विजय पराभव अनिर्णीत गुण नेट रनरेट
1 दक्षिण आफ्रिका 3 2 0 1 5 2.772
2 भारत 3 2 1 0 4 0.844
3 बांग्लादेश 3 2 1 0 4 -1.533
4 झिम्बाब्वे 3 1 1 1 3 -0.050
5 पाकिस्तान  3 1 2 0 2 0.765
6 नेदरलँड्स 3 0 3 0 0 -1.948

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
Asha Bhosle : माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sambhuraj Desai on Vidhan Sabha : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणाVijay Wadettiwar Assembly Session : शेतकऱ्यांवर GST लावला, मध्ये बोलू नका... वडेट्टीवार कुणावर भडकलेCM Eknath Shinde on Drugs : ड्रग्ज संपेपर्यंत कारवाई थांबणार नाही - एकनाथ शिंदेDhananjay Munde on Jayant Patil :शेतकऱ्यांना मदतीचा मुद्दा, धनंजय मुंडे धावले अनिल पाटलांच्या मदतीला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
Asha Bhosle : माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
Maharashtra Budget 2024: लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
मुख्यमंत्री लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
Pankaj Jawale : लाचखोर मनपा आयुक्त पंकज जावळे फरार, सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल, झाडाझडतीत काय सापडलं?
लाचखोर मनपा आयुक्त पंकज जावळे फरार, सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल, झाडाझडतीत काय सापडलं?
अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस; 3 सिलेंडर मोफत, महिन्याला 1500 रुपये, अजित पवारांच्या 'बजेट'मधील टॉप 10 घोषणा
अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस; 3 सिलेंडर मोफत, महिन्याला 1500 रुपये, अजित पवारांच्या 'बजेट'मधील टॉप 10 घोषणा
Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z 
राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z 
Embed widget