एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
IND vs PAK, 1 Innings Highlight: अर्शदीप-पांड्याची कमाल, पण शान मकसूदसह इफ्तिकार अहमदची एकहाती झुंज, भारतासमोर 160 धावांचे आव्हान
ICC T20 WC 2022, IND vs PAK: भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरु सामन्यात भारताने प्रथम गोलंदाजी घेत पाकिस्तानला 159 धावांवर रोखलं आहे. यावेळी अर्शदीपने आणि हार्दीकने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.
![IND vs PAK, 1 Innings Highlight: अर्शदीप-पांड्याची कमाल, पण शान मकसूदसह इफ्तिकार अहमदची एकहाती झुंज, भारतासमोर 160 धावांचे आव्हान ICC T20 WC 2022: Pakistan given target of 160 runs against India Match 16 at MCG Stadium IND vs PAK, 1 Innings Highlight: अर्शदीप-पांड्याची कमाल, पण शान मकसूदसह इफ्तिकार अहमदची एकहाती झुंज, भारतासमोर 160 धावांचे आव्हान](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/23/d1786345fc07e688ebc4ffbc352a37341666515324014323_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Team India
IND vs PAK, T20 : टी20 विश्वचषक (T20 World Cup 2022) स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात मेलबर्नच्या मैदानात सामना सुरु असून पाकिस्तानचा डाव 159 धावांवर आटोपला आहे. भारताकडून हार्दीक आणि अर्शदीपने अप्रतिम गोलंदाजी करत प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या आहेत. पण पाकिस्तानकडून शान मकसून आणि इफ्तिकार अहमदने अर्धशतकं ठोकत पाकिस्तानचा डाव सावरला आहे. आता भारताला 20 षटकांत विजयसाठी 160 धावा करायची गरज आहे.
Innings Break!
— BCCI (@BCCI) October 23, 2022
Three wickets apiece for @hardikpandya7 & @arshdeepsinghh and a wicket each for @BhuviOfficial & @MdShami11 as Pakistan post a total of 159/8 on the board.
Scorecard - https://t.co/X970NaDN4n #INDvPAK #T20WorldCup pic.twitter.com/Nypo6k5ZRn
सामन्यात सर्वात आधी नाणेफेक जिंकत भारतीय कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानला भारतासमोर आधी फलंदाजी करणं अवघड ठरत असल्यानं रोहितनं हा निर्णय़ घेतला. त्यानुसारच भारतीय गोलंदाजांनी सुरुवातही दमदार केली. पाकिस्तानचा कर्णधार बाबरला 0 धावांवर तंबूत धाडत अर्शदीपने पहिली विकेट घेतली. त्यानंतरही भारताने गोलंदाजी कसून सुरुच ठेवली. 4 धावा करुन रिझवानही बाद झाला. पण त्यानंतर शान मकसूद (52) आणि इफ्तिकार अहमद (51) यांनी डाव सावरला आणि दोघांनी दमदार अर्धशतकं ठोकत पाकिस्तानची धावसंख्या सावरली. त्यांच्याशिवाय इतर फलंदाज स्वस्तात माघारी परतत होते. पण गोलंदाज शाहीन आफ्रिदीने 8 चेंडूत 16 धावांची खेळी करत आणखी योगदान दिलं. ज्यामुळे पाकिस्तानने 159 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. भारताकडून हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंह यांनी प्रत्येकी 3 तर मोहम्मद शमी बुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
कसे आहेत दोन्ही संघ?
भारत: रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार.
पाकिस्तान: बाबर आझम, मोहम्मद रिझवान, शान मसूद, हैदर अली, इफ्तिखार अहमद, आसिफ अली, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हॅरिस रौफ आणि शाहीन शाह आफ्रिदी.
हे देखील वाचा-
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
कोल्हापूर
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion