एक्स्प्लोर

IPL 2022 Playoffs : 'या' दोन संघाचं पुढील फेरीत पोहोचणं जवळपास निश्चित; मुंबई, चेन्नईपासून सर्व संघाची काय आहे स्थिती?

IPL Playoffs Update : सध्या गुणतालिकेत मुंबई आणि चेन्नई हे संघ सर्वात खालच्या स्थानावर आहेत. तरी देखील मुंबई संघाला प्लेऑफमध्ये पोहोचणं अजूनही शक्य आहे.

IPL 2022 News : आयपीएलच्या लीग स्टेजमधील जवळपास निम्मे सामने संपले असून आता प्लेऑफमध्ये पोहोचणारे संघ कोणते? ही चुरस सुरु झाली आहे. लीग स्टेजमध्ये एकूण 70 सामने खेळले जाणार असून प्रत्येक संघ 14 सामने खेळणार आहे. पुढील फेरीत अर्थात प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी किमान 16 गुणांची गरज संघाला असते. दरम्यान सध्याची संघाची स्थिती पाहता काही संघाचं पुढील फेरीत पोहोचणं जवळपास निश्चित झालं आहे. तर दुसरीकडे मुंबई, चेन्नई संघाची स्थिती मात्र अवघड झाली आहे.

'या' दोन संघाचं प्लेऑफमध्ये पोहोचणं जवळपास निश्चित

सद्यस्थितीला हार्दिक पंड्या कर्णधार असणारा संघ गुजरात टायटन्स 10 गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. त्यांनी 6 पैकी 5 सामने जिंकले असून केवळ एक सामना गमावला आहे. त्यामुळे त्याच्या खात्यावर 10 गुण आहेत. दरम्यान आता त्यांना पुढील फेरीत पोहचण्यासाठी उर्वरीत 8 सामन्यांपैकी केवळ 4 सामने जिंकणे गरजेचे आहे. दुसरा संघ म्हणजे रॉयल चँलेजर्स बंगळुरु जो गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असून त्यांनी 7 पैकी 5 सामने जिंकले असून 2 सामने गमावले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडेही 10 गुण असून त्यांना उर्वरीत 7 सामन्यात किमान 4 सामने जिंकण गरजेचं आहे. त्यामुळे या दोघांचं पुढील फेरीत पोहोचणं जवळपास निश्चित आहे.

'या' संघाचीही पुढील फेरीत पोहचण्याची शक्यता  

याशिवाय राजस्थान रॉयल्स, लखनौ सुपरजायंट्स आणि सनरायजर्स हैदराबाद या संघाच्या खात्यातही प्रत्येकी 8 गुण आहेत. त्यामुळे त्यांचीही प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. दुसरीकडे कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्स यांच्यानावावरही प्रत्येकी 6-6 गुण आहेत. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स संघाच्या नावावर 4 गुण असले तरी त्यांनी सर्वांपेक्षा कमी 5 सामनेच खेळले आहेत. दिल्लीचे अजून 9 सामने बाकी असल्याने त्यांचही प्लेऑफमध्ये पोहोचणं शक्य आहे.

मुंबई, चेन्नईचा मार्ग खडतर

यात मुंबई संघाचा (MI) संघाचा विचार करता त्यांनी सलग सहा सामने गमावल्यामुळे ते शून्य गुण आणि  -1.048 च्या रनरेटसह ते सर्वात शेवटच्या अर्थात दहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे सध्यातरी त्यांना स्पर्धेत राहण्यासाठी उर्वरीत आठ सामन्यांपैकी सात सामने जिंकणं अनिवार्य आहे. हे सर्व सामने चांगल्या रनरेटने जिंकणंही तितकच महत्त्वाचं आहे. पण यंदा आयपीएलमध्ये आठ जागी 10 संघ असल्याने मुंबईला पुढील फेरीत स्थानासाठी उर्वरीत आठ पैकी आठ सामने चांगल्या रनरेटने जिंकण अनिवार्य आहे. कारण पुढील फेरीत एन्ट्रीसाठी 16 गुण गरजेचे असल्याने मुंबई आठ पैकी आठ सामने जिंकल्यासत 16 गुण मिळवू शकते. दरम्यान मुंबईला पुढील फेरीत जाण्यासाठी इतर संघाचा खेळही तितकाच महत्त्वाचा असणार आहे. 

तसंच चेन्नई संघाने सहा पैकी पाच सामना त्यांनी गमावले असून आता त्यांचा सातवा सामना असणार आहे. त्यांचा नेटरनेटरेटही -0.638 असून 16 गुण मिळवून एका चांगल्या रनरेटसहच ते पुढील फेरीत पोहचू शकतात. चेन्नईला देखील उर्वरीत आठ पैकी किमान सहा सामने जिंकून स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवता येईल. पण यंदा आठ जागी 10 संघ असल्याने पुढील फेरीत पोहोचण्यासाठी उर्वरीत आठ पैकी सात सामने तेही तगड्या रनरेटने जिंकणं चेन्नईला अनिवार्य असणार आहे. 

हे देखील वाचा-

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली

व्हिडीओ

Ravindra Chavan on Vilasrao Deshmukh : आधी टीका जहरी , मग दिलगिरी Special Report
Santosh Dhuri Join BJP : संतोष धुरी यांचा राज ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' Special Report
Ajit pawar Sinchan Scam : अजितदादांना आतापर्यंत कोणत्या आरोपांत क्लिनचीट? Special Report
Shivaji Maharaj Politics :  नाही कुणा एकाचे, शिवराय सर्वांचे, सी.आर, पाटलांच्या वक्तव्याने नवा वाद Special Report
BJP VS NCP : भाजप-राष्ट्रवादीच्या विचारधारेची वादावादी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
Embed widget