एक्स्प्लोर

IPL 2024 : आरसीबीचा पहिला विजय, पॉइंट टेबलमध्ये उलटफेर, टॉपला कोणती टीम, ऑरेंज कॅप कुणाकडे?

IPL 2024 Point Table : आयपीएलच्या 17 व्या पर्वातील सहा मॅचेस पार पडल्या आहेत. पंजाब किंग्जला पराभूत करत आरसीबीनं पहिला विजय मिळवला आहे. आरसीबीचा संघ सध्या सहाव्या स्थानावर आहे.

IPL Points Table बंगळुरु : आयपीएलच्या (IPL 2024) सहा मॅचनंतर  गुणतालिकेत उलटफेर झाले आहेत. सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात मॅच पार पडली. आरसीबीनं ही मॅच चार विकेटनं जिंकली. आरसीबीला या हंगामातील पहिला विजय मिळाला. आयपीएलच्या पहिल्या सहा मॅचेस पाहिल्या तर ज्या टीमच्या होम ग्राऊंडवर मॅच असेल त्या टीमनं विजय मिळवला आहे. पंजाब विरुद्धच्या विजयानंतर आरसीबीनं गुणतालिकेत सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. सद्यस्थितीत राजस्थान रॉयल्स पहिल्या स्थानी असून चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.  

आरसीबीच्या विजयानं गुणतालिकेत काय फरक पडला? 

राजस्थान रॉयल्स एका मॅचमधील विजयासह नेट रनरेटच्या जोरावर पहिल्या स्थानावर आहे. ईडन गार्डन्सनवर सनरायजर्स हैदराबादला पराभूत करणारा संघ कोलकाता नाईट रायडर्स चौथ्या स्थानी आहे. पंजाब किंग्ज पाचव्या तर आरसीबी सहाव्या स्थानावर आहे. सर्व संघांचे गुण २ आहेत. मात्र, नेट रनरेटच्या जोरावर रँकिंग ठरलं आहे. सातव्या स्थानी सनरायजर्स हैदराबाद, आठव्या स्थानी मुंबई इंडियन्स, नवव्या स्थानी दिल्ली कॅपिटल्स आणि दहाव्या स्थानी लखनऊ सुपर जाएंटस आहे. गुणतालिकेतील पहिले चार संघ प्लेऑफ मध्ये क्वालिफाय करतील.  

ऑरेंज कॅप कुणाकडे?

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ऑरेंज कॅपचा मानकरी असतो. आरसीबीच्या दोन मॅच झालेल्या असून विराट कोहली सध्या ऑरेंज कॅपचा मानकरी आह. विराटनं  एका अर्धशतकासह 98 धावा केल्या आहेत. दुसऱ्या स्थानी पंजाबचा सॅम करन आणि तिसऱ्या स्थानी राजस्थानचा कॅप्टनं संजू सॅमसन आहे. 

पर्पल कॅपचा मानकरी

आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूला पर्पल कॅपचा मानकरी ठरवलं जातं.  चेन्नई सुपर किंग्जचा मुस्तफिजूर रहमान पहिल्या स्थानावर असल्यानं तो मानकरी आहे. त्यानं चार विकेट घेतल्य आहेत. आज चेन्नई आणि गुजरात यांच्यात मॅच होणार असल्यानं त्याचं अव्वल स्थान कायम राहण्याची शक्यता आहे. जसप्रीत बुमराह दुसऱ्या स्थानी तर हरप्रीत ब्रार तिसऱ्या स्थानी आहे. 

आरसीबीचा पहिला विजय

आयपीएलच्या पहिल्याच मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव स्वीकारणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं कबमॅक केलं आहे . आरसीबीनं चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या मॅचमध्ये पंजाब किंग्जला 4 विकेटनं पराभूत केलं.फाफ डु प्लेसिसच्या टीमनं 19.2 ओव्हर्समध्येच  6 विकेट गमावून 176 धावांचा यशस्वी पाठलाग केला. दिनेश कार्तिकनं अखेरच्या  10 बॉलमध्ये 28 धावा करुन आरसीबीच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

आरसीबीनं टॉस जिंकून प्रथम बॉलिंगचा निर्णय केला होता. पहिल्यांदा बॅटींग करणाऱ्या  पंजाब किंग्जनं 6 विकेटवर 176 धावा केल्या होत्या. पंजाबकडून प्रथम फलंदाजी करताना शिखर धवननं  37 बॉलमध्ये 45 धावा केल्या होत्या  

संबंधित बातम्या :

Shikhar Dhawan : विराटला जीवदान ही चूक, शिखर धवनने पराभवाचं खापर बेअयरस्टोवर फोडलं, टर्निंग पॉइंट सांगत म्हणाला...

Virat Kohli Video Calls : आरसीबीचा होम ग्राऊंडवर पहिला विजय, विराट कोहलीचं घरच्यांसोबत सेलिब्रेशन, अनुष्का शर्मासह मुलांना व्हिडीओ कॉल

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget