एक्स्प्लोर

इकडे मुंबईच्या कर्णधारपदाचा वाद, तिकडे CSK च्या दीपक चाहरचं ऋतुराजच्या कॅप्टन्सीवर बेधडक विधान

Ruturaj Gaikwad : यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई आणि मुंबई संघात मोठे बदल झाले. हार्दिक पांड्याला कर्णधारपद दिल्यानंतर रोहित शर्माच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. दुसरीकडे एमएस धोनीने ऋतुराज गायकवाड याला सन्मानपूर्वक कर्णधारपद बहाल केले.

Deepak Chahar on Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सने (CSK) यंदाच्या आयपीएलमध्ये शानदार सुरुवात केली आहे. सीएसकेनं (CSK) पहिल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे. आरसीबी आणि गुजरात संघाचा चेन्नईने (CSK vs RCB) सहज पराभव करत आपलं वर्चस्व कायम राखलेय. यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई आणि मुंबई संघात मोठे बदल झाले. हार्दिक पांड्याला कर्णधारपद दिल्यानंतर रोहित शर्माच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. दुसरीकडे एमएस धोनीने ऋतुराज गायकवाड याला सन्मानपूर्वक कर्णधारपद बहाल केले. पण चेन्नईच्या खेळाडूंची मात्र गोची होत आहे. कारण, कधी धोनीकडे पाहावं लागतेय, तर कधी ऋतुराज गायकवाडकडे.. कुणाचं ऐकायचं याबाबत त्यांच्या मनात संभ्रम असतात. वेगवान गोलंदाज दीपक चाहर यानं आपल्या मनातील संभ्रम बोलून दाखवला. ऋतुराज गायकवाडचे कौतुकही दीपक चाहर याने केलेय.

चेन्नईच्या पहिल्या दोन्ही सामन्यावेळी कॅमेरामॅन कर्णधार ऋतुराज गायकवाडऐवजी धोनीकडेच फोकस करत असल्याचे दिसले. दोन्ही सामन्यात धोनीच अनेकदा फिल्डिंग सेट करताना दिसला. माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग आणि सुरेश रैना यांसारख्या समालोचकांनी, ऋतुराजला कर्णधारपद देऊनही मैदानावर धोनीच कर्णधार असल्याबद्दल खिल्ली उडवली होती. असंच काहीसं दृश्य मंगळवारी गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यादरम्यानही पाहायला मिळालं. आता सामन्यानंतर चेन्नईचा वेगवान गोलंदाज दीपक चहर यांनं सीएसकेच्या खेळाडूंच्या वतीनं स्पष्टीकरण दिलं आहे. 

दीपक चाहर काय म्हणाला ?

गुजरातविरोधात चेन्नईने एकतर्फी विजय मिळवला. विजयानंतर चेन्नई सुपर किंग्जचा वरिष्ठ वेगवान गोलंदाज दीपक चहर यानं धोनीसह ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाबद्दल एक मनोरंजक विधान केलं आहे. समालोचक सुनील गावसकरांनी सामन्यानंतर दीपक चाहर याच्यासोबत चर्चा केली. क्षेत्ररक्षणासाठी कोणाकडे पाहतो, असे गावसकरांनी चाहरला विचारले. त्यावर बोलताना दीपक चाहर म्हणाला की, "आजकाल फील्ड सेटिंग आणि बॉलिंग बदलांसाठी दोन्ही बाजूला पाहावं लागतं.  माहीभाई आणि ऋतुराज गायकवाड या दोघांकडेही फिल्डिंग बदलासाठी पाहावं लगातं. त्यामुळे कुठे पाहावं याबद्दल थोडा संभ्रम होतो. परंतु ऋतुराज चांगला कर्णधार आहे, तो बरंच काही शिकत आहे. "


 
चेन्नईचा गुजरातवर सहज विजय - 

चेपॉक स्टेडियमवर चेन्नईने गुजरातचा दारुण पराभव केला. गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 206 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरदाखल गुजरातचा संघ 142 धावांपर्यंतच मजल मारु शकला. या सामन्यात ऋतुराज गायकवाड याने 46 धावांची खेळी केली. तर शिवम दुबे याने अर्धशतक ठोकले.

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget